शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मदत करू, साखर कारखाने सुरू करा; चंद्रकांत पाटील यांची कारखानदारांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:18 IST

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत ...

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत केली जाईल; पण साखर कारखाने सुरू करावेत अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना केली. ठोस मदतीची घोषणा केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार ठाम राहिले आहेत.बाजारातील साखरेचे दर पाहता शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सोडा; पण एकरकमी एफआरपी देणेही अवघड आहे. सरकारने मदत केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्याबरोबरच त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय शनिवारी कारखानदारांनी घेतला. त्यानुसार रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. साखरेचे दर, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची होणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बँकांकडून मिळणारी रक्कम आणि एफआरपीमधील तफावतीसाठी सरकारने मदत करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक बोलाविण्याची मागणी कारखानदारांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली. ज्या-ज्यावेळी साखर हंगाम अडचणीत आला, त्या-त्यावेळी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कमी पडणाºया रकमेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक लावली जाईल; पण तोपर्यंत कारखाने सुरू करा, अशी सूचना त्यांनी कारखानदारांना केली; पण कमी पडणाºया रकमेबाबत ठोस घोषणा होत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार आजच्या बैठकीत ठाम राहिले.बैठकीला हसन मुश्रीफ, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील, संजय मंडलिक, अशोक चराटी, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, हरीश चौगले, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांचा शेट्टींना टोलाएफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर पैसे द्यावेच असे कायद्यात नाही; पण ‘७०:३०’ फॉर्म्युल्यानुसार शेतकºयांना पैसे द्यावे लागतात, अशा शब्दांत ‘एफआरपी अधिक दोनशे’ या मागणीवर मंत्री पाटील यांनी राजू शेट्टी यांना टोला हाणला.आवाडे, यड्रावकर, गणपतरावांची बैठकबैठक संपल्यानंतर मंत्री पाटील यांच्यासह बहुतांशी कारखानदार शासकीय विश्रामगृहातून निघून गेले; पण प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील, प्रा. संजय मंडलिक पुन्हा विश्रामगृहातच एकत्र बसले. हंगाम लांबत चालला आहे, उसाची पळवापळवी सुरू झाल्याने ऊसटंचाईचा सामना करावा लागेल, अशी चर्चा यामध्ये झाल्याचे समजते.हंगामाची कोंडी कायमगेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांशी कारखाने सुरू झाले होते; पण यंदा दरावरून पेच निर्माण झाला असून, पालकमंत्री पाटील यांच्यासमवेतच्या बैठकीनंतरही हंगामाची कोंडी कायम राहिली आहे.