शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

कोल्हापुरात अतिवृष्टी, एका रात्रीत नद्या पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. ...

कोल्हापूर : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने एका रात्रीत जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या, तर तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेची पाणीपातळी अवघ्या काही तासांत १० फुटांनी वाढली. गगनबावड्यात तर ढगफुटीसदृश १८२ मिलिमीटर इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. एका रात्रीच्या पावसाने पूर येण्याची जून महिन्यातील आतापर्यंतच्या पावसाची ऐतिहासिक घटना ठरली आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण तेव्हा पावसाने हुलकावणी दिली आाणि बुधवारपासून पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आल्यानंतर मात्र पावसाने जोरदार एन्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जूनमधील पावसाला जोर नसतो, असाचा पारंपरिक अंदाज बांधून सर्व जण गाफील राहिले; पण पावसाने रात्री जोरदार हिसका दाखवत सर्वांचीच फजिती केली. रात्री १० वाजता सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळीपर्यंत अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढले. टपोऱ्या थेंबाच्या आवाजाने अनेकांनी रात्र जागूनच काढली.

रात्री अकराच्या सुमारास पावसाचा वेग वाढेल, तसे नद्यांवरील एका पाठोपाठ एक बंधारे पाण्याखाली जाऊ लागले. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी सकाळी २४ फुटांवर गेली. राधानगरी व दूधगंगा खोऱ्यात अतिवृष्टी झाल्याने याला जोड असणाऱ्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीवरील सर्वाधिक बंधारे वेगाने पाण्याखाली गेले. यात पंचगंगा व हिरण्यकेशी नदीवरील ७, भोगावती व दूधगंगा, वारणा नदीवरील २, तुळशी व कुंभी नदीवरील ४, कासारी नदीवरील एक, कुंभीवरील ४, घटप्रभा नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ८ बंधारे पाण्याखाली गेले.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी

जिल्हाभर पावसाने रात्रभर हाहाकार उडवला असताना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर ढगफुटीच झाली. जिल्ह्यातील १४ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २०० मिलिमीटरच्या वरच पाऊस झाला. सर्वाधिक २३१ मिलिमीटर पाऊस चंदगडमधील जांबरे जलाशयात झाला आहे. कुंभीमध्ये २२५, राधानगरीत २२०, दूधगंगा २००, पाटगाव २०७, तुळशी १८७, वारण १८५, घटप्रभा १५५ असा पाऊस झाला आहे.

रस्ते खचले, वाहतूक खोळंबली

एकाच वेळी धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अर्धवट कामे असलेल्या ठिकाणी वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. अचानक रस्त्यांवर, ओढ्यांवर पाणी आल्याने वाहतूकही खोळंबल्याने ऐनवेळी पर्यायी मार्ग शोधावे लागले. कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर माजगाव गावाजवळील लहान पुलाचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या तयार केलेला रस्ताच वाहून गेल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.

नदीकाठावरचे कृषीपंप पाण्याखाली

साधारपणे जूनमध्ये कधीही पूर येईल असा पाऊस पडत नाही. त्यामुळे नदीकाठावरच्या पाण्याच्या मोटारी सुरूच असतात. त्या काढून आणल्या जात नाहीत; पण गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या पावसाने सकाळीच नद्यांना पूर आणल्याचे दिसले. तेव्हा नदीकाठावरील सर्वच मोटारी पाण्याखाली बुडाल्या. लार्टटच्या पेट्यादेखील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस आणि पूर ओसरल्यावर गाळातून या मोटारी शोधणे व त्या काढून आणणे मोठ्या कष्टाचे व नुकसानीचे काम आहे.

शिवारे तुडुंब

ढगफुटीसारख्या धुवाधार कोसळलेल्या या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर शिवारे पाण्याने तुडुंब भरली आहे. भाताची खेचरे पाण्याने भरली आहेत. शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पुढील आठवडाभर तरी शेतात पाय ठेवता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. धूळवाफ पेरण्यांची उगवण चांगली झाल्याने हा पाऊस त्यांना उपयुक्त ठरला आहे, तर ज्यांच्या अजून पेरण्याच झालेल्या नाहीत, त्यांचा मात्र आठवडाभराचा खाेळंबा झाला आहे.

२४ तासांत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

गगनबावडा : १८२

शाहूवाडी : १२७

राधानगरी : ११९

पन्हाळा ११५

चंदगड : ११३

कागल : ११०

गडहिंग्लज : १००

भुदरगड : ९७

हातकणंगले: ८९

आजरा : ८५

शिरोळ : ७३

जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड

भोगावती : राशिवडे, हळदी

तुळशी : घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड

दूधगंगा : सुळकूड, बाचणी

कासारी : यवलूज

कुंभी : सांगशी, मांडुकली, शेणवडे, कळे

वारणा : चिंचोली, माणगाव

घटप्रभा : कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी

हिरण्यकेशी : साळगाव, ऐनापूर, नीलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी, दाभील

वेदगंगा : निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली

घटप्रभा शंभर टक्के भरले

जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच धरण शंभर टक्के भरण्याची घटना घडली आहे. चंदगडमधील घटप्रभा हा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागला आहे. त्यापाठोपाठ जांबरे जलाशयाचा साठा ८२ टक्केवर पोहचला आहे. पाटगाव, चित्री व चिकोत्राचा जलसाठा ४५ टक्केवर पाेहचला आहे. तुळशी ४६ टक्के, कुंभी ४३ टक्के, कोदे ४० टक्के, कासारी ३२ टक्के, कडवी ३८ टक्के, वारणा ३० टक्के, जंगमहट्टी २७ टक्के, दूधगंगा २८ टक्के, राधानगरी जलाशयातील साठा २२ टक्केवर गेला आहे.

जूनची सरासरी ओलांडली

गेल्यावर्षी संपूर्ण जून महिन्यात सरासरी ११६ मिलिमीटर पाऊस झाला होता; पण यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.