शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात अतिवृष्टीने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:58 IST

कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला.

ठळक मुद्दे उपनगरांत हाहाकार : ५०० हून अधिक घरांत पाणी; अनेक वाहने वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरल्याने प्रापंचिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरांत शिरलेले पाणी, खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.

अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या-छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना, त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाला बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की, अवघ्या काही मिनिटांत शहरातील ओढे, नाले, गटारी ओसंडून वाहायला लागले. शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या-छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यादा सोडली आणि घरांत पाणी शिरायला सुरुवात झाली. शहरात अनेक घरांतून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यांत पाणी शिरल्याने त्यांतील घाण घरात पसरली. जोराचा पाऊस आणि घरात पाणी आल्यामुळे लोकांची भीतीने गाळण उडाली.दोन तासांत तब्बल ७३ मिलिमीटर पाऊस !शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री बारा ते दोन या दोन तासांत चक्क ७३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. करवीर मंडल हद्दीत ७३ मिलिमीटर, कसबा बावडा मंडल हद्दीत ७३, तर निगवे दुमाला हद्दीत ८२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून पावसाने शहर परिसरात किती धुमाकूळ घातला, हे दिसून येते. सर्वसाधारण ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला की अतिवृष्टी समजण्यात यावी, असा शासकीय नियम आहे. अतिवृष्टीमुळे जे आर्थिक नुकसान होईल, त्याची भरपाई राज्य सरकारकडून केली जाते. 

नुकसानभरपाईचे आदेश; ‘रेड झोन’मध्येहीलक्ष घालू : चंद्रकांतदादा पाटीलशहरामध्ये बुधवारी (दि. १३) रात्री कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्याची नुकसानभरपाई राज्य शासन देईल. शहरातील ‘रेड झोन’मध्येही लक्ष घालू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे झालेल्या भाजप-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.पालकमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, ते का झाले याचीही चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आदेश दिले आहे. रेड झोन हा गंभीर विषय आहे. त्यात हात घालण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सरकार चालू देणार नाही. रेड झोनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ.