शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोल्हापुरात अतिवृष्टीने दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:58 IST

कोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला.

ठळक मुद्दे उपनगरांत हाहाकार : ५०० हून अधिक घरांत पाणी; अनेक वाहने वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विजांच्या कडकडाटासह बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात एकच हाहाकार उडाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहने वाहून गेली. पाचशेहून अधिक घरांत पाणी शिरल्याने प्रापंचिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. तीन ठिकाणी तर रस्ते खचले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जोरात कोसळणारा पाऊस, घरांत शिरलेले पाणी, खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे सर्वत्र घबराट पसरली. त्यामुळे बुधवारची रात्र कोल्हापूरकरांनी जागून काढली.

अतिवृष्टीमुळे शहरातील जयंती नाला, गोमती नाला तसेच छोट्या-छोट्या ओढ्यांना लागून असलेल्या घरांना, त्याचबरोबर शहरातील सखल भागातील घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाला बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. सुमारे दोन तास अखंड पाऊस पडत होता. पाऊस इतका प्रचंड होता की, अवघ्या काही मिनिटांत शहरातील ओढे, नाले, गटारी ओसंडून वाहायला लागले. शहरातील जयंती नाला, गोमती नाला, शाम हौसिंग सोसायटी नाल्यासह अन्य छोट्या-छोट्या बारा नाल्यांनी आपली मर्यादा सोडली आणि घरांत पाणी शिरायला सुरुवात झाली. शहरात अनेक घरांतून तीन ते चार फुटांपर्यंत पाणी शिरले. शौचालयाच्या टाक्यांत पाणी शिरल्याने त्यांतील घाण घरात पसरली. जोराचा पाऊस आणि घरात पाणी आल्यामुळे लोकांची भीतीने गाळण उडाली.दोन तासांत तब्बल ७३ मिलिमीटर पाऊस !शहर परिसरात बुधवारी मध्यरात्री बारा ते दोन या दोन तासांत चक्क ७३ मिलिमीटर पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. करवीर मंडल हद्दीत ७३ मिलिमीटर, कसबा बावडा मंडल हद्दीत ७३, तर निगवे दुमाला हद्दीत ८२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून पावसाने शहर परिसरात किती धुमाकूळ घातला, हे दिसून येते. सर्वसाधारण ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला की अतिवृष्टी समजण्यात यावी, असा शासकीय नियम आहे. अतिवृष्टीमुळे जे आर्थिक नुकसान होईल, त्याची भरपाई राज्य सरकारकडून केली जाते. 

नुकसानभरपाईचे आदेश; ‘रेड झोन’मध्येहीलक्ष घालू : चंद्रकांतदादा पाटीलशहरामध्ये बुधवारी (दि. १३) रात्री कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्याची नुकसानभरपाई राज्य शासन देईल. शहरातील ‘रेड झोन’मध्येही लक्ष घालू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. ताराबाई पार्क येथील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे झालेल्या भाजप-ताराराणी आघाडी पक्ष कार्यकर्ता मेळावा व प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.पालकमंत्री म्हणाले, अवकाळी पावसामुळे बुधवारी रात्री ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, ते का झाले याचीही चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना आदेश दिले आहे. रेड झोन हा गंभीर विषय आहे. त्यात हात घालण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की, या शहरात कोणतेही बेकायदेशीर कृत्य सरकार चालू देणार नाही. रेड झोनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ.