शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

चाफेवाडी-धुमाळवाडीजवळ डोंगर खचला

By admin | Updated: July 13, 2016 00:40 IST

जीवितहानी नाही : पाच एकर शेतीचे नुकसान, शेतजमीन व विहीर भुईसपाट

धामोड / कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील चाफेवाडी-धुमाळवाडी गावादरम्यान तुळशी नदी पुलानजीकचा रस्त्याच्या वरील बाजूस असणारा एक हजार फूट उंचीचा डोंगर खचल्याने पाच एकर शेतीचे नुकसान झाले. संपूर्ण डोंगरच अतिवृष्टीने खचल्याने या पुलाजवळील ६०० फूट रस्ताही खचला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी या शेतातील ऊस, भात, पिकांबरोबर मोठ-मोठी झाडेही या मातीखाली गाडली गेली आहेत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खोदलेल्या विहिरीही जमीनदोस्त झाल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे.गेल्या चार दिवसांपासून या परिसरात पावसाने अक्षरश: थैमान घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दुर्गमानवाड-तळगाव मार्गावरील चाफेवाडी-धुमाळवाडी दरम्यान तुळशी नदीवर असणाऱ्या पुलाजवळील रस्त्याच्या वरील बाजूचा एक हजार फूट उंचीचा डोंगरच खचून खाली घसरल्याने जवळपास ६०० फूट लांबीचा रस्ता गायब झाला. रस्त्यासह खचलेल्या त्या मातीने पाच एकरांवरील ऊस व भातशेती गाडून टाकली. हा डोंगर इतक्या मोठ्या प्रमाणात खचला की, शेतामध्ये घसरणारी मोठ-मोठी झाडेही त्यात गाडली गेली आहेत. शेतातील विहिरी, मोटारपंप तर गायबच झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचे प्रमाण आजही जास्त असल्याने या मार्गावर कोणतीही रहदारी नव्हती. किंबहुना शेताकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चाफेवाडी ते धुमाळवाडी या रस्त्यावर खचलेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूला असणाऱ्या भाऊ धोंडी काटकर यांची सात गुंठे शेतजमीन तर अतिवृष्टीमुळे खचून ती खचलेल्या रस्त्यावर आली. त्यामुळे यापूर्वीच खचलेल्या रस्त्याला वरील जमिनीचा मोठ्या प्रमाणातील भार सहन न झाल्याने रस्ता शेतजमिनीसह खालील बाजूस असणाऱ्या बाळू धोंडी काटकर यांच्यासह १५ गुंठे ऊस पिकाच्या शेतविहिरीत कोसळली. पडलेल्या दगड, मातीमुळे ही शेतजमीन व विहीर भुईसपाट झाली. याशिवाय बाळू काटकर, लहू काटकर, शंकर काटकर, हिंदुराव काटकर या शेतकऱ्यांच्याही शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माळीण दुर्घटनेसारखी स्थिती येथे पाहावयास मिळत असून, पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने अजूनही डोंगर खचत आहे. या शेतकऱ्यांची शेतीच पूर्णत: मातीखाली गाडल्याने येथे आमची शेती होती का? या विचारात इथला शेतकरी उद्विग्न मनाने विचार करीत होता. लोकांना सध्या या मार्गावरून रस्ताच नसल्याने येत्या काही दिवसांत डोंगरातूनच मार्ग काढावा लागणार आहे. अधिकारी, आमदार धावलेया घटनेची माहिती कळताच राधानगरीचे तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी एच. डी. नाईक, मंडल अधिकारी, तलाठी तसेच आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण खात्याचे सभापती अभिजित तायशेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; पण मंगळवारीही पावसाचे प्रमाण कायम असल्याने सुमाळवाडी-बेरकळवाडी ग्रामस्थांना कोणतेच मदतकार्य करता आले नाही.अतिवृष्टीमुळे हा डोंगर खचला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ताही खचल्याने या लोकांना कोणतीच मदत पुरविता येत नाही. पण, पर्यायी रस्ता करून मदत करण्यात येईल व या लोकांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात येईल.- शिवाजी शिंदे, तहसीलदार, राधानगरी.