शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

दुर्लक्षाने वाढला रेशनच्या हमालीचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:53 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रेशनच्या दुकानात धान्याची पोती उतरून त्यांची थप्पी लावून देण्याची जबाबदारी संबंधित ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रेशनच्या दुकानात धान्याची पोती उतरून त्यांची थप्पी लावून देण्याची जबाबदारी संबंधित हमालांवर आहे. तसा शासनाचा निर्णयही झाला आहे; परंतु हमालांकडून पैसे आकारले जात असल्याने दुकानदार व हमाल यांच्यात वाद होऊन ते आमने-सामने आले आहेत. यामध्ये शासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने हा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे.अन्नसुरक्षा कायदा २०१४ मध्ये झाला. त्यानंतर लगेच द्वारपोच योजना लागू करण्यात आली. त्यानुसार रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोच करून त्याची हमाली व वाहतूक खर्च शासनाने करण्याचा निर्णय झाला; परंतु शासन व वाहतूक ठेकेदारांचे कंत्राट हे २०१२ ते २०१५ पर्यंत असल्याने शासनाला हमालीच्या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. मात्र २०१५ मध्ये रेशन दुकानदारांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. त्यावेळी शासनाकडून नवीन कंत्राटाच्या करारावेळी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगण्यात आले; परंतु त्यानंतर दोन वर्षे म्हणजे २०१६ व १७ पर्यंत जुन्याच पद्धतीने मुदतवाढ दिल्याने दुकानदारांकडून हमाली देण्याची पद्धत सुरूच राहिली. २० एप्रिल २०१७ मध्ये शासन व वाहतूक कंत्राटदारांमध्ये झालेल्या कराराच्या शासन निर्णयानुसार हमालांनी दुकानदारांकडून हमालीचे पैसे न घेता धान्याची पोती दुकानात उतरून त्याची थप्पी लावून देण्याची जबाबदारी राहील, असे म्हटले आहे. तरीही हमाली घेतली जात असल्याने पुन्हा झगडा सुरू होऊन दुकानदार संघटनांकडून शासनपातळीवर निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी लावून धरली आहे. चार दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यातील दुकानदार व हमाल यांच्यात हमालीवरून वाद झाला. यातून दुकानदारांनी थेट बहिष्कार घालत धान्यच न उचलण्याचा पवित्रा घेतला. त्यावर स्थानिक नायब तहसीलदारांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंची बैठक घेतली.यावेळी झालेल्या तडजोडीनुसार हमालांनी पैसे न घेण्याचे ठरले. अंतिम तोडगा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोरील बैठकीत घेण्याबाबत दोन्ही बाजूंनी संमती दर्शविली. राधानगरीचे हे लोण कागल, आजरा व कोल्हापूर शहरातही पसरले आहे. त्यामुळे हा वणवा जिल्हाभर अधिक भडकण्याची शक्यता आहे. शासनाच्या ब्ोटचेप्या धोरणामुळेच हा तिढा अजून सुटलेला नाही.महिन्याला १५ लाखांची हमालीदुकानाच्या दारात आलेली धान्याची पोती आत आणून त्यांची थप्पी लावण्यासाठी महिन्याला अंदाजे १५ लाख रुपये हमालांची मजुरी संपूर्ण जिल्ह्यातून द्यावी लागते, असे दुकानदारांकडून सांगण्यात आले. शासननिर्णयात हे पैसे शासनच देत असल्याने आमच्यावर भुर्दंड का, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.