शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

उद्ध्वस्त ऊस उत्पादकांना मदतीची आस

By admin | Updated: June 3, 2016 01:35 IST

सरकारचे दुर्लक्ष : २५ लाख टनांनी उत्पादन घटणार; शेतकऱ्यांचा आक्रोश; पंचनामे करण्याची मागणी

कोल्हापूर : पाच-सहा महिने पोटच्या पोरासारखा सांभाळ करून वाढविलेला ऊस डोळ्यांदेखत पाण्याविना करपू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या करपलेल्या उसाचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या भयावह स्थितीमुळे शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. किमान २५ लाख टन उसाचे उत्पादन घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकरी ऊस पेटवून देत आक्रोश करीत असताना सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे सधन जिल्हा म्हणून पाहिले जात होते; पण यंदा या सधन जिल्ह्यालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पंचगंगा व भोगावती खोऱ्यांत गेले पंधरा-वीस दिवस उपसाबंदी लागू आहे. पिकांना थेंबही पाणी नाही. त्यात उन्हाच्या कडाक्यामुळे ऊस करपून गेला. जिवापाड जोपासलेल्या उसाची अवस्था पाहून त्याकडे बघण्याचे धाडसही शेतकऱ्यांना होईना. वाळलेला ऊस शेतकरी कापून टाकत आहेत, तर काही शेतकरी तो थेट पेटवून देऊन आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांना याचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस करपल्याने या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांना आगामी हंगामात त्याचा फटका बसणार, हे नक्की आहे. ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘शाहू’, ‘मंडलिक’, ‘बिद्री’, ‘घोरपडे’ या कारखान्यांचे गळीत कमी होणार आहे. जिल्ह्यात आगामी हंगामात किमान २५ लाख टन ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. २५ लाख टन ऊस करपल्याने शेतकऱ्यांना सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसणार आहे. बियाणे, मशागत, पाणी व खतांसाठी हजारो रुपये खर्च झालेले आहेत. यासाठी बॅँकांकडून कर्जे घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. करपलेल्या उसाचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)