शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बिंदू चौकात कृषी विधेयकांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

कोल्हापूर : माेदी सरकार चले जाव, दादागिरी नही चलेगी, मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत अन्यायकारक तीन कृषी ...

कोल्हापूर : माेदी सरकार चले जाव, दादागिरी नही चलेगी, मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत अन्यायकारक तीन कृषी कायदे व वीज बिल विधेयकांची शुक्रवारी संध्याकाळी बिंदू चौकात होळी करण्यात आली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, रवी जाधव, टी.एस. पाटील, संभाजी जगदाळे, रमेश वडणगेकर यांनी केले.

कृषी कायदे रद्दच्या मागणीसाठी गेले दोन महिने दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत; पण त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. आता न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती दिली असली तरी लढा थांबलेला नाही. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी बिंदू चौकात हे आंदोलन केले. हे कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार आहे. दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असे नामदेव गावडे, संभाजी जगदाळे, सतीशचंद्र कांबळे यांनी मनोगतात सांगितले. कोणत्याही आंदोलनात कोल्हापूरकर कायमच आघाडीवर असतात, या आंदोलनातही कायमच आघाडीवर राहू, असे चंद्रकांत यादव यांनी सांगितले.

फोटो: १५०१२०२१-कोल-कृषी होळी

फोटो ओळ: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी बिंदू चौकात कृषी कायद्यांची होळी करण्यात आली.

(छाया: आदित्य वेल्हाळ)