शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेचा १० वर्षांतील उच्चांक; पारा ४१ अंश सेल्सिअसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:42 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सूर्यनारायण आग ओकत असून, शुक्रवारी पारा ४१ अंश सेल्सिअसला जाऊन टेकला. एप्रिल महिन्यात मागील १0 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी झाली आहे. कोल्हापूरच्या सरासरी तापमानात नऊ डिग्रीने वाढ झाल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक तापमानवाढीची झळ सगळ्यांनाच बसत आहे.तापमान वाढीस वृक्षतोडीसह अनेक कारणे आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचनाही दिल्या होत्या, पण त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. गेल्या १0-१५ वर्षांत तापमानात हळूहळू वाढ होत गेली, पण यंदाइतके तापमान गेल्या १0 वर्षांत वाढलेले नाही. यंदा जानेवारीपासूनच कडाक्याचे ऊन सुरू झाले. फेबु्रवारी, मार्चमध्ये तीव्रता वाढून सरासरी तापमान ३५ डिग्रीपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एप्रिल, मे महिन्यांत पारा काय असणार? याचा अंदाज आला होता. त्यानुसार तापमानात वाढ होत गेली असून, आता हे तापमान ४१ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.जिल्ह्यात २०१० पासूनच्या तापमानाची आकडेवारी पाहिली, तर इतकी वाढ कधीच झाली नव्हती. मागील १0 वर्षांत २६ एप्रिलचे सरासरी तापमान किमान २५, तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत राहिले; पण यावर्षी २६ एप्रिलचे तापमान किमान २५, तर कमाल ४१ डिग्री आहे. १0 वर्षांच्या तुलनेत सरासरी किमान तापमानात फारसा फरक पडला नाही; पण कमाल तापमानात तब्बल नऊ डिग्रीने वाढ झाली आहे.उष्माघाताचे प्रमाण वाढलेजीवघेण्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आगामी आठ दिवस पारा वाढत जाणार असल्याने उष्म्याच्या तडाक्याने वयोवृद्ध नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.जास्त वजन असणाऱ्या, रक्तदाब, साखरेच्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास अधिक होऊ शकतो. बुरशीजन्य आजारांचे प्रमाणही वाढले आहे.नागरिकांनी काय करावेशक्य असल्यास दिवसातून दोनवेळा अंघोळ करावी.स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत.फ्रीजमधील एकदम थंड पदार्थ खाऊ नयेत.थंड माठातील किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.दिवसाला साधारणत: ३ ते ४ लिटर पाणी प्यायला पाहिजे.फ्रुट ज्यूस, लिंबू सरबत घ्यावे.तापमानवाढीचे परिणामबाष्पीभवन झपाट्यानेहोऊन पाणीसाठेमोकळे होतात.वादळी पाऊस, एकाच ठिकाणी अतिवृष्टीहोऊन नुकसानपिकांच्या उत्पादकतेत घटउष्म्यामुळे कीटक कमीहोऊन, परागीकरणथंडावते, परिणामी पिकांची उत्पादकता घटते.