शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

मध्यान्ह भोजन स्वयंपाकी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेतंर्गत देण्यात येणारा आहार बंद करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेतंर्गत देण्यात येणारा आहार बंद करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील १ लाख ७० हजार स्वयंपाकी अडचणीत आल्या असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या निर्णयाला लालबावटा, शालेय पोषण आहार कामगार संघटनेने विरोध केला आहे.

इयत्ता पहिली ती आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. केंद्र सरकारने १९९५ पासून ही योजना आणली असून स्थानिक पातळीवर बचत गटाच्या महिला, गरजू विधवा परितक्ता, मागासवर्गीय महिलांना आहार शिजवून देण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यातून त्यांना रोजगार मिळाला होता. मात्र केंद्र सरकारने या योजनेत बदल करून आहाराऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील १५ लाख तर राज्यातील १ लाख ७० हजार स्वयंपाकी महिलांवर गंडातर येणार आहे.

हा निर्णय केंद्राने मागे घ्यावा, यासाठी लालबावटा, शालेय पोषण आहार कामगार संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भगवान पाटील, कार्याध्यक्ष प्रा. आर. एन. पाटील, उपाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकातून दिली.