शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

‘घर-वापसी’ मोहीम सुरूच राहणार

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

व्यंकटेश आबदेव : विश्व हिंदू परिषद सुवर्णमहोत्सवी सोहळा

कोल्हापूर : गेल्या अनेक शतकांत हिंदू धर्मियांचे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांतर झाले. अशा धर्मांतरित हिंदूंना परत आणण्याचे काम ‘घर-वापसी’च्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद करत आहे. ‘घर-वापसी’ आणि धर्मांतर यामध्ये फरक आहे. ‘घर-वापसी’चे काम सुरूच राहणार असून, धर्मांतर बंदी कायद्यासाठी मात्र व्हीएचपी ठाम आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंंदू रणरागिनी साध्वी बालिका सरस्वती उपस्थित होत्या. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर काल, सोमवारी सायंकाळी हे संमेलन झाले. साध्वी बालिका सरस्वती यांनी मुस्लिमांचे आरक्षण बंद केले पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘व्होट बँके’साठी मुस्लिमांचे सुरू असलेले लांगुनचालन थांबवले पाहिजे, गो हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, ‘लव्ह जिहाद’ रोखावा, भारताच्या फाळणीस महात्मा गांधी जबाबदार असल्यामुळे चलनी नोटावर गांधीजींऐवजी छत्रपती शिवरायांची प्रतिमा छापावी, अशी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतसंघटन मंत्री भाऊराव कुदळे, बजरंग दलाचे नेते शंकर गायकर पू. पू. ईश्वर महास्वामी, संतोष तथा बाळ महाराज, आदींची भाषणे झाली. यावेळी विश्व हिंंदू परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॅ. प्रभाकर सावंत, जिल्हा मंत्री जवाहर छाबडा, सहमंत्री श्रीकांत पोतनीस, न्यूझीलंडचे खासदार महेश बिंद्रा आमदार राजेश क्षीरसागर, बंडा साळोखे, महेश उरसाल, महेश जाधव, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, आदी उपस्थित होते. साध्वींचा नथुराम बाणा महात्मा गांधीजींनी भारताची फाळणी करून देशाची वाट लावली. देशाला त्यांच्या शांतीच्या मार्गाची नाही, तर क्रांतीची गरज आहे. साबरमती के संत अर्थात गांधीजींनी कोणतीही कमाल-बिमाल केली नाही, असा सरळसरळ नथुराम गोडसे बाणाही साध्वी सरस्वतींनी दाखविला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींची आक्रमकता प्रचंड वाढल्याचे साध्वी सरस्वती, तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या भाषणांतून दिसून आले.