शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षाने वाढला रेशनच्या हमालीचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:53 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रेशनच्या दुकानात धान्याची पोती उतरून त्यांची थप्पी लावून देण्याची जबाबदारी संबंधित ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रेशनच्या दुकानात धान्याची पोती उतरून त्यांची थप्पी लावून देण्याची जबाबदारी संबंधित हमालांवर आहे. तसा शासनाचा निर्णयही झाला आहे; परंतु हमालांकडून पैसे आकारले जात असल्याने दुकानदार व हमाल यांच्यात वाद होऊन ते आमने-सामने आले आहेत. यामध्ये शासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने हा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे.अन्नसुरक्षा कायदा २०१४ मध्ये झाला. त्यानंतर लगेच द्वारपोच योजना लागू करण्यात आली. त्यानुसार रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोच करून त्याची हमाली व वाहतूक खर्च शासनाने करण्याचा निर्णय झाला; परंतु शासन व वाहतूक ठेकेदारांचे कंत्राट हे २०१२ ते २०१५ पर्यंत असल्याने शासनाला हमालीच्या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. मात्र २०१५ मध्ये रेशन दुकानदारांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. त्यावेळी शासनाकडून नवीन कंत्राटाच्या करारावेळी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगण्यात आले; परंतु त्यानंतर दोन वर्षे म्हणजे २०१६ व १७ पर्यंत जुन्याच पद्धतीने मुदतवाढ दिल्याने दुकानदारांकडून हमाली देण्याची पद्धत सुरूच राहिली. २० एप्रिल २०१७ मध्ये शासन व वाहतूक कंत्राटदारांमध्ये झालेल्या कराराच्या शासन निर्णयानुसार हमालांनी दुकानदारांकडून हमालीचे पैसे न घेता धान्याची पोती दुकानात उतरून त्याची थप्पी लावून देण्याची जबाबदारी राहील, असे म्हटले आहे. तरीही हमाली घेतली जात असल्याने पुन्हा झगडा सुरू होऊन दुकानदार संघटनांकडून शासनपातळीवर निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी लावून धरली आहे. चार दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यातील दुकानदार व हमाल यांच्यात हमालीवरून वाद झाला. यातून दुकानदारांनी थेट बहिष्कार घालत धान्यच न उचलण्याचा पवित्रा घेतला. त्यावर स्थानिक नायब तहसीलदारांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंची बैठक घेतली.यावेळी झालेल्या तडजोडीनुसार हमालांनी पैसे न घेण्याचे ठरले. अंतिम तोडगा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोरील बैठकीत घेण्याबाबत दोन्ही बाजूंनी संमती दर्शविली. राधानगरीचे हे लोण कागल, आजरा व कोल्हापूर शहरातही पसरले आहे. त्यामुळे हा वणवा जिल्हाभर अधिक भडकण्याची शक्यता आहे. शासनाच्या ब्ोटचेप्या धोरणामुळेच हा तिढा अजून सुटलेला नाही.महिन्याला १५ लाखांची हमालीदुकानाच्या दारात आलेली धान्याची पोती आत आणून त्यांची थप्पी लावण्यासाठी महिन्याला अंदाजे १५ लाख रुपये हमालांची मजुरी संपूर्ण जिल्ह्यातून द्यावी लागते, असे दुकानदारांकडून सांगण्यात आले. शासननिर्णयात हे पैसे शासनच देत असल्याने आमच्यावर भुर्दंड का, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.