शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

हुपरीत लॉकडाऊनचा निर्णय मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:25 IST

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तथा शहर आपत्ती निवारण समिती अध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या. शहरात गेल्या चार दिवसांपासून आढळून येत ...

बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तथा शहर आपत्ती निवारण समिती अध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.

शहरात गेल्या चार दिवसांपासून आढळून येत असलेली कोरोनाबाधित रुग्णसंख्या विचारात घेता शहरवासीयांना भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सूचनेनुसार सोमवार (दि. १०) रात्री १२ वाजल्यापासून २० मे अखेरपर्यंत शहरात पूर्ण लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) जाहीर करण्यात आला होता. मात्र, शहरातील बाधित रुग्णसंख्या सध्या तरी कमी असून, शहरवासीयही योग्य ती खबरदारी घेत शासन नियमाच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी कडक लॉकडाऊनची गरज भासत नसल्याची भूमिका घेत शहरातील व्यापारी, शेतकरी व विविध संघटनांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कडक लॉकडाऊन निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला होता. तसेच सोशल मीडियावरती सुद्धा उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या सर्व घटना विचारांत घेऊन कडक लॉकडाऊनबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात सोमवारी दुपारी सर्व पक्षीय व व्यापारी, शेतकरी यांची व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनी कडक लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला.