शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी २० जुनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:37 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिलीतपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी पानसरे हत्येप्रकरणी तपास सुरु आहे.ते जिवंत आहेत का? याचीच शंका अनेकांना आहे.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी शनिवारी होणारी सुनावणी दि. २० जुनला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश डी. व्ही. शेळके यांच्या न्यायालयात सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे.

त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आलेची माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. सुनावणीसाठी संशयित आरोपी समीर गायकवाड, त्याचे वकील समीर पटवर्धन न्यायालयात हजर होते. सुनावणी लांबणीवर पडल्याने ते माघारी सांगली येथे निघून गेले.पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. कोल्हापूर एसआयटी, कर्नाटक एसआयटी आणि सीबीआय असा तिघांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. संशयीत आरोपींच्या वकीलांनी पानसरे हत्येप्रकरणी काही संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे हा खटला चालविण्यात यावा, अशी अपील उच्च न्यायालयात केली होती. परंतु तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी पानसरे हत्येप्रकरणी तपास सुरु आहे.

फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांचा शोध सुरु आहे. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा खटला लगेच सुरु करु नये, तपासाला आणखी काही दिवस अवधी द्यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने पानसरे हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत खटला चालविण्यास स्थगिती दिली आहे. शनिवारी सुनावणीला विशेष सरकारी वकील राणे, व संशयित आरोपी गायकवाड आणि त्याचे वकील पटवर्धन उपस्थित होते. न्यायाधिश शेळके यांनी उच्च न्यायालयाचे निर्देश समोर ठेऊन ही सुनावणी २० जुनला घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

‘त्या’ दोघांचा सुगावा नाही....पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय पवार व सारंग अकोळकर यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपास यंत्रणेला अद्यापही या दोघांचा सुगावा लागलेला नाही. मडगाव-गोवा बॉम्बस्फोटापासून हे दोघे फरार आहेत. ते जिवंत आहेत का? याचीच शंका अनेकांना आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयGovind Pansareगोविंद पानसरे