शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

उष्णतेचा १० वर्षांतील उच्चांक; पारा ४१ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:42 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश सेल्सिअसला जाऊन टेकला. एप्रिल महिन्यात मागील १0 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. कोल्हापूरच्या सरासरी तापमानात नऊ डिग्रीने वाढ झाल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक तापमानवाढीची झळ सगळ्यांनाच बसत आहे.तापमान वाढीस वृक्षतोडीसह अनेक कारणे आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचनाही दिल्या होत्या, पण त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. गेल्या १0-१५ वर्षांत तापमानात हळूहळू वाढ होत गेली, पण यंदाइतके तापमान गेल्या १0 वर्षांत वाढलेले नाही. यंदा जानेवारीपासूनच कडाक्याचे ऊन सुरू झाले. फेबु्रवारी, मार्चमध्ये तीव्रता वाढून सरासरी तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एप्रिल, मे महिन्यांत पारा काय असणार? याचा अंदाज आला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत गेली असून, आता हे तापमान ४१ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.जिल्ह्यात २०१० पासूनच्या तापमानाची आकडेवारी पाहिली, तर इतकी वाढ कधीच झाली नव्हती. मागील १0 वर्षांत २६ एप्रिलचे सरासरी तापमान किमान २५, तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत राहिले; पण यावर्षी २६ एप्रिलचे तापमान किमान २५, तर कमाल ४१ डिग्री आहे. १0 वर्षांच्या तुलनेत सरासरी किमान तापमानात फारसा फरक पडला नाही; पण कमाल तापमानात तब्बल नऊ डिग्रीने वाढ झाली आहे.उष्माघाताचे प्रमाण वाढलेजीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठ दिवस पारा वाढत जाणार असल्याने उष्म्याच्या तडाक्याने वयोवृद्ध नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.जास्त वजन असणाऱ्या, रक्तदाब, साखरेच्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास अधिक होऊ शकतो. बुरशीजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.नागरिकांनी काय करावेशक्य असल्यास दिवसातून दोनवेळा अंघोळ करावी.स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत.फ्रीजमधील एकदम थंड पदार्थ खाऊ नयेत.थंड माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.दिवसाला साधारणत: ३ ते ४ लिटर पाणी प्यायला पाहिजे.फ्रुट ज्यूस, लिंबू सरबत घ्यावे.तापमानवाढीचे परिणामबाष्पीभवन झपाट्यानेहोऊन पाणीसाठेमोकळे होतात.वादळी पाऊस, एकाच ठिकाणी अतिवृष्टीहोऊन नुकसानपिकांच्या उत्पादकतेत घटउष्म्यामुळे कीटक कमीहोऊन, परागीकरणथंडावते, परिणामी पिकांची उत्पादकता घटते.