शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासात घेऊन नियोजन करावे

By admin | Updated: September 12, 2015 00:52 IST

मागणी : क्षेत्र निश्चितप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार : आंदोलन विश्वासात घेऊन नियोजन करावे फेरीवाल्यांची मागणी : उद्या क्षेत्र निश्चितप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार : जबरदस्ती केल्यास आंदोलन

कोल्हापूर : शहरातील फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करताना महानगरपालिका प्रशासनाने कोणाशी चर्चा करून निर्णय घेतला, असा सवाल करीत फेरीवाल्यांना विश्वासात न घेता जर काही अशा प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर सर्व फेरीवाल्यांना पुन्हा एकदा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीतर्फे शुक्रवारी देण्यात आला. महानगरपालिका प्रशासनातर्फे गुरुवारी (दि. १०) शहरातील फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले; परंतु महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे धक्का बसला. फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि त्या अनुषंगाने शहरातील विविध भागांत फिरती करून पाहणी करण्यात येत असताना, असा अचानक कसा काय निर्णय घेतला, अशी विचारणा खुद्द फेरीवाला कृती समितीचे नेते करू लागले. सायंकाळी अचानक त्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते. महानगरपालिका प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद असल्याने उद्या, रविवारी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृहावर पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटण्याचा, तसेच मंगळवारी (दि. १५) सकाळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महापालिका प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला तर मात्र फेरीवाल्यांसमोर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय असणार नाही, असा इशाराच बैठकीत देण्यात आला. फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यासाठी चार विभागीय कार्यालयांमार्फत समित्या नेमण्यात आलेल्या असून, या समित्यांचे सदस्य शहरात फिरती करीत आहेत. पर्यायी व्यवस्था काय करायची, कोठे करायची याचा अभ्यास केला जात आहे. परंतु असे असताना एकदमच हे क्षेत्र जाहीर केले. कोणाच्या सांगण्यावरून प्रशासनाने हा निर्णय घेतला, त्याला कोणाची मंजुरी घेण्यात आली, असे प्रश्न दिलीप पवार यांनी बैठकीत उपस्थित के ले. विभागीय समितीच्या बैठकीत महापालिकेच्या नियोजनाला थेट विरोध करण्यात आला असताना असा एकतर्फी निर्णय घेण्याची काय गरज होती, असा सवालही पवार यांनी केला. महानगरपालिकेने केलेल्या नियोजनास निवडणुकीचा वास येतो का, अशी शंकाही यावेळी काहीजणांनी बैठकीत व्यक्त केली. रस्त्यावर व्यवसाय करण्याचा फेरीवाल्यांचा हक्कच असून त्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने धोरण राबविण्याचे आदेश दिले आहेत.व्यवसाय करायचा तरी कोठे? शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवर ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी महत्त्वाच्या रस्त्यांवर फे रीवाले महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेत व्यवसाय करीत आहेत. तरीही ना-फेरीवाला क्षेत्र जाहीर करताना याच प्रमुख रस्त्यांचा त्यात समावेश केल्याने फेरीवाल्यांनी व्यवसाय करायचा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.