शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

कुरुंदवाडमध्ये मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, ...

दरम्यान, शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्त नागरिक आणि जनावारांच्या चाऱ्याची शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी मदतीचा हात दिल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.

शहराला चोहोबाजूंनी कृष्णा व पंचगंगा नदीने वेढा दिल्याने बेटाचे स्वरूप आले आहे. संभाव्य धोका ओळखून नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सोयाबीन, भुईमूग, भात, भाजीपाला यासारखी पिके, तर पाण्याने गेलीच आहेत. मात्र, पाणी अत्यंत धीम्या गतीने उतरत असल्याने पुराच्या पाण्यात बुडालेल्या ऊस पीक उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

शेती पिकाच्या आधी स्वत:चा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्याने स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांच्या जेवणाची त्याच्या दुभत्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देत आहेत. माळभागावर पूरग्रस्तांसाठी दररोज सुमारे दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.