शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त ऊस उत्पादकांना मदतीची आस

By admin | Updated: June 3, 2016 01:35 IST

सरकारचे दुर्लक्ष : २५ लाख टनांनी उत्पादन घटणार; शेतकऱ्यांचा आक्रोश; पंचनामे करण्याची मागणी

कोल्हापूर : पाच-सहा महिने पोटच्या पोरासारखा सांभाळ करून वाढविलेला ऊस डोळ्यांदेखत पाण्याविना करपू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या करपलेल्या उसाचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या भयावह स्थितीमुळे शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. किमान २५ लाख टन उसाचे उत्पादन घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकरी ऊस पेटवून देत आक्रोश करीत असताना सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे सधन जिल्हा म्हणून पाहिले जात होते; पण यंदा या सधन जिल्ह्यालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पंचगंगा व भोगावती खोऱ्यांत गेले पंधरा-वीस दिवस उपसाबंदी लागू आहे. पिकांना थेंबही पाणी नाही. त्यात उन्हाच्या कडाक्यामुळे ऊस करपून गेला. जिवापाड जोपासलेल्या उसाची अवस्था पाहून त्याकडे बघण्याचे धाडसही शेतकऱ्यांना होईना. वाळलेला ऊस शेतकरी कापून टाकत आहेत, तर काही शेतकरी तो थेट पेटवून देऊन आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांना याचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस करपल्याने या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांना आगामी हंगामात त्याचा फटका बसणार, हे नक्की आहे. ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘शाहू’, ‘मंडलिक’, ‘बिद्री’, ‘घोरपडे’ या कारखान्यांचे गळीत कमी होणार आहे. जिल्ह्यात आगामी हंगामात किमान २५ लाख टन ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. २५ लाख टन ऊस करपल्याने शेतकऱ्यांना सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसणार आहे. बियाणे, मशागत, पाणी व खतांसाठी हजारो रुपये खर्च झालेले आहेत. यासाठी बॅँकांकडून कर्जे घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. करपलेल्या उसाचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)