शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ...

दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी मदतीचा हात दिल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

शहराला चोहोबाजूंनी कृष्णा व पंचगंगा नदीने वेढा दिल्याने बेटाचे स्वरूप आले आहे. संभाव्य धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सोयाबीन, भुईमूग, भात, भाजीपाला यासारखी पिके, तर पाण्याने गेलीच आहेत. मात्र, पाणी अत्यंत धीम्या गतीने उतरत असल्याने पुराच्या पाण्यात बुडालेल्या ऊस पीक उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

शेती पिकाच्या आधी स्वत:चा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या जेवणाची त्याच्या दुभत्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देत आहेत. माळभागावर पूरग्रस्तांसाठी दररोज सुमारे दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.