शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागच डॉक्टर पुरविणार

By admin | Updated: March 2, 2015 00:22 IST

दीपक सावंत : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : ‘एमबीबीएस’झालेले डॉक्टर आरोग्य सेवेकडे यायला तयार नाहीत. त्यांची मानसिकता आता वेगळी झाली असून त्यांच्यातील समाजाप्रती कर्तव्यभावना संपली आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवीनंतर बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण देऊन थेट सेवेत घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या विभागाला डॉक्टर पुरवेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शेंडा पार्क येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुजित मिणचेकर होते. यावेळीप्रमुख उपस्थिती आ. राजेश क्षीरसागर, आ. प्रकाश आबिटकर, राज्याचे आरोग्य सेवा संचालक सतीश पवार, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी. जे. शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी.आरसुळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे यांची होती.डॉ. सावंत म्हणाले, डॉक्टरांची मानसिकता वेगळी झाली आहे. ज्या शासनाच्या माध्यमातून आपण शिकलो व प्रगल्भ झालो. त्याची उतराई करण्याची भावना डॉक्टरांमध्ये दिसत नाही. त्यांची मानसिकता घातलेले पैसे वसूल होण्यासाठी नको ते मार्ग स्वीकारण्याची असून त्याला पालकांचीही संमती आहे. याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आता पुढाकार घेऊन जनजागृती करावी.आरोग्य विभागातील रिक्त पदांची गळचेपी झाली आहे. एमबीबीएस डॉक्टर इकडे यायला तयार नाहीत. त्यावर गांभीर्याने विचार करून ही पदे भरण्यासाठी वैद्यकीय पदवीनंतर बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण देऊन थेट सेवेत घेतले जाईल. त्याचबरोबर रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण असल्याबरोबरच अन्य पायाभूत सुविधा व तंत्रज्ञ असल्याशिवाय अद्ययावत मशिनरी खरेदी केली जाणार नाही.आ. मिणचेकर यांनी, तालुकास्तरावर शवविच्छेदन शीतकरण गृह उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेणेकरून अपघातानंतर मृतदेहांची होणारी परवड थांबेल.आ. क्षीरसागर यांनी, सीपीआर व शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली. आ. आबिटकर यांनी, शासन आरोग्यावर प्रचंड पैसा खर्च करते, पण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने त्याचा फटका सर्वांना बसत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)