शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आरोग्य विभागच डॉक्टर पुरविणार

By admin | Updated: March 2, 2015 00:22 IST

दीपक सावंत : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : ‘एमबीबीएस’झालेले डॉक्टर आरोग्य सेवेकडे यायला तयार नाहीत. त्यांची मानसिकता आता वेगळी झाली असून त्यांच्यातील समाजाप्रती कर्तव्यभावना संपली आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवीनंतर बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण देऊन थेट सेवेत घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या विभागाला डॉक्टर पुरवेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे केले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शेंडा पार्क येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुजित मिणचेकर होते. यावेळीप्रमुख उपस्थिती आ. राजेश क्षीरसागर, आ. प्रकाश आबिटकर, राज्याचे आरोग्य सेवा संचालक सतीश पवार, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी. जे. शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी.आरसुळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे यांची होती.डॉ. सावंत म्हणाले, डॉक्टरांची मानसिकता वेगळी झाली आहे. ज्या शासनाच्या माध्यमातून आपण शिकलो व प्रगल्भ झालो. त्याची उतराई करण्याची भावना डॉक्टरांमध्ये दिसत नाही. त्यांची मानसिकता घातलेले पैसे वसूल होण्यासाठी नको ते मार्ग स्वीकारण्याची असून त्याला पालकांचीही संमती आहे. याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आता पुढाकार घेऊन जनजागृती करावी.आरोग्य विभागातील रिक्त पदांची गळचेपी झाली आहे. एमबीबीएस डॉक्टर इकडे यायला तयार नाहीत. त्यावर गांभीर्याने विचार करून ही पदे भरण्यासाठी वैद्यकीय पदवीनंतर बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत पदविका प्रमाणपत्र प्रशिक्षण देऊन थेट सेवेत घेतले जाईल. त्याचबरोबर रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण असल्याबरोबरच अन्य पायाभूत सुविधा व तंत्रज्ञ असल्याशिवाय अद्ययावत मशिनरी खरेदी केली जाणार नाही.आ. मिणचेकर यांनी, तालुकास्तरावर शवविच्छेदन शीतकरण गृह उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेणेकरून अपघातानंतर मृतदेहांची होणारी परवड थांबेल.आ. क्षीरसागर यांनी, सीपीआर व शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली. आ. आबिटकर यांनी, शासन आरोग्यावर प्रचंड पैसा खर्च करते, पण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने त्याचा फटका सर्वांना बसत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)