शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

विश्वासात घेऊन नियोजन करावे

By admin | Updated: September 12, 2015 00:52 IST

मागणी : क्षेत्र निश्चितप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार : आंदोलन विश्वासात घेऊन नियोजन करावे फेरीवाल्यांची मागणी : उद्या क्षेत्र निश्चितप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार : जबरदस्ती केल्यास आंदोलन

कोल्हापूर : शहरातील फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करताना महानगरपालिका प्रशासनाने कोणाशी चर्चा करून निर्णय घेतला, असा सवाल करीत फेरीवाल्यांना विश्वासात न घेता जर काही अशा प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर सर्व फेरीवाल्यांना पुन्हा एकदा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीतर्फे शुक्रवारी देण्यात आला. महानगरपालिका प्रशासनातर्फे गुरुवारी (दि. १०) शहरातील फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले; परंतु महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे धक्का बसला. फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि त्या अनुषंगाने शहरातील विविध भागांत फिरती करून पाहणी करण्यात येत असताना, असा अचानक कसा काय निर्णय घेतला, अशी विचारणा खुद्द फेरीवाला कृती समितीचे नेते करू लागले. सायंकाळी अचानक त्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते. महानगरपालिका प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद असल्याने उद्या, रविवारी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहावर पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटण्याचा, तसेच मंगळवारी (दि. १५) सकाळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला तर मात्र फेरीवाल्यांसमोर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय असणार नाही, असा इशाराच बैठकीत देण्यात आला. फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यासाठी चार विभागीय कार्यालयांमार्फत समित्या नेमण्यात आलेल्या असून, या समित्यांचे सदस्य शहरात फिरती करीत आहेत. पर्यायी व्यवस्था काय करायची, कोठे करायची याचा अभ्यास केला जात आहे. परंतु असे असताना एकदमच हे क्षेत्र जाहीर केले. कोणाच्या सांगण्यावरून प्रशासनाने हा निर्णय घेतला, त्याला कोणाची मंजुरी घेण्यात आली, असे प्रश्न दिलीप पवार यांनी बैठकीत उपस्थित के ले. विभागीय समितीच्या बैठकीत महापालिकेच्या नियोजनाला थेट विरोध करण्यात आला असताना असा एकतर्फी निर्णय घेण्याची काय गरज होती, असा सवालही पवार यांनी केला. महानगरपालिकेने केलेल्या नियोजनास निवडणुकीचा वास येतो का, अशी शंकाही यावेळी काहीजणांनी बैठकीत व्यक्त केली. रस्त्यावर व्यवसाय करण्याचा फेरीवाल्यांचा हक्कच असून त्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने धोरण राबविण्याचे आदेश दिले आहेत.व्यवसाय करायचा तरी कोठे? शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवर ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी महत्त्वाच्या रस्त्यांवर फे रीवाले महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेत व्यवसाय करीत आहेत. तरीही ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करताना याच प्रमुख रस्त्यांचा त्यात समावेश केल्याने फेरीवाल्यांनी व्यवसाय करायचा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.