शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस

By admin | Updated: November 16, 2016 00:44 IST

दोन तास झोडपले : नागरिकांची तारांबळ; तारा तुटल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने तब्बल दोन तास तळ ठोकल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना भिजतच घरी जावे लागले. कळंबा, लक्ष्मीपुरी परिसरातील विजेच्या तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. यंदा मान्सून चांगलाच बरसल्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच मुक्काम हलविला होता. त्यानंतर बोचऱ्या थंडीने एंट्री केली होती. गेल्या दोन दिवसात थंडीची तीव्रता काहीसी कमी होऊन ढगाळ वातावरण झाले. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व कामावरून घरी जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकसारखा दोन-अडीच तास जोरदार पाऊस राहिल्याने नागरिकांना रस्त्यातच ताटकळतच थांबावे लागले. तर अनेकांना कार्यालयात थांबून पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली. पाऊस थांबत नसल्याने अनेकांनी भिजतच घर गाठले. अचानक आलेल्या पावसाने फेरीवाले, रस्त्यावरील स्टॉलधारकांची पळापळ झाली. पाऊस जोरदार झाल्याने शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा गुऱ्हाळघरे, साखर कारखाने, वीट व्यावसायिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान वीटभट्ट्यांचे झाले आहे. भाताची सुगी संपली असली तरी नागलीच्या काढणीचे काम सुरू आहे. त्यामध्येही अडथळा निर्माण झाला आहे. कळंबा ते लक्ष्मीपुरी लाईनवरील वीजपुरवठा खंडित संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे कळंबा लक्ष्मीपुरी वीजवाहिनीवरील तारा अनेक ठिकाणी तुटल्याने वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. कळंबा कारागृहाजवळ झाडाची फांदी पडून तार तुटली तर अनेक ठिकाणी क्रॉस तुटले. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महालक्ष्मीनगर तेथुन पुढील भागातही अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करत तुटलेल्या तारा जोडत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एटीएमसमोर गर्दी संध्याकाळी मोठ्या पावसाने एटीएमसमोरील गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, रात्री दहाच्या सुमारास पाऊस पूर्ण बंद झाल्याने नागरिक पुन्हा एटीएमवर गर्दी करू लागले; परंतु अनेक एटीएमवरील पैसे संपल्याने ज्या मोजक्या एटीएममध्ये पैसे शिल्लक होते, तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत दिसत होते. गुऱ्हाळघरे, कारखाने बंद राहणार? जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरे व साखर कारखान्यांची चिखलातून ऊस वाहतूक चालणार नाही. परिणामी, आज, बुधवारी ऊस तोड काही ठिकाणी बंद राहण्याची शक्यता आहे.