शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ वादग्रस्त हौद आज हलविणार

By admin | Updated: April 30, 2016 00:39 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग : पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : शिवाजी पुलाजवळील हौद उतरण्याचे काम आज, शनिवारपासून सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यामुळे कोल्हापुरातील कृती समितीच्या आंदोलकांनी हौद पाडला खरा परंतु तो पाडण्याची आवश्यकताच नव्हती, अशी माहिती शुक्रवारी चर्चेतून पुढे आली तरीही कृती समितीने हौद पाडण्याचे पाप बांधकाम विभागाच्या डोकीवरच फोडण्यात आले. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या शिवाजी पुलाचे आयुष्य संपल्यामुळे त्याच्या शेजारीच पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू आहे; परंतु पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करून या बांधकामाच्या आड येणारा जकात नाका, पाण्याचा हौद तसेच आठ ते दहा झाडे तोडण्यासाठी आंदोलन केले. तथापि सुरुवातीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आंदोलकांची दिशाभूल केल्याने आंदोलकांनी जकात नाका व पाण्याचा हौद पाडला. आता पाडण्यात आलेला हौद अन्यत्र स्थलांतर करावा म्हणून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते. त्यामुळे शुक्रवारी शिवाजी पुलावर प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार बांधकाम विभागाचे अधिकारी अभय आवटी, मनपाचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना सहायक संचालक धनंजय खोत, शहर हेरिटेज कमिटीच्या अमरजा निंबाळकर, कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पाडलेला हौद अन्यत्र स्थलांतर करून तो नव्याने बांधावा, असा आग्रह धरला. गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा हौद बांधकामाच्या आड येत असल्याचे सांगणारे बांधकाम विभागाचे आवटी शुक्रवारी मात्र हौद पाडण्याची आवश्यकता नाही, तो पुलाच्या आडवा येत नाही तर थोडा भाग जोड रस्त्यात येतो, असे सांगायला लागले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. तुम्ही सांगत होता म्हणूनच आम्ही आंदोलन केले आहे, आता पाडण्यात आलेला हौद अन्यत्र हलवून त्याचे बांधकाम करावे, काम कधी सुरू करणार हे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला येथून सोडणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. दीपा पाटील, रूपाली पाटील, जहिदा मुजावर, सुनीता राऊत, पल्लवी ढगे, शीतल तिवडे, माई वाडेकर, मंजिरी वालावलकर, पूनम सुळगांवकर यांनी अभय आवटी यांना चक्क घेरावो घातला. त्यामुळे अडचणीत आलेल्या आवटी यांनी नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला.