शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मदत करू, साखर कारखाने सुरू करा; चंद्रकांत पाटील यांची कारखानदारांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:18 IST

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत ...

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत केली जाईल; पण साखर कारखाने सुरू करावेत अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना केली. ठोस मदतीची घोषणा केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार ठाम राहिले आहेत.बाजारातील साखरेचे दर पाहता शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सोडा; पण एकरकमी एफआरपी देणेही अवघड आहे. सरकारने मदत केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्याबरोबरच त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय शनिवारी कारखानदारांनी घेतला. त्यानुसार रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. साखरेचे दर, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची होणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बँकांकडून मिळणारी रक्कम आणि एफआरपीमधील तफावतीसाठी सरकारने मदत करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक बोलाविण्याची मागणी कारखानदारांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली. ज्या-ज्यावेळी साखर हंगाम अडचणीत आला, त्या-त्यावेळी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कमी पडणाºया रकमेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक लावली जाईल; पण तोपर्यंत कारखाने सुरू करा, अशी सूचना त्यांनी कारखानदारांना केली; पण कमी पडणाºया रकमेबाबत ठोस घोषणा होत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार आजच्या बैठकीत ठाम राहिले.बैठकीला हसन मुश्रीफ, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील, संजय मंडलिक, अशोक चराटी, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, हरीश चौगले, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांचा शेट्टींना टोलाएफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर पैसे द्यावेच असे कायद्यात नाही; पण ‘७०:३०’ फॉर्म्युल्यानुसार शेतकºयांना पैसे द्यावे लागतात, अशा शब्दांत ‘एफआरपी अधिक दोनशे’ या मागणीवर मंत्री पाटील यांनी राजू शेट्टी यांना टोला हाणला.आवाडे, यड्रावकर, गणपतरावांची बैठकबैठक संपल्यानंतर मंत्री पाटील यांच्यासह बहुतांशी कारखानदार शासकीय विश्रामगृहातून निघून गेले; पण प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील, प्रा. संजय मंडलिक पुन्हा विश्रामगृहातच एकत्र बसले. हंगाम लांबत चालला आहे, उसाची पळवापळवी सुरू झाल्याने ऊसटंचाईचा सामना करावा लागेल, अशी चर्चा यामध्ये झाल्याचे समजते.हंगामाची कोंडी कायमगेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांशी कारखाने सुरू झाले होते; पण यंदा दरावरून पेच निर्माण झाला असून, पालकमंत्री पाटील यांच्यासमवेतच्या बैठकीनंतरही हंगामाची कोंडी कायम राहिली आहे.