शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

जिल्ह्यात धुवाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवाधार पाऊस कोसळत आहे. गगनबावड्यासह राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. नद्यांच्या पातळीत वेगाने वाढ होत असून, पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पातळी ३३ फुटांपर्यत पोहोचली असून, इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. एक राज्य व दोन प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून, ३९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारपासून दोन दिवस धुवाधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला. सकाळी तर त्यात वाढ होत जाऊन अक्षरश: सुपाने पाणी ओतावे तशा पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. नाले तुडुंब झाल्याने पाणी सैरभैर झाले होते. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात तर एकसारखा धुवाधार पाऊस राहिल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.

पंचगंगेची पातळी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. सायंकाळी सातपर्यंत ३३ फुटांवर पातळी पोहोचली आणि इशारा पातळीकडे आगेकुच ठेवली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. ‘वारणा’ धरणाच्या साठ्यात दिवसभरात ३ टीएमसीने वाढ झाली. सध्या हे धरण ७१ टक्के भरले आहे. ‘राधानगरी’तून प्रतिसेकंद १४२५, तर ‘वारणा’ मधून १७१५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज, गुरुवारीही जिल्ह्यात धुवाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गारठ्याने अंगात हुडहुडी

पावसाला कमालीचा गारठा आहे. कमाल तापमान २० डिग्रीपर्यंत खाली आल्याने दिवसभर अंगातून हुडहुडी गेली नाही. जोरदार पाऊस आणि गार वाऱ्यांमुळे वयोवृध्दांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते.

बांधफुटीमुळे शेतीचे नुकसान

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस राहिल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. ऊस, भात पिकाचे बांधफुटीचे प्रकार अनेक ठिकाणी झाले असून, त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पंचगंगेच्या पातळीत तासाला पाऊण फुटाची वाढ

सकाळपासून पावसाचा जोर असला, तरी दुपारनंतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. पंचगंगा नदीची पातळी बुधवारी सकाळी आठ वाजता २८ फुटांवर होती. दुपारी चार पर्यंत ३३ फुटांवर, तर सायंकाळी सात वाजता ३५ फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे तासाला पाऊण फुटाने वाढ होत गेली.