शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बहुजन मूक बनल्याने इतिहासाची विकृती : अमोल मिठकरी --कागल येथे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:45 IST

कागल : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर येत नाही कारण आम्ही बहुजन मूक बनल्याने आमच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले, असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. अमोल मिठकरी यांनी मांडले.कागल येथील शिवशाहू विचारमंच आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त ...

कागल : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर येत नाही कारण आम्ही बहुजन मूक बनल्याने आमच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले, असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. अमोल मिठकरी यांनी मांडले.कागल येथील शिवशाहू विचारमंच आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ होते.अमोल मिठकरी म्हणाले, संत तुकारामांच्या लेखणीतून शिवशाही निर्माण झाली, तर रामदासांच्या लेखणीतून पेशवाई उदयास आली. कवी परमानंदांनी छत्रपती शिवरायांवर पहिला ग्रंथ लिहिला. त्याचे नाव ‘शिवभारत’ होते. ‘शिव हिंदुस्थान’ असे नव्हते. शिवरायांनी किल्ल्यांवर गजशाळा, अश्वशाळा बांधल्या; मात्र गोशाळा नाही. अफझलखानाचा कोथळा तर काढलाच; पण त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीलाही ठार केले. त्याच अफझलखानाची कबर बांधली; पण कुलकर्णी याची नाही.यावेळी के. पी. पाटील, नगराध्यक्षा माणिक माळी, भैया माने, चंद्रकांत गवळी, युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, राजू लाटकर, प्रकाश गाडेकर उपस्थित होते. गैबी चौकात झालेल्या या व्याख्यानास गर्दी झाली होती. प्रवीण काळबर यांनी स्वागत, तर नितीन दिंडे यांनी आभार मानले.राजकीय टीका-टिप्पणीमिठकरी म्हणाले, की आमचा बहुजनांचा ‘गण’ राक्षस गण असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील ‘मी राक्षस आहे’ असे जाहीर करतात. आमच्याकडे इंद्र देव पूजला जात नाही; पण तरीही आमच्या डोक्यावर देवेंद्र, नरेंद्र आणि सगळे दारिद्र्य ठेवले आहे. तुम्ही किती वर्षे राम मंदिर बांधतो बांधतो म्हणून सांगत आलात; पण आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये राम मंदिर बांधून दाखविले आहे.वारसा सांगू नयेमिठकरी म्हणाले, ज्यांना नीट शिवाजी महाराज कळाले नाहीत, त्यांना ‘शाहू’ महाराज काय कळणार? ज्यांना छत्रपतींचे विचार जपता येत नाहीत त्यांनी ‘शाहूं’च्या रक्ताचा वारसा सांगू नये. हा रक्ताचा वारसा कितीजणांना माहीत आहे हे मला माहीत नाही; पण शाहूंच्या विचारांचा वारसा आम्हाला आहे. आमदार हसन मुश्रीफांना आहे आणि विचारांचा वारसा कधी बेईमान होत नाही.