शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

कोल्हापुरात घरांचा पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:19 IST

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांतून होत असलेला विरोध लक्षात घेता, उपलब्ध जागेवर स्वतंत्र घरे ...

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पीपीपी तत्त्वावर गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांतून होत असलेला विरोध लक्षात घेता, उपलब्ध जागेवर स्वतंत्र घरे बांधण्याचा पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून, तो यशस्वी झाला तरच अन्य ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या अशा पथदर्शी प्रकल्पाचे आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे.देशातील प्रत्येक कुटुंबाला २०२२ सालापर्यंत स्वत:चे हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने संपूर्ण देशभरात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हा गृहप्रकल्प तीन प्रकारांचा आहे. पहिल्या प्रकारात ज्यांची स्वत:ची जागा आहे; परंतु घर बांधण्यास पैसे नाहीत, अशा व्यक्तींना सहा टक्के व्याजदराने दहा लाखांपर्यंत कर्ज देणे व त्यांना अडीच लाखांचे अनुदान, दुसऱ्या प्रकारात ज्यांची जागा नाही त्यांना सदनिका व अडीच लाखांचे अनुदान, तर तिसºया प्रकारात झोपडपट्ट्यांचा विकास करून सदनिका देण्यात येणार आहेत.कोल्हापूर शहरात सुमारे आठ हजारांहून अधिक नागरिकांचे सदनिका व स्वत:च्या जागेत घर बांधण्यासाठीचे कर्ज व अनुदान मिळण्याचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले आहेत; तर महापालिका प्रशासनामार्फत संभाजीनगर कामगार चाळ, बोंद्रेनगर, साळोखे पार्क, कदमवाडी अशा चार ठिकाणी झोपडपट्टी विकास करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.झोपडपट्टीच्या ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यास नागरिकांचा विरोध होत असून, आम्हाला घरे नकोत असे सांगण्यास सुरुवात झाली आहे. चार झोपडपट्ट्यांचे प्र्रस्ताव ‘म्हाडा’च्या पुणे कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांची छाननी व मंजुरीचे काम सुरू असतानाच नागरिकांकडून खो बसत असल्याने महापालिका अधिकारी काहीसे नाराज झालेले आहेत. जर नागरिकांचाच विरोध होणार असेल तर गृहप्रकल्प राबविणे योग्य नाही, असे अधिकाºयांचे मत बनले आहे.झोपडपट्ट्यांचा विकास करताना प्रत्येकाला स्वतंत्र घर पाहिजे आहे. त्यामुळे प्रशासनासमोर एक पर्याय आलेला आहे. सध्या जेथे लोक राहतात त्याच जागेवर त्यांना स्वतंत्र घरे बांधून देण्याचा हा पर्याय आहे. त्याकरिता बोंद्रेनगर येथे एक पथदर्शी प्रकल्प तयार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.बोंद्रेनगरातील जागेवर एकसारखी ८४ घरे कशी बांधता येतील, याचे आराखडे तयार केले जातआहेत. हा प्रकल्प यशस्वीझाला आणि लोकांचा त्यालापाठिंबा मिळाला तर अन्यठिकाणीही असा प्रकल्प राबविता येईल, असा अधिकाºयांना विश्वास वाटतो.