शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

‘हेल्मेट’ ओझे नव्हे ‘जीवरक्षक’च

By admin | Updated: February 8, 2016 00:29 IST

‘सर सलामत तो पगडी पचास’ : जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार दुचाकी धावतात

कोल्हापूर : दुचाकीस्वाराचा रस्ते अपघातात मृत्यू, असे सातत्याने वृत्तपत्रात आपण नेहमीच वाचत असतो. सातत्याने होणाऱ्या अपघातात युवापिढीच बळी पडत आहे. हाच सुरक्षिततेचा मुद्दा उचलून सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सर्वत्र दुचाकीस्वारांना ‘हेल्मेट’ सक्तीचे करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार आता कोल्हापुरातही येत्या काही दिवसांत ‘हेल्मेट’ वापरणे सक्तीचे होणार आहे. सक्तीपेक्षा जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने ‘हेल्मेट’ वापरणे काळाची गरज आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यानुसार परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथून ‘हेल्मेट’ सक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार आता टप्प्याटप्प्याने दिवसागणिक राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्यास सुरुवात केली आहे. हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यात दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेक अपघातांमध्ये डोक्याला दुखापत होऊन दुचाकीस्वारांना व त्या पाठीमागे बसलेल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी ‘सर सलामत तो पगडी पचास’ असे म्हणत हेल्मेट घ्यावे. हेल्मेट घेताना ते चांगल्या गुणवत्तेचे, दर्जाचे असावे. राज्य शासनाने तर नवीन दुचाकी घेतली की, त्या ग्राहकाला दोन हेल्मेट कंपनीनेच मोफत द्यावीत, असा आग्रह धरला आहे. सक्ती नव्हे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन पुण्यामध्ये १ फेबु्रवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचे वाहतूक शाखेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन अभिनंदनही करण्यात आले. औरंगाबादमध्ये तर जनतेनेच उत्स्फूर्तपणे हेल्मेट खरेदीला सुरुवात केली आहे. यासह मुंबईतही हेल्मेट सक्तीचा प्रयोग ९० टक्के यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासन करीत आहे. त्यामुळे याला सक्ती म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे, कायद्यातच अशी तरतूद आहे. त्यामुळे जिवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट नियमित वापरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्व दुचाकीस्वारांना केले आहे.