शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उद्ध्वस्त ऊस उत्पादकांना मदतीची आस

By admin | Updated: June 3, 2016 01:35 IST

सरकारचे दुर्लक्ष : २५ लाख टनांनी उत्पादन घटणार; शेतकऱ्यांचा आक्रोश; पंचनामे करण्याची मागणी

कोल्हापूर : पाच-सहा महिने पोटच्या पोरासारखा सांभाळ करून वाढविलेला ऊस डोळ्यांदेखत पाण्याविना करपू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या करपलेल्या उसाचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या भयावह स्थितीमुळे शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. किमान २५ लाख टन उसाचे उत्पादन घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकरी ऊस पेटवून देत आक्रोश करीत असताना सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे सधन जिल्हा म्हणून पाहिले जात होते; पण यंदा या सधन जिल्ह्यालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पंचगंगा व भोगावती खोऱ्यांत गेले पंधरा-वीस दिवस उपसाबंदी लागू आहे. पिकांना थेंबही पाणी नाही. त्यात उन्हाच्या कडाक्यामुळे ऊस करपून गेला. जिवापाड जोपासलेल्या उसाची अवस्था पाहून त्याकडे बघण्याचे धाडसही शेतकऱ्यांना होईना. वाळलेला ऊस शेतकरी कापून टाकत आहेत, तर काही शेतकरी तो थेट पेटवून देऊन आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांना याचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस करपल्याने या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांना आगामी हंगामात त्याचा फटका बसणार, हे नक्की आहे. ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘शाहू’, ‘मंडलिक’, ‘बिद्री’, ‘घोरपडे’ या कारखान्यांचे गळीत कमी होणार आहे. जिल्ह्यात आगामी हंगामात किमान २५ लाख टन ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. २५ लाख टन ऊस करपल्याने शेतकऱ्यांना सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसणार आहे. बियाणे, मशागत, पाणी व खतांसाठी हजारो रुपये खर्च झालेले आहेत. यासाठी बॅँकांकडून कर्जे घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. करपलेल्या उसाचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)