शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘बहुजनपर्व’ उलगडणार नव्वद वर्र्षांचा इतिहास

By admin | Updated: November 28, 2014 00:04 IST

ग्रंथ प्रकाशन बुधवारी : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या समग्र माहितीचा समावेश

कोल्हापूर : जातिभेदाची भिंत तोडल्याशिवाय बहुजन समाजाची प्रगती होणार नाही. मागासलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रथम राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याशिवाय अशा मुलांना शिक्षण मिळणार नाही; म्हणून शाहू महाराजांनी संस्थानकाळात २३ वसतिगृहे सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी सुरू केली. त्यांपैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचा नव्वद वर्षांचा इतिहास ‘बहुजनपर्व’ या ग्रंथरूपाने बुधवारी (दि. ३ डिसेंबर) सर्वांसमोर उलगडणार आहे. या ग्रंथात नव्वद वर्षांतील संस्थेमधील शिकून गेलेल्या थोर व्यक्ती, अध्यक्ष, ज्यांनी संस्था उभारण्यासाठी मदत केली, त्यांच्याबद्दलची सम्रग माहिती जगासमोर पुस्तकरूपाने मांडली जाणार आहे. १५ जुलै १९२० साली शाहू महाराज यांनी द्वितीय सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मरणार्थ प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. आजपर्यंत या संस्थेमध्ये लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली व देशाची प्रगती केली. संस्थेच्या प्रगतीचा वेग आणि इतिहास आजच्या पिढीसमोर पुस्तकरूपाने यावा, यासाठी अध्यक्ष डी. बी. पाटील यांच्या पुढाकाराने ७५० पानांचा हा सम्रग ग्रंथ तयार केला आहे. यामध्ये त्याकाळी मदत केलेल्या बाबूराव सासने, टी. वाय. भोईटे, सुबराव निकम, हौसाबाई जाधव, अण्णासाहेब मोरे यांच्याबरोबर प्राचार्य पी. बी. पाटील, पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, साहित्यिक आनंद यादव, हुतात्मा नारायण वारके, माजी कुलगुरू रामचंद्र कणबरकर, कॉम्रेड दत्ता देशमुख, गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार, डॉ. बी. एम. हिर्डेकर, आदींनी या संस्थेतून शिक्षण घेतले आहे. अशा एक ना अनेक दिग्गजांच्या कार्याचा आढावा या ग्रंथातून घेतला आहे. बुधवारी (दि. ३) संस्थेचे माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथरूपी इतिहासाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी ग्रंथासाठी प्रस्तावना, ए. जी. वणिरे यांनी लेखन आणि प्रा. सी. एम. गायकवाड यांनी संपादन केले आहे. (प्रतिनिधी)वार लावून जेवण्याचा उल्लेखत्याकाळी बहुजन समाजातील मुलांना शिकण्यासाठी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालय होते. मात्र, या कॉलेजमध्ये केवळ शिक्षण घेता येत होते. राहण्यासाठी या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचाच आधार त्याकाळी मुलांना असे. अशा काळात या विद्यार्थ्यांना वार लावून जेवण्यासाठी ३२३ जणांनी मदत केली. त्यांच्याही नावांचा व कार्याचा उल्लेख या ग्रंथात आहे. कोल्हापूर ही वसतिगृहांची मातानाशिक येथे शाहू महाराज एका कार्यक्रमानिमित्त गेले असता भाषणात त्यांनी ‘कोल्हापूर ही वसतिगृहांची माता’ असल्याचा उल्लेख केला. त्यांच्याच दातृत्वामुळे कोल्हापुरात २३ वसतिगृहांची निर्मिती झाली. त्यापैकी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग एक आहे.