शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जनावरांसाठी सकस चारा महत्त्वाचा

By admin | Updated: January 19, 2016 00:35 IST

पश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे.

भरत शास्त्री - बाहुबलीपश्चिम महाराष्ट्रात शेती व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्यासोबत दुग्ध व्यवसाय देखील या भागतील शेतकरी प्रामुख्याने करीत आहेत. शेतीवर आधारित व एकमेकांना पूरक असल्याने शेतकऱ्यांकडे घरोघरी कमी अधिक प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायामध्ये कित्येक कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या खण्यापिण्यापासून ते गोठा व आरोग्याविषयी शास्त्रशुद्ध पद्धत माहीत नसल्याने जनावरे अनेक आजारांना बळी पडत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चारा हा महत्त्वाचा घटक आहे. जनावरांमध्ये पोटाचे विकार अधिक प्रमाणात आढळतात. यामध्ये पोटफुगी, पोट गच्च होणे व अपचन असे नेहमी होणारे विकार आहेत. हे विकार प्रामुख्याने चाऱ्यातील बदलांमुळे होतात, असे विकार वेळीच लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचाराने मात करता येते.जनावरांच्या पोटाची अंतर्गत रचना अतिशय गुंतागुंतीची असते. त्यामुळे पोटाचे विकार अधिक प्रमाणात दिसून येतात. विशेष करून रवंथ करणारी जनावरे समोर मिळेल तेवढा चारा खातात व नंतर निवांतपणे रवंथ करतात. जनावरे फिरायला सोडल्यावर कचऱ्याच्या ढिगावर,उकिरड्यावर मिळेल त्या गोष्टी खातात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते; पण ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणता चारा खाल्ला पाहिजे, कोणता खाऊ नये याची जाण जनावरांना नसल्याने नकळत त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू जातात. त्यामध्ये बऱ्याचदा प्लास्टिकच्या पिशव्या, कापड, रबरचे तुकडे, चप्पलचे भाग, माती व वाळू यांसारख्या वस्तू पोटात जातात.चुकीच्या वस्तू पोटात गेल्याने त्यांच्या पचन क्रियेवर दीर्घकाळ परिणाम होतो. त्यामुळे जनावर दूध कमी देते, चारा कमी खाते, तसेच जनावरांच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कधी कधी चाऱ्यामधून जनावरांच्या पोटात टाचणी, सुई, तार, आदी धारदार वस्तूदेखील जातात. त्यामुळे हृदय, फुफ्फुस व पोटाच्या पडद्यांना जीवघेण्या इजा होतात. कितीही महागडे उपचार केले तरी त्यांचा फायदा होत नाही. याउलट शेळ्या, मेंढ्या निवढक चारा खातात. त्यामुळे त्यांच्या पोटात न पचणाऱ्या वस्तू जाण्याचे प्रमाण अतिशय नगण्यच असते. तथापि, काळजी घेणे हिताचे असते.जनावरांची काळजी कशी घ्यावीजनावर चरण्यासाठी सोडले असल्यास अनावश्यक काही खाणार नाहीत याकडे लक्ष असावे.जनावरांना वस्त्यांमध्ये भटकू देऊ नये.दुधाळ जनावरांच्या खुराकात नियमित क्षार मिश्रणे मिसळावीत. ४. जनावरांचा चारा कापताना कटरमध्ये वायरचे किंवा तारांचे तुकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ५. जनावरास नेहमी जंतनाशक औषधे द्यावीत.जनावरास पाणी देताना डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यात थोडे मीठ टाकावे.न पचणाऱ्या वस्तू का जातात?शरीरात आवश्यक क्षार व खनिजांची कमतरता असल्यास वासरे व मोठी जनावरे माती खातात किंवा गोठ्यातील भिंती चाटतात.जनावरास दीर्घकाळ उपाशी ठेवल्यामुळे दिसेल तो चारा खातात.जमिनीवरून चारा गोळा करून टाकला जातो. तेव्हा त्यासोबत खिळ्यासारख्या वस्तू पोटात जातात.उकिरड्यांवरील कचरा खाताना बऱ्याचदा प्लास्टिक पोटात जाते.