शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोल्हापुरात अतिवृष्टीने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:58 IST

कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला.

ठळक मुद्दे उपनगरांत हाहाकार : ५०० हून अधिक घरांत पाणी; अनेक वाहने वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरल्याने प्रापंचिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरांत शिरलेले पाणी, खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.

अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या-छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना, त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाला बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की, अवघ्या काही मिनिटांत शहरातील ओढे, नाले, गटारी ओसंडून वाहायला लागले. शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या-छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यादा सोडली आणि घरांत पाणी शिरायला सुरुवात झाली. शहरात अनेक घरांतून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यांत पाणी शिरल्याने त्यांतील घाण घरात पसरली. जोराचा पाऊस आणि घरात पाणी आल्यामुळे लोकांची भीतीने गाळण उडाली.दोन तासांत तब्बल ७३ मिलिमीटर पाऊस !शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री बारा ते दोन या दोन तासांत चक्क ७३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. करवीर मंडल हद्दीत ७३ मिलिमीटर, कसबा बावडा मंडल हद्दीत ७३, तर निगवे दुमाला हद्दीत ८२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून पावसाने शहर परिसरात किती धुमाकूळ घातला, हे दिसून येते. सर्वसाधारण ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला की अतिवृष्टी समजण्यात यावी, असा शासकीय नियम आहे. अतिवृष्टीमुळे जे आर्थिक नुकसान होईल, त्याची भरपाई राज्य सरकारकडून केली जाते. 

नुकसानभरपाईचे आदेश; ‘रेड झोन’मध्येहीलक्ष घालू : चंद्रकांतदादा पाटीलशहरामध्ये बुधवारी (दि. १३) रात्री कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्याची नुकसानभरपाई राज्य शासन देईल. शहरातील ‘रेड झोन’मध्येही लक्ष घालू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे झालेल्या भाजप-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.पालकमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, ते का झाले याचीही चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आदेश दिले आहे. रेड झोन हा गंभीर विषय आहे. त्यात हात घालण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सरकार चालू देणार नाही. रेड झोनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ.