शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्मेट’ ओझे नव्हे ‘जीवरक्षक’च

By admin | Updated: February 8, 2016 00:29 IST

‘सर सलामत तो पगडी पचास’ : जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार दुचाकी धावतात

कोल्हापूर : दुचाकीस्वाराचा रस्ते अपघातात मृत्यू, असे सातत्याने वृत्तपत्रात आपण नेहमीच वाचत असतो. सातत्याने होणाऱ्या अपघातात युवापिढीच बळी पडत आहे. हाच सुरक्षिततेचा मुद्दा उचलून सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सर्वत्र दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ सक्तीचे करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार आता कोल्हापुरातही येत्या काही दिवसांत ‘हेल्मेट’ वापरणे सक्तीचे होणार आहे. सक्तीपेक्षा जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने ‘हेल्मेट’ वापरणे काळाची गरज आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यानुसार परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथून ‘हेल्मेट’ सक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने दिवसागणिक राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यात दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक अपघातांमध्ये डोक्याला दुखापत होऊन दुचाकीस्वारांना व त्या पाठीमागे बसलेल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे म्हणत हेल्मेट घ्यावे. हेल्मेट घेताना ते चांगल्या गुणवत्तेचे, दर्जाचे असावे. राज्य शासनाने तर नवीन दुचाकी घेतली की, त्या ग्राहकाला दोन हेल्मेट कंपनीनेच मोफत द्यावीत, असा आग्रह धरला आहे. सक्ती नव्हे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन पुण्यामध्ये १ फेबु्रवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचे वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन अभिनंदनही करण्यात आले. औरंगाबादमध्ये तर जनतेनेच उत्स्फूर्तपणे हेल्मेट खरेदीला सुरुवात केली आहे. यासह मुंबईतही हेल्मेट सक्तीचा प्रयोग ९० टक्के यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. त्यामुळे याला सक्ती म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे, कायद्यातच अशी तरतूद आहे. त्यामुळे जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट नियमित वापरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्व दुचाकीस्वारांना केले आहे.