शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधीलकीतून ‘जिजाऊ’ हॉस्पीटलसाठी मदत करा : सुभाष देशमुख

By admin | Updated: June 4, 2017 15:11 IST

भागभांडवल गोळा करण्यास सुरूवात

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0४ : कोल्हापूर शहरात सुरू होणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ को. आॅप. हॉस्पीटल’ला सामाजिक बांधीलकीतून मदत करा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. उद्योजकांबरोबरच मोठ्या सहकारी संस्थांकडून भागभांडवल घेऊन गोरगरीब रूग्णांना मोफत सेवा द्या, असेही त्यांनी सागिंतले.

सहकार विभागाच्या वतीने कावळा नाका येथे ‘राजमाता जिजाऊ को. आॅप हॉस्पीटल’ सुरू होत आहे. त्याची आढावा बैठक मंत्री देशमुख यांनी रविवारी घेतले. सामान्य माणसांकडून एक हजाराचा शेअर्स घेऊन त्यांना उपचारात किती सवलत देणार? वैद्यकीय क्षेत्राशी स्पर्धा करत चांगली सेवा द्यायची म्हटले तर सवलतीवर मर्यादा येणार आहे. त्यासाठी मोठ्या संस्था व उद्योजकांनी भागभांडवल द्यावे. कोल्हापूरांनी मनात आणले तर काहीच अशक्य नाही. आपल्या व्यवसायातील अगदी अत्यल्प निधी हॉस्पीटलसाठी दिला तर चांगले हॉस्पीटल उभे राहील. असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

संकल्पना चांगली आहे, पण नियमित हॉस्पीटल सारखे सुरू केले तर त्याचा फायदा सामान्यांना होणार नाही. त्यापेक्षा मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभे राहिले तर अधिक चांगले असल्याचे डॉ. अशोक चौगुले यांनी सांगितले. ‘गोकुळ’चे संचालक अरूण डोंंगळे, अनिल नागराळे, सुरेंद्र जैन, अविनाश महागांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांनी हॉस्पीटलची संकल्पना सांगितली. सुनिल सुर्यंवंशी यांनी आभार मानले.

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, प्रा. संजय मंडलिक, बाबा देसाई, नामदेवराव भोईटे, पंडीतराव केणे, संजय जोशी, आर. डी. देसाई आदी उपस्थित होते.

परदेशात पैसे ठेवायला पैसे मोजावे लागतात

परदेशात उद्योजकांना ४ टक्के दराने कर्जे दिली जातात,त्याच धर्तीवर आपल्याकडे द्यावीत अशी मागणी सुरेंद्र जैन यांनी केली. यावर परदेशात कमी व्याजाने कर्जे दिली जातात, हे जरी खरे असले तरी तिथे पैसा इतका आहे. पैसे ठेवायसाठी पैसे मोजावे लागतात, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

‘त्या’ संस्था मोडकळीस आल्या!

केवळ सरकार मदतीवर उभ्या राहिलेल्या संस्था लवकर मोडकळीस येतात, हा अनुभव आहे. त्यासाठी सरकारी पैशाबरोबर जनता असेल तर त्याला यश येते, असे देशमुख यांनी सांगितले.

सुरेश पाटील यांच्याकडून एक लाख उद्योजक

सुरेश पाटील यांनी हॉस्पीटल उभारणीसाठी एक लाख रूपये मदत जाहीर केली. त्याचबरोबर ‘बिद्री’ साखर कारखान्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ४ लाख ९८ हजाराचे भागभांडवल जमा केले