शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पुढील आठवड्यात सुनावणी

By admin | Updated: June 20, 2014 01:09 IST

टोलवसुली प्रश्न : ‘आयआरबी’ची सुनावणी ढकलण्याची खेळी

कोल्हापूर : शहर एकात्मिक रस्ते प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवून बेकायदेशीर टोलवसुली रद्द करावी, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. सुनावणी टाळण्यासाठी मूळ कागदपत्रे दाखविण्याच्या मागणीची ‘आयआरबी’ने केलेली खेळी यामुळे फसणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील टोलवसुलीस दिलेली स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे २०१४ रोजी उठविली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुरियन जोसेफ व आर. एम. लोथा यांनी दिले होते. टोलची लढाई आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुरू होणार आहे. रस्ते प्रकल्पातील ७० टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. युटिलिटी शिफ्टिंगचा मुद्दा तसाच आहे. रस्त्यांच्या कामाचा दर्जा नाही. तोडलेली वृक्ष लागवडही केलेली नाही. प्रकल्पाच्या करारातील अटी व शर्थींचा ‘आयआरबी’ने भंग केला आहे, आदी मुद्द्यांच्या आधारे सर्व पक्षीय कृती समितीतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी सुरू होणे बाकी असतानाच ‘आयआरबी’ने कृती समितीचे वकील युवराज नरवणकर यांना नोटीस पाठवून याचिकेद्वारे उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंबंधीची मूळ कागदपत्रे तपासण्यासाठी मिळावीत, ही कागदपत्रे मिळेपर्यंत सुनावणी सुरू करू नये, असे म्हटले आहे. सर्व मूळ कागदपत्रे ‘आयआरबी’कडेच असून ती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर नरवणकर यांनी दिले.करारात ठरल्याप्रमाणे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महापालिका व आयआरबी यांच्या संमतीने नेमलेल्या सोव्हिल या सल्लागार कंपनीने प्रकल्प ९५ टक्केपूर्ण झाल्याचा दाखला दिला आहे. या दाखल्याच्या आधारेच महामंडळाने शासनाला टोल वसुलीची अधिसूचना काढण्याची विनंती केली होती. मोटर वाहन कायद्याप्रमाणे अशा प्रकारे अपूर्ण प्रकल्प असताना टोल वसुली करता येत नाही. हा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला जाणार आहे. (प्रतिनिधी)