शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उष्णतेचा १० वर्षांतील उच्चांक; पारा ४१ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:42 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश सेल्सिअसला जाऊन टेकला. एप्रिल महिन्यात मागील १0 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. कोल्हापूरच्या सरासरी तापमानात नऊ डिग्रीने वाढ झाल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक तापमानवाढीची झळ सगळ्यांनाच बसत आहे.तापमान वाढीस वृक्षतोडीसह अनेक कारणे आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचनाही दिल्या होत्या, पण त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. गेल्या १0-१५ वर्षांत तापमानात हळूहळू वाढ होत गेली, पण यंदाइतके तापमान गेल्या १0 वर्षांत वाढलेले नाही. यंदा जानेवारीपासूनच कडाक्याचे ऊन सुरू झाले. फेबु्रवारी, मार्चमध्ये तीव्रता वाढून सरासरी तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एप्रिल, मे महिन्यांत पारा काय असणार? याचा अंदाज आला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत गेली असून, आता हे तापमान ४१ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.जिल्ह्यात २०१० पासूनच्या तापमानाची आकडेवारी पाहिली, तर इतकी वाढ कधीच झाली नव्हती. मागील १0 वर्षांत २६ एप्रिलचे सरासरी तापमान किमान २५, तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत राहिले; पण यावर्षी २६ एप्रिलचे तापमान किमान २५, तर कमाल ४१ डिग्री आहे. १0 वर्षांच्या तुलनेत सरासरी किमान तापमानात फारसा फरक पडला नाही; पण कमाल तापमानात तब्बल नऊ डिग्रीने वाढ झाली आहे.उष्माघाताचे प्रमाण वाढलेजीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठ दिवस पारा वाढत जाणार असल्याने उष्म्याच्या तडाक्याने वयोवृद्ध नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.जास्त वजन असणाऱ्या, रक्तदाब, साखरेच्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास अधिक होऊ शकतो. बुरशीजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.नागरिकांनी काय करावेशक्य असल्यास दिवसातून दोनवेळा अंघोळ करावी.स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत.फ्रीजमधील एकदम थंड पदार्थ खाऊ नयेत.थंड माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.दिवसाला साधारणत: ३ ते ४ लिटर पाणी प्यायला पाहिजे.फ्रुट ज्यूस, लिंबू सरबत घ्यावे.तापमानवाढीचे परिणामबाष्पीभवन झपाट्यानेहोऊन पाणीसाठेमोकळे होतात.वादळी पाऊस, एकाच ठिकाणी अतिवृष्टीहोऊन नुकसानपिकांच्या उत्पादकतेत घटउष्म्यामुळे कीटक कमीहोऊन, परागीकरणथंडावते, परिणामी पिकांची उत्पादकता घटते.