शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

चाफेवाडी-धुमाळवाडीजवळ डोंगर खचला

By admin | Updated: July 13, 2016 00:40 IST

जीवितहानी नाही : पाच एकर शेतीचे नुकसान, शेतजमीन व विहीर भुईसपाट

धामोड / कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील चाफेवाडी-धुमाळवाडी गावादरम्यान तुळशी नदी पुलानजीकचा रस्त्याच्या वरील बाजूस असणारा एक हजार फूट उंचीचा डोंगर खचल्याने पाच एकर शेतीचे नुकसान झाले. संपूर्ण डोंगरच अतिवृष्टीने खचल्याने या पुलाजवळील ६०० फूट रस्ताही खचला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी या शेतातील ऊस, भात, पिकांबरोबर मोठ-मोठी झाडेही या मातीखाली गाडली गेली आहेत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खोदलेल्या विहिरीही जमीनदोस्त झाल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे.गेल्या चार दिवसांपासून या परिसरात पावसाने अक्षरश: थैमान घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दुर्गमानवाड-तळगाव मार्गावरील चाफेवाडी-धुमाळवाडी दरम्यान तुळशी नदीवर असणाऱ्या पुलाजवळील रस्त्याच्या वरील बाजूचा एक हजार फूट उंचीचा डोंगरच खचून खाली घसरल्याने जवळपास ६०० फूट लांबीचा रस्ता गायब झाला. रस्त्यासह खचलेल्या त्या मातीने पाच एकरांवरील ऊस व भातशेती गाडून टाकली. हा डोंगर इतक्या मोठ्या प्रमाणात खचला की, शेतामध्ये घसरणारी मोठ-मोठी झाडेही त्यात गाडली गेली आहेत. शेतातील विहिरी, मोटारपंप तर गायबच झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचे प्रमाण आजही जास्त असल्याने या मार्गावर कोणतीही रहदारी नव्हती. किंबहुना शेताकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चाफेवाडी ते धुमाळवाडी या रस्त्यावर खचलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भाऊ धोंडी काटकर यांची सात गुंठे शेतजमीन तर अतिवृष्टीमुळे खचून ती खचलेल्या रस्त्यावर आली. त्यामुळे यापूर्वीच खचलेल्या रस्त्याला वरील जमिनीचा मोठ्या प्रमाणातील भार सहन न झाल्याने रस्ता शेतजमिनीसह खालील बाजूस असणाऱ्या बाळू धोंडी काटकर यांच्यासह १५ गुंठे ऊस पिकाच्या शेतविहिरीत कोसळली. पडलेल्या दगड, मातीमुळे ही शेतजमीन व विहीर भुईसपाट झाली. याशिवाय बाळू काटकर, लहू काटकर, शंकर काटकर, हिंदुराव काटकर या शेतकऱ्यांच्याही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माळीण दुर्घटनेसारखी स्थिती येथे पाहावयास मिळत असून, पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने अजूनही डोंगर खचत आहे. या शेतकऱ्यांची शेतीच पूर्णत: मातीखाली गाडल्याने येथे आमची शेती होती का? या विचारात इथला शेतकरी उद्विग्न मनाने विचार करीत होता. लोकांना सध्या या मार्गावरून रस्ताच नसल्याने येत्या काही दिवसांत डोंगरातूनच मार्ग काढावा लागणार आहे. अधिकारी, आमदार धावलेया घटनेची माहिती कळताच राधानगरीचे तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी एच. डी. नाईक, मंडल अधिकारी, तलाठी तसेच आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती अभिजित तायशेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; पण मंगळवारीही पावसाचे प्रमाण कायम असल्याने सुमाळवाडी-बेरकळवाडी ग्रामस्थांना कोणतेच मदतकार्य करता आले नाही.अतिवृष्टीमुळे हा डोंगर खचला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ताही खचल्याने या लोकांना कोणतीच मदत पुरविता येत नाही. पण, पर्यायी रस्ता करून मदत करण्यात येईल व या लोकांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात येईल.- शिवाजी शिंदे, तहसीलदार, राधानगरी.