शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
6
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
7
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
8
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
9
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
10
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
11
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
12
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
13
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
14
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
15
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
16
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
17
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
18
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

‘हेल्मेट’ ओझे नव्हे ‘जीवरक्षक’च

By admin | Updated: February 8, 2016 00:29 IST

‘सर सलामत तो पगडी पचास’ : जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार दुचाकी धावतात

कोल्हापूर : दुचाकीस्वाराचा रस्ते अपघातात मृत्यू, असे सातत्याने वृत्तपत्रात आपण नेहमीच वाचत असतो. सातत्याने होणाऱ्या अपघातात युवापिढीच बळी पडत आहे. हाच सुरक्षिततेचा मुद्दा उचलून सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सर्वत्र दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ सक्तीचे करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार आता कोल्हापुरातही येत्या काही दिवसांत ‘हेल्मेट’ वापरणे सक्तीचे होणार आहे. सक्तीपेक्षा जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने ‘हेल्मेट’ वापरणे काळाची गरज आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यानुसार परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथून ‘हेल्मेट’ सक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने दिवसागणिक राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यात दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक अपघातांमध्ये डोक्याला दुखापत होऊन दुचाकीस्वारांना व त्या पाठीमागे बसलेल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे म्हणत हेल्मेट घ्यावे. हेल्मेट घेताना ते चांगल्या गुणवत्तेचे, दर्जाचे असावे. राज्य शासनाने तर नवीन दुचाकी घेतली की, त्या ग्राहकाला दोन हेल्मेट कंपनीनेच मोफत द्यावीत, असा आग्रह धरला आहे. सक्ती नव्हे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन पुण्यामध्ये १ फेबु्रवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचे वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन अभिनंदनही करण्यात आले. औरंगाबादमध्ये तर जनतेनेच उत्स्फूर्तपणे हेल्मेट खरेदीला सुरुवात केली आहे. यासह मुंबईतही हेल्मेट सक्तीचा प्रयोग ९० टक्के यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. त्यामुळे याला सक्ती म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे, कायद्यातच अशी तरतूद आहे. त्यामुळे जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट नियमित वापरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्व दुचाकीस्वारांना केले आहे.