शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

‘मागेल त्याला नव्हे मिळेल त्यालाच शेततळे’

By admin | Updated: March 7, 2016 01:01 IST

जाचक अटींमुळे शेतकरी वंचितच : ४०७ चे उद्दिष्ट प्रस्ताव केवळ चारच

राजाराम लोंढे - कोल्हापूरसरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘मागेल त्या शेतकऱ्यांना शेततळे’ देण्याची घोषणा केली खरी पण त्याच्या जाचक अटींमुळे ‘मिळेल त्यालाच शेततळे’, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिरोळ तालुक्यातील केवळ सात गावांचा समावेश यामध्ये झाला असला तरी तेथील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होत नाही. ४०७ शेततळ्यांचे उद्दिष्ट असले तरी आतापर्यंत केवळ चारच प्रस्ताव आॅनलाईन कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. पाणी साठवण्याबाबत विविध योजनांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार आग्रही आहे. सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सरकारने आणली आहे; पण या योजनेतील अटी व शर्ती पाहिल्या तर ही योजना इतर योजनांप्रमाणेच फसवी असल्याचा आरोप होत आहे. मागील ५ वर्षांत ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांचा समावेश या योजनेत होतो. कोेल्हापूर जिल्ह्णात यावर्षीच पाऊस कमी झाल्याने केवळ शिरोळ तालुक्यातील सात गावांचा समावेश या योजनेत झाला आहे. आत्महत्या झालेले कुटुंब, दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत. सरकार संबंधित शेतकऱ्याला ५० हजार रुपये देणार आहे पण मार्केटमधील खुदाईचा दर पाहिला तर ३० ते ४० रुपये घन प्रतिमीटर आहे. सर्वसाधारणपणे २३०० घनमीटर शेततळ्याची खुदाई केली जाणार आहे, त्यासाठी सुमारे ऐंशी हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. जाचक अटी व अपुरे अनुदान यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, आतापर्यंत केवळ चारच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दीड एकरवालादारिद्र्यरेषेखाली कसा?या योजनेसाठी कमीत कमी दीड एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ घेता येणार आहे. त्यात तो दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या दारिद्र्यरेषेखाली नाव येण्यासाठी जे निकष आहेत, त्यामध्ये दीड एकरवाला कसा बसू शकतो, असा सवाल करत पाणी अडवण्याचेच उद्दिष्ट असेल तर अटींमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.या गावांचा झाला समावेश -तमदलगे, निमशिरगांव, हरोली, कोंडिग्रे, जैनापूर, धरणगुत्ती, चिपरी.‘सोशल मीडियावरून खिल्ली!या योजनेच्या जाचक अटींमुळे लाभार्थी वंचित राहत आहेत. पहिल्यांदा मोफत जेवण असल्याचे सांगून भरपूर जेवायला सांगायचे? ताटात भात घातल्यानंतर आमटीसाठी ताटकळत ठेवायचे, असाच प्रकार या योजनेची असल्याची टीकाही सोशल मीडियावर रंगू लागली आहे.