शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

अंबाबाई मंदिर हरकतींवर गुरुवारी सुनावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:00 IST

राज्य संरक्षित स्मारक : तोडगा निघाल्यास घोषणेचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्यावर हरकती घेतलेल्या विषयांवर गुरुवारी (२ मार्च) मुंबई येथे सुनावणी होणार आहे. यासाठी संबंधित हरकतदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या सुनावणी बैठकीत तोडगा निघाला तर मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाई मंदिराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मंदिराचे प्राचीनत्व आणि धार्मिक महत्त्व पुराणग्रंथ, शीलालेख व मंदिराचे दगडी हेमाडपंथी बांधकाम, अभ्यासकांच्या संशोधनातून सिद्ध झाले असले तरी अद्याप हे मंदिर ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित झालेले नाही. त्यामुळे मंदिराच्या वास्तुसौंदर्याचे अतोनात नुकसान झाले. मात्र, शासनाच्या पुरातत्व खात्याने जुलैमध्ये मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्याची अधिसूचना जाहीर केली व त्यावर कुणाच्या हरकती असतील तर त्या नोंदवाव्यात, असे नमूद करण्यात आले होते. त्यावर परिसरातील एकूण २५ जणांनी हरकती नोंदविल्या असून, २०हून अधिक हरकती या दुकानदारांच्याच आहेत. या सर्व हरकतींवर प्रत्यक्ष हरकतदारांशी संवाद साधून तोडगा काढण्यात येणार आहे. या प्राथमिक अधिसूचनेवर घेण्यात आलेल्या हरकतींवर २ मार्चला सकाळी ११ वाजता मुंबई येथे सुनावणी होणार आहे. त्यामुळे या व्यक्तींनी कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहावे, अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी हरकतदारांशी हरकतींसंदर्भात चर्चा करणार आहेत. या चर्चेत योग्य मार्ग निघाला तर मंदिर ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्यास अडथळा राहणार नाही, अशी माहिती पुरातत्वचे अधिकारी विलास वहाने यांनी दिली.हरकतदार..उदयसिंह राजेयादव, सचिन शिंदे, सुरेखा भोसले, रत्नप्रभा पवार, सर्जेराव निंबाळकर, भारती जाधव, सुयोग खटावकर, साजनदास सलुजा, शारदा जाधव, रूपेश सलुजा, अमित काटवे, रणजित मेवेकरी, शरद काटवे, शीतल मेळवंकी, कुसुम काटवे, रमेश सलुजा, वैभव मेवेकरी, श्रीकांत खत्री, अरुण काटवे, अभिषेक होस्पेटकर, मुनाफ अन्सारी, अशोक डोंगरे, किशोर खांडके, महबुबी शिकलगार, संतोष काटवे. हरकतदारांच्या भूमिकेकडे लक्ष या सर्वांच्या हरकतींवर उपाय निघाला हरकतदारांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मंदिराचा राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, वर्षानुवर्षे होत असलेली हेळसांड थांबणार आहे. त्यामुळे हरकतदार या बैठकीत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.