शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निरोगी जनावरांसाठी सकस चारा महत्त्वाचा

By admin | Updated: January 19, 2016 00:35 IST

पश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे.

भरत शास्त्री - बाहुबलीपश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्यासोबत दुग्ध व्यवसाय देखील या भागतील शेतकरी प्रामुख्याने करीत आहेत. शेतीवर आधारित व एकमेकांना पूरक असल्याने शेतकऱ्यांकडे घरोघरी कमी अधिक प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायामध्ये कित्येक कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या खण्यापिण्यापासून ते गोठा व आरोग्याविषयी शास्त्रशुद्ध पद्धत माहीत नसल्याने जनावरे अनेक आजारांना बळी पडत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चारा हा महत्त्वाचा घटक आहे. जनावरांमध्ये पोटाचे विकार अधिक प्रमाणात आढळतात. यामध्ये पोटफुगी, पोट गच्च होणे व अपचन असे नेहमी होणारे विकार आहेत. हे विकार प्रामुख्याने चाऱ्यातील बदलांमुळे होतात, असे विकार वेळीच लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचाराने मात करता येते.जनावरांच्या पोटाची अंतर्गत रचना अतिशय गुंतागुंतीची असते. त्यामुळे पोटाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेष करून रवंथ करणारी जनावरे समोर मिळेल तेवढा चारा खातात व नंतर निवांतपणे रवंथ करतात. जनावरे फिरायला सोडल्यावर कचऱ्याच्या ढिगावर,उकिरड्यावर मिळेल त्या गोष्टी खातात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणता चारा खाल्ला पाहिजे, कोणता खाऊ नये याची जाण जनावरांना नसल्याने नकळत त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू जातात. त्यामध्ये बऱ्याचदा प्लास्टिकच्या पिशव्या, कापड, रबरचे तुकडे, चप्पलचे भाग, माती व वाळू यांसारख्या वस्तू पोटात जातात.चुकीच्या वस्तू पोटात गेल्याने त्यांच्या पचन क्रियेवर दीर्घकाळ परिणाम होतो. त्यामुळे जनावर दूध कमी देते, चारा कमी खाते, तसेच जनावरांच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कधी कधी चाऱ्यामधून जनावरांच्या पोटात टाचणी, सुई, तार, आदी धारदार वस्तूदेखील जातात. त्यामुळे हृदय, फुफ्फुस व पोटाच्या पडद्यांना जीवघेण्या इजा होतात. कितीही महागडे उपचार केले तरी त्यांचा फायदा होत नाही. याउलट शेळ्या, मेंढ्या निवढक चारा खातात. त्यामुळे त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू जाण्याचे प्रमाण अतिशय नगण्यच असते. तथापि, काळजी घेणे हिताचे असते.जनावरांची काळजी कशी घ्यावीजनावर चरण्यासाठी सोडले असल्यास अनावश्यक काही खाणार नाहीत याकडे लक्ष असावे.जनावरांना वस्त्यांमध्ये भटकू देऊ नये.दुधाळ जनावरांच्या खुराकात नियमित क्षार मिश्रणे मिसळावीत. ४. जनावरांचा चारा कापताना कटरमध्ये वायरचे किंवा तारांचे तुकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ५. जनावरास नेहमी जंतनाशक औषधे द्यावीत.जनावरास पाणी देताना डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यात थोडे मीठ टाकावे.न पचणाऱ्या वस्तू का जातात?शरीरात आवश्यक क्षार व खनिजांची कमतरता असल्यास वासरे व मोठी जनावरे माती खातात किंवा गोठ्यातील भिंती चाटतात.जनावरास दीर्घकाळ उपाशी ठेवल्यामुळे दिसेल तो चारा खातात.जमिनीवरून चारा गोळा करून टाकला जातो. तेव्हा त्यासोबत खिळ्यासारख्या वस्तू पोटात जातात.उकिरड्यांवरील कचरा खाताना बऱ्याचदा प्लास्टिक पोटात जाते.