शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नरके, महाडिक, सरुडकरांची प्रतिष्ठा पणाला-- ग्रामपंचायतीचे रणांगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:56 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण गतिमान झाले आहे. विधानसभेसाठी अजून दोन वर्र्षांचा कालावधी असला तरी, ही निवडणूक जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदारांचा कस लावणारी आहे. ...

ठळक मुद्दे: संजय घाटगे, निवेदिता माने, ‘के. पी.’, दिनकरराव जाधवांचा कस लागणारसदस्यांना स्वत:च्या ताकदीवरच निवडून यावे लागणार आहे.जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या आजी-माजी संचालकांचाही गाव ताब्यात ठेवण्यासाठी कस लागणार

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच ग्रामपंचायतीची धूम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापणार आहे. जिल्ह्यातील ४७८ ग्रामपंचायतींच्या आखाड्यात इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने स्थानिक राजकारण गतिमान झाले आहे. विधानसभेसाठी अजून दोन वर्र्षांचा कालावधी असला तरी, ही निवडणूक जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदारांचा कस लावणारी आहे. आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, दिनकरराव जाधव व माजी खासदार निवेदिता माने यांची आपले गाव ताब्यात ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा विकासाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या पातळीवर येतो. स्थानिक पातळीवर विकासात्मक कामांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविण्याची संधी मिळत असल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात थेट सरपंच निवडीबरोबरच गावचा विकास आराखडा तयार करणे व त्यानुसार खर्च करण्याचे अधिकार सरपंचाला मिळाल्याने यावेळची निवडणूक प्रतिष्ठेची व चुरशीची होणार आहे.

गणेशोत्सवाची धामधूम संपत असतानाच ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाल्याने इच्छुकांसह स्थानिक नेत्यांची तारांबळ उडाली आहे. उमेदवारी निश्चितीबरोबरच राखीव गटातील उमेदवारांचे जातीच्या दाखल्यांची शोधाशोध सुरू झाली आहे. प्रभागातील इच्छुकांशी चर्चा सुरू झाल्या असून ,एकापेक्षा अधिक इच्छुक असणाºया प्रभागात समझोता कसा करायचा, याचे डावपेच आखले जात आहेत. नाराज होऊन चांगला उमेदवार विरोधकांच्या हाताला लागू नये, यासाठी सुरुवातीपासूनच नेत्यांनी सावध भूमिका घेत उमेदवारीबाबत ‘बघूया, फॉर्म तरी भरा’ असा सूर लावला आहे.विधानसभेसाठी अजून दोन वर्षांचा कालावधी असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वांत मोठा टप्पा आता होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबरच आमदार व माजी आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्याकडे सर्वाधिक सदस्य संख्या त्याला घराघरांपर्यंत प्रचार यंत्रणा राबविण्यास सोपे जाते.

मतदारसंघातील ग्रामपंचायतीबरोबरच आमदार व माजी आमदारांना स्वत:चे ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखावे लागणार आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या कसबा बोरगाव, आमदार सत्यजित पाटील यांच्या सरूड, आमदार अमल महाडिक यांच्या शिरोली, माजी आमदार के. पी. पाटील यांची मुदाळ, संजयबाबा घाटगे यांची व्हनाळी, दिनकरराव जाधव यांची तिरवडे व माजी खासदार निवेदिता माने यांची रुकडी येथे प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या आजी-माजी संचालकांचाही गाव ताब्यात ठेवण्यासाठी कस लागणार आहे.इच्छुकांची गणेशोत्सवातच ‘ब्रँडिंग’!ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण दोन महिन्यांपूर्वीच निश्चित झाल्याने इच्छुक चाचपणी करीत कामाला लागले होते. गणेशोत्सवात तर इच्छुकांनी तरुण मंडळाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत स्वत:चे ब्रॅँडिंग करण्याची संधी सोडली नाही.एकगठ्ठा मतांवरच उमेदवारी!उमेदवारीबाबत कोणी कितीही दावे प्रतिदावे केले तरी प्रभागात कोणत्या समाजाची किती मते आहेत, त्यातील सर्वाधिक मते खेचण्याची क्षमता कोणाकडे आहे, भावकी कोणाची मोठी, यावरच उमेदवारीची गणिते अवलंबून राहणार आहेत.‘खुल्या सरपंच’ गावात संघर्षपूर्ण लढतसंवेदनशील गावाबरोबरच ज्या ठिकाणी सरपंच पद खुले आहे, त्याठिकाणी संघर्षपूर्ण लढती पाहावयास मिळणार आहेत. बहुतेक ठिकाणी नेत्यांच्या घरातीलच उमेदवार असल्याने येथे मोठ्या अर्थपूर्ण व काटा लढती होणार हे मात्र निश्चित आहे.सदस्यांचे महत्त्व कमीनगरपालिका निवडणुकीत सगळी ताकद नगराध्यक्षपदासाठी लावली होती. त्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेते सगळी ताकद सरपंचपदासाठी लावणार हे मात्र निश्चित आहे. सदस्यांना फारसे अधिकार राहिले नाहीत, त्यात नेते लक्ष देणार नसल्याने सदस्यांना स्वत:च्या ताकदीवरच निवडून यावे लागणार आहे.