शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सर्वांसाठी घरे; महिन्याभरात आराखडा

By admin | Updated: September 9, 2016 01:12 IST

प्रधानमंत्री आवास योजना : महापालिका प्रशासनाकडून छाननीचे काम गतीने; केंद्राच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे आणि शहरातील झोपडपट्टींच्या पुनर्विकास करण्याचा संपूर्ण आराखडा येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करून तो राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारकडे मंजुरीकरीता पाठविण्याचे लक्ष्य महानगरपालिका प्रशासनाने ठेवले आहे. सध्या कर्ज, अनुदान व परवडणारी घरे मागणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू असून तीन झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणही पूर्ण केले जात आहे. २०२० पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना’ या नावाने सुरू केली आहे. पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ही योजना ‘इंदिरा आवास योजना’ या नावाने राबविण्याचा प्रयत्न केला होता. भाजपप्रणित केंद्र सरकारने आता हीच योजना नव्याने आणली आहे. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांनी या योजनेअंतर्गत अर्ज मागविले होते. जी कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात त्यांना परवडणारी घरे द्यायची, ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे त्यांना कमी व्याजदराने कर्ज द्यायचे आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुदान द्यायचे, अशा तीन प्रकारांत ही योजना राबविली जाणार आहे. याशिवाय शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचेही केंद्र सरकारचे धोरण असून त्याचाही सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शहरातील ५३ झोपडपट्ट्यांचे सर्व्हेक्षण केले जात आहे. हे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. केवळ लक्षतीर्थ, तोफेचा माळ आणि वारे वसाहत येथील झोपड्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आहे त्याच जागांवर करण्याचा सरकारचा निर्णय झाला आहे. त्यामुळे झोपडपट्टीत ज्यांची पक्की घरे आहेत त्यांना वगळून हा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. ज्यांची अद्यापही कच्ची घरे आहेत त्यांना ती पक्की बांधून दिली जातील. या योजनेत कोणावर सक्ती करण्यात येणार नाही; परंतु जे येतील त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाणार आहे.सर्वांसाठी घरे आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साधारणपणे १५ आॅक्टोबरपर्यंत हा अहवाल तयार करून तो राज्य सरकारच्या मान्यतेने केंद्र सरकारकडे पाठविला जाईल, असे मनपा झोपडपट्टी विभागाकडील प्रकल्प अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तिन्ही प्रकारात : ४७३६ अर्ज प्राप्ततीन प्रकारांत मिळून महापालिकेस ४७३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे अर्ज केलेली कुटुंबे योजनेत समाविष्ट होतात का याची छाननी सध्या सुरू आहे. त्यानंतर त्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. राज्य सरकारच्या मान्यतेने तो केंद्र सरकारच्या अंतिम मान्यतेकरीता पाठविला जाईल.