शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

‘घर-वापसी’ मोहीम सुरूच राहणार

By admin | Updated: January 28, 2015 01:01 IST

व्यंकटेश आबदेव : विश्व हिंदू परिषद सुवर्णमहोत्सवी सोहळा

कोल्हापूर : गेल्या अनेक शतकांत हिंदू धर्मियांचे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांतर झाले. अशा धर्मांतरित हिंदूंना परत आणण्याचे काम ‘घर-वापसी’च्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद करत आहे. ‘घर-वापसी’ आणि धर्मांतर यामध्ये फरक आहे. ‘घर-वापसी’चे काम सुरूच राहणार असून, धर्मांतर बंदी कायद्यासाठी मात्र व्हीएचपी ठाम आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिंंदू रणरागिनी साध्वी बालिका सरस्वती उपस्थित होत्या. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर काल, सोमवारी सायंकाळी हे संमेलन झाले. साध्वी बालिका सरस्वती यांनी मुस्लिमांचे आरक्षण बंद केले पाहिजे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘व्होट बँके’साठी मुस्लिमांचे सुरू असलेले लांगुनचालन थांबवले पाहिजे, गो हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी, ‘लव्ह जिहाद’ रोखावा, भारताच्या फाळणीस महात्मा गांधी जबाबदार असल्यामुळे चलनी नोटावर गांधीजींऐवजी छत्रपती शिवरायांची प्रतिमा छापावी, अशी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतसंघटन मंत्री भाऊराव कुदळे, बजरंग दलाचे नेते शंकर गायकर पू. पू. ईश्वर महास्वामी, संतोष तथा बाळ महाराज, आदींची भाषणे झाली. यावेळी विश्व हिंंदू परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कॅ. प्रभाकर सावंत, जिल्हा मंत्री जवाहर छाबडा, सहमंत्री श्रीकांत पोतनीस, न्यूझीलंडचे खासदार महेश बिंद्रा आमदार राजेश क्षीरसागर, बंडा साळोखे, महेश उरसाल, महेश जाधव, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, आदी उपस्थित होते. साध्वींचा नथुराम बाणा महात्मा गांधीजींनी भारताची फाळणी करून देशाची वाट लावली. देशाला त्यांच्या शांतीच्या मार्गाची नाही, तर क्रांतीची गरज आहे. साबरमती के संत अर्थात गांधीजींनी कोणतीही कमाल-बिमाल केली नाही, असा सरळसरळ नथुराम गोडसे बाणाही साध्वी सरस्वतींनी दाखविला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींची आक्रमकता प्रचंड वाढल्याचे साध्वी सरस्वती, तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या भाषणांतून दिसून आले.