शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस

By admin | Updated: November 16, 2016 00:44 IST

दोन तास झोडपले : नागरिकांची तारांबळ; तारा तुटल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने तब्बल दोन तास तळ ठोकल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना भिजतच घरी जावे लागले. कळंबा, लक्ष्मीपुरी परिसरातील विजेच्या तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. यंदा मान्सून चांगलाच बरसल्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच मुक्काम हलविला होता. त्यानंतर बोचऱ्या थंडीने एंट्री केली होती. गेल्या दोन दिवसात थंडीची तीव्रता काहीसी कमी होऊन ढगाळ वातावरण झाले. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकसारखा दोन-अडीच तास जोरदार पाऊस राहिल्याने नागरिकांना रस्त्यातच ताटकळतच थांबावे लागले. तर अनेकांना कार्यालयात थांबून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. पाऊस थांबत नसल्याने अनेकांनी भिजतच घर गाठले. अचानक आलेल्या पावसाने फेरीवाले, रस्त्यावरील स्टॉलधारकांची पळापळ झाली. पाऊस जोरदार झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा गुऱ्हाळघरे, साखर कारखाने, वीट व्यावसायिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान वीटभट्ट्यांचे झाले आहे. भाताची सुगी संपली असली तरी नागलीच्या काढणीचे काम सुरू आहे. त्यामध्येही अडथळा निर्माण झाला आहे. कळंबा ते लक्ष्मीपुरी लाईनवरील वीजपुरवठा खंडित संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे कळंबा लक्ष्मीपुरी वीजवाहिनीवरील तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. कळंबा कारागृहाजवळ झाडाची फांदी पडून तार तुटली तर अनेक ठिकाणी क्रॉस तुटले. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महालक्ष्मीनगर तेथुन पुढील भागातही अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करत तुटलेल्या तारा जोडत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एटीएमसमोर गर्दी संध्याकाळी मोठ्या पावसाने एटीएमसमोरील गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, रात्री दहाच्या सुमारास पाऊस पूर्ण बंद झाल्याने नागरिक पुन्हा एटीएमवर गर्दी करू लागले; परंतु अनेक एटीएमवरील पैसे संपल्याने ज्या मोजक्या एटीएममध्ये पैसे शिल्लक होते, तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत दिसत होते. गुऱ्हाळघरे, कारखाने बंद राहणार? जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरे व साखर कारखान्यांची चिखलातून ऊस वाहतूक चालणार नाही. परिणामी, आज, बुधवारी ऊस तोड काही ठिकाणी बंद राहण्याची शक्यता आहे.