शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी विद्यार्थ्यांची मदत घेणार

By admin | Updated: March 28, 2016 00:51 IST

गर्दीवेळी लाभ : सुटीच्या कालावधीसाठी कोल्हापूर विभागाचा अभिनव उपक्रम

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, असे ब्रीदवाक्य घेऊन चोवीस तास धावणाऱ्या एस.टी.च्या गैरसोयींमुळे प्रवासी एस.टी.पासून दूर जात असल्याची ओरड सर्व स्तरांतून होत आहे. मात्र, प्रवाशांचे आणि एस.टी.चे जिव्हाळ्याचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, प्रवाशांना सौजन्यपूर्वक सेवा मिळवून देण्यासाठी कोल्हापूर विभागाच्यावतीने गर्दीच्या हंगामात ‘आर.एस.पी.’ व ‘एन.सी.सी.’च्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.स्पर्धात्मक युगात नेटाने पुढे जाण्यासाठी लहान वयातच संस्कार रूजविण्यासाठी, तसेच मुलांतील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा विकास करणे क्रमप्राप्त आहे. आतापासूनच त्यांच्यामध्ये समाजसेवेचे धडे रूजविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने एक पाऊल पुढे टाकले आहे. सुटीच्या हंगामात प्रवाशांची बसस्थानकांवर गर्दी वाढत असते. अपुरे कर्मचारी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. गैरसोयीमुळे एस.टी. महामंडळाबद्दल प्रवाशांमधून नाराजी वाढते. याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे यासह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने गर्दीच्या हंगामात आर.एस.पी. व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आर.एस.पी. व एन.सी.सी.मधील ज्या विद्यार्थ्यांना सुटीचा सदुपयोग करायचा आहे किंवा समाजसेवेची आवड आहे, ते या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. सुटीच्या कालावधीत आपल्या वेळेनुसार किमान दोन ते तीन तास या उपक्रमात ते हातभार लावू शकतात. महामंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. असा आहे उपक्रम....गर्दीच्या काळात बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. बसस्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना गाडी कधी सुटणार आहे, कधी येणार आहे, कुठे लागली आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. महामंडळाकडे अपुरे कर्मचारी असल्याने प्रवाशांनाही याची सविस्तर माहिती मिळत नाही. अशा गोंधळलेल्या प्रवाशांना आर.एस.पी. व एन.सी.सी. विद्यार्थ्यांमार्फत गाडीची वेळ, ती कुठे जाणार, कधी येणार याची सविस्तर माहिती पुरविली जाणार आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा व दुपारी चार ते रात्री आठपर्यंत या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना महामंडळाच्यावतीने ठरावीक कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना महामंडळाचा कोणताही लाभ मिळणार नाही. गर्दीच्या कालावधीमध्ये बसस्थानकांवरील प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आर.एस.पी. व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांची मदत घेणार आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना विशेष प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. तरी ज्यांना या उपक्रमात मदत करायची असेल, त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे संपर्क साधावा. - अभय कदम, स्थानक प्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक