शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

पावसाची भुरभुर, जोर मंगळवारपासूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

कोल्हापूर : सासूच्या पावसाने ढगाकडे बघायला लावल्यानंतर सोमवारपासून आलेल्या सुनांनी भुरभुर का असेना, पण सुरुवात केल्याने पिकांना जीवदान मिळाले ...

कोल्हापूर : सासूच्या पावसाने ढगाकडे बघायला लावल्यानंतर सोमवारपासून आलेल्या सुनांनी भुरभुर का असेना, पण सुरुवात केल्याने पिकांना जीवदान मिळाले असून शिवारही आनंदले आहे. ही तुरळक हजेरी मंगळवारी आणि बुधवारी देखील कायम राहिली. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाची अगदीच भुरभुर होती. पावसाचा खरा जोर मंगळवारपासूनच वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात महापूर ओसरल्यापासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस किरकोळ स्वरूपात हजेरी लावत आहे. कडक उन्हामुळे माना टाकणाऱ्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळत असलेतरी त्यांच्या वाढीवर मात्र परिणाम झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारपासून पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याचा होता, पण पुन्हा जोरदार पावसाने हुलकावणी दिली आहे. मंगळवारपासून मात्र जिथे ढग उतरतील तेथे पाऊस पडत असल्याने कुठे आनंदाचे तर कुठे प्रतीक्षेचे चित्र आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्हाभर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. संध्याकाळी भुरभुर सुरू झाली आणि पुन्हा उघडीप घेतली.

दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या सुधारीत अंदाजानुसार मंगळवार ते शुक्रवार असे सलग चार दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस पडणार आहे. यानंतर पुन्हा एक दिवसाच्या विश्रांतीनंतर दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.