शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर हरकतींवर गुरुवारी सुनावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:00 IST

राज्य संरक्षित स्मारक : तोडगा निघाल्यास घोषणेचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्यावर हरकती घेतलेल्या विषयांवर गुरुवारी (२ मार्च) मुंबई येथे सुनावणी होणार आहे. यासाठी संबंधित हरकतदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या सुनावणी बैठकीत तोडगा निघाला तर मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाई मंदिराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मंदिराचे प्राचीनत्व आणि धार्मिक महत्त्व पुराणग्रंथ, शीलालेख व मंदिराचे दगडी हेमाडपंथी बांधकाम, अभ्यासकांच्या संशोधनातून सिद्ध झाले असले तरी अद्याप हे मंदिर ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित झालेले नाही. त्यामुळे मंदिराच्या वास्तुसौंदर्याचे अतोनात नुकसान झाले. मात्र, शासनाच्या पुरातत्व खात्याने जुलैमध्ये मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्याची अधिसूचना जाहीर केली व त्यावर कुणाच्या हरकती असतील तर त्या नोंदवाव्यात, असे नमूद करण्यात आले होते. त्यावर परिसरातील एकूण २५ जणांनी हरकती नोंदविल्या असून, २०हून अधिक हरकती या दुकानदारांच्याच आहेत. या सर्व हरकतींवर प्रत्यक्ष हरकतदारांशी संवाद साधून तोडगा काढण्यात येणार आहे. या प्राथमिक अधिसूचनेवर घेण्यात आलेल्या हरकतींवर २ मार्चला सकाळी ११ वाजता मुंबई येथे सुनावणी होणार आहे. त्यामुळे या व्यक्तींनी कागदपत्रांसह सुनावणीस हजर राहावे, अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी हरकतदारांशी हरकतींसंदर्भात चर्चा करणार आहेत. या चर्चेत योग्य मार्ग निघाला तर मंदिर ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित करण्यास अडथळा राहणार नाही, अशी माहिती पुरातत्वचे अधिकारी विलास वहाने यांनी दिली.हरकतदार..उदयसिंह राजेयादव, सचिन शिंदे, सुरेखा भोसले, रत्नप्रभा पवार, सर्जेराव निंबाळकर, भारती जाधव, सुयोग खटावकर, साजनदास सलुजा, शारदा जाधव, रूपेश सलुजा, अमित काटवे, रणजित मेवेकरी, शरद काटवे, शीतल मेळवंकी, कुसुम काटवे, रमेश सलुजा, वैभव मेवेकरी, श्रीकांत खत्री, अरुण काटवे, अभिषेक होस्पेटकर, मुनाफ अन्सारी, अशोक डोंगरे, किशोर खांडके, महबुबी शिकलगार, संतोष काटवे. हरकतदारांच्या भूमिकेकडे लक्ष या सर्वांच्या हरकतींवर उपाय निघाला हरकतदारांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मंदिराचा राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, वर्षानुवर्षे होत असलेली हेळसांड थांबणार आहे. त्यामुळे हरकतदार या बैठकीत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.