शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोल्हापूरचा कुस्ती इतिहासही अधोरेखित व्हावा

By admin | Updated: June 9, 2017 01:18 IST

हिंदकेसरी दीनानाथसिंह; महावीर फोगाट यांच्यावर आधारित ‘आखाडा’ पुस्तक प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दुसऱ्याच्या इतिहासावर किती दिवस टाळ्या वाजवायच्या? आता कोल्हापूरच्या कुस्तीचा इतिहासही अधोरेखित होऊ द्या. आपल्याकडेही कुस्तीतील दिग्गज रत्ने आहेत, असे प्रतिपादन हिंदकेसरी दीनानाथसिंह यांनी गुरुवारी केले. शाहू स्मारक भवन येथे महावीरसिंग फोगाट यांच्या संघर्षमय सत्यकथेवर आधारित ‘आखाडा’ पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ‘लेकींना उतरू द्या आखाड्यात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंदकेसरी गणपतराव आंदळकर होते. दीनानाथसिंह म्हणाले, काही वर्षांपूर्वी सातारा येथे कौशल्या वाघ नावाच्या मुलीने मुलांबरोबर कुस्ती करण्याचा आग्रह धरला. त्यात मी स्वत: व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी मारुती माने उपस्थित होतो. त्यात गणपतरावांनी त्या मुलीला तुला जोड नाही म्हणून हटकले. त्यानंतर कौशल्या आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली. अखेरीस आम्हाला तिच्याबरोबर एक युवा मल्ल खेळवावा लागला. तिने घुटना डावावर त्या पुरुष मल्लालाच चितपट केले. ‘दंगल’मधून अमीरखानने फोगाट परिवाराचा संघर्ष अधोरेखित केला. असाच मिल्खासिंग यांचाही इतिहास ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून समोर आला. त्याप्रमाणे आपल्या कोल्हापूरच्या लाल मातीतील इतिहास अधोरेखित व्हावा.पुस्तकाच्या अनुवादिका लीना सोहोनी म्हणाल्या, ‘दंगल’मध्ये फोगाट यांचा संघर्षमय जीवनपट लेखक सौरभ दुग्गल यांनी मांडला आहे. लेखक सौरभ दुग्गल म्हणाले, मला वाटायचे, २००६ साली मास्टर चंदगीराम यांनी कुस्तीपटूने आयुष्यात एकदा तरी कोल्हापूरला भेट द्यावी अन्यथा त्या कुस्तीपटूचे जीवन निरर्थक आहे, असे भेटीदरम्यान सुनावले होते. २००९ साली गीता, बबिता आशियाई व पुढे लंडन आॅलिम्पिकमध्ये भेटल्या. त्यांचा इतिहास ‘आखाडा’रूपाने शब्दबद्ध केला. ’मेहता’चे सुनील मेहता यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर स्नेहा दुर्गुळे-इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. हिंदकेसरींना पद्मश्री द्या!फोगाट यांच्यासारखे काम कोल्हापूरच्या कुस्तीतही झाले आहे. त्या कुस्तीरत्नांपैकी शाहूनगरीचे पुत्र हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व सांगलीचे स्वर्गीय हिंदकेसरी मारुती माने यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार द्यावा. आम्ही पैलवान गडी असल्याने उपोषणास बसू शकत नाही; तरी शासनाने याची दखल घ्यावी, असे आवाहनही दीनानाथसिंह यांनी केले. पुस्तक प्रकाशनप्रसंगी कोल्हापुरातील महिला कुस्तीगीर अंकिता शिंदे, सृष्टी भोसले, वैष्णवी कुशाप्पा यांचा सत्कार हिंदकेसरी दीनानाथसिंह व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या हस्ते झाला.