शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मदत करू, साखर कारखाने सुरू करा; चंद्रकांत पाटील यांची कारखानदारांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 23:18 IST

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत ...

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमी देणे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांप्रमाणे त्यासाठी कमी पडणाऱ्या रकमेची मदत केली जाईल; पण साखर कारखाने सुरू करावेत अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना केली. ठोस मदतीची घोषणा केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार ठाम राहिले आहेत.बाजारातील साखरेचे दर पाहता शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सोडा; पण एकरकमी एफआरपी देणेही अवघड आहे. सरकारने मदत केल्याशिवाय हंगाम सुरू न करण्याबरोबरच त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय शनिवारी कारखानदारांनी घेतला. त्यानुसार रविवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. साखरेचे दर, बॅँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची होणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. बँकांकडून मिळणारी रक्कम आणि एफआरपीमधील तफावतीसाठी सरकारने मदत करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक बोलाविण्याची मागणी कारखानदारांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली. ज्या-ज्यावेळी साखर हंगाम अडचणीत आला, त्या-त्यावेळी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कमी पडणाºया रकमेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक लावली जाईल; पण तोपर्यंत कारखाने सुरू करा, अशी सूचना त्यांनी कारखानदारांना केली; पण कमी पडणाºया रकमेबाबत ठोस घोषणा होत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्यावर कारखानदार आजच्या बैठकीत ठाम राहिले.बैठकीला हसन मुश्रीफ, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील, संजय मंडलिक, अशोक चराटी, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, हरीश चौगले, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.पालकमंत्र्यांचा शेट्टींना टोलाएफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर पैसे द्यावेच असे कायद्यात नाही; पण ‘७०:३०’ फॉर्म्युल्यानुसार शेतकºयांना पैसे द्यावे लागतात, अशा शब्दांत ‘एफआरपी अधिक दोनशे’ या मागणीवर मंत्री पाटील यांनी राजू शेट्टी यांना टोला हाणला.आवाडे, यड्रावकर, गणपतरावांची बैठकबैठक संपल्यानंतर मंत्री पाटील यांच्यासह बहुतांशी कारखानदार शासकीय विश्रामगृहातून निघून गेले; पण प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील, प्रा. संजय मंडलिक पुन्हा विश्रामगृहातच एकत्र बसले. हंगाम लांबत चालला आहे, उसाची पळवापळवी सुरू झाल्याने ऊसटंचाईचा सामना करावा लागेल, अशी चर्चा यामध्ये झाल्याचे समजते.हंगामाची कोंडी कायमगेल्यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बहुतांशी कारखाने सुरू झाले होते; पण यंदा दरावरून पेच निर्माण झाला असून, पालकमंत्री पाटील यांच्यासमवेतच्या बैठकीनंतरही हंगामाची कोंडी कायम राहिली आहे.