शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

हातकणंगले तालुका , निवडणुकीपूर्वी राजकीय हवा तापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:50 IST

हातकणंगले : नेते तितके पक्ष आणि आघाड्या याप्रमाणे तालुक्याचे राजकारण प्रत्येक नेत्याभोवती फिरत असून, निवडणुका अद्याप वर्ष-दीड वर्षावर असल्या तरी आतापासूनच राजकीय हवा तापायला सुरुवात झाली

ठळक मुद्देशिवसेनेत गटबाजी, कॉग्रेसमध्ये दुफळी, भाजप ‘जनसुराज्य’च्या विलीनीकरणाच्या हालचाली

दत्ता बिडकर।हातकणंगले : नेते तितके पक्ष आणि आघाड्या याप्रमाणे तालुक्याचे राजकारण प्रत्येक नेत्याभोवती फिरत असून, निवडणुका अद्याप वर्ष-दीड वर्षावर असल्या तरी आतापासूनच राजकीय हवा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या हातकणंगले भेटीने शिवसैनिक रिचार्ज झाले तरी गटबाजी मात्र कायम आहे.

काँग्रेस (आय)चे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर दौºयामध्ये तालुका काँग्रेसमधील दुफळी उफाळून आली, तर भाजप आणि ‘जनसुराज्य’च्या विलीनीकरणाच्या हालचाली मुख्यमंत्र्यांच्या वारणा भेटीने गडद झाल्या. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची राजकीय जवळीक भाजपसह इतरांची डोकेदुखी वाढविणारी आहे. मात्र, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकीय गुगली आणि माजी खासदार निवेदिता माने यांची राष्ट्रवादीतील सक्रियता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उदंड झाले पक्ष आणि मोकाट सुटतील नेते, अशीच राहणार आहे.

आगामी वर्षभरामध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत; मात्र आतापासूनच तालुक्यामध्ये राजकीय हवा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा हातकणंगले येथील धावता दौरा शिवसैनिकांना रिचार्ज करणारा ठरला असला तरी आमदार आणि जिल्हाप्रमुख अशी गटबाजी लपून राहिली नाही. भाजपनेही तालुक्यामध्ये ‘जनसुराज्य’ला बरोबर घेतले आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी माजी आमदार राजीव आवळे यांना पाठबळ देण्यासाठी भाजपची सर्व ताकद त्यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कोल्हापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वारणा दौºयामुळे भाजप आणि जनसुराज्य विलीनीकरणाची चर्चा जोरात आहे.

काँग्रेस (आय)चे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर दौºयामध्ये माजी खा. जयवंत आवळे यांनी उघडपणे केलेल्या तक्रारीने तालुक्यामधील गटबाजी स्पष्ट झाली आहे. आवाडे आणि आवळे यांचे इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभेचे राजकारण काँग्रेसला दोन्ही मतदारसंघांतून संपविण्यास कारणीभूत ठरले आहे. आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवीन कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी तयार करून निवडणुका लढविल्या आणि यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झालीराजू शेट्टी, प्रकाश आवाडे जवळीक : भाजप-जनसुराज्यला त्रासदायकतालुक्याच्या बदलत्या राजकीय संदर्भानुसार स्वाभिमानी पक्षाचे खा. राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली. याचा फायदा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी उचलून खा. राजू शेट्टी यांच्याबरोबर आवाडे यांनी जवळीक वाढवत भाजपबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्याच्या आगामी राजकीय निवडणुकीमध्ये आवाडे आणि शेट्टींची गट्टी जमण्याची शक्यता असून, तसे झाल्यास काँग्रेस, शिवसेना आणि भाजप-जनसुराज्यला ही धोक्याची घंटा आहे२ तालुक्याच्या राजकारणामध्ये वेगळा असलेला माजी आ. महादेवराव महाडिक यांचा गट ऐनवेळी कोणती राजकीय गुगली टाकणार हे स्पष्ट नसले तरी महाडिक यांना धड भाजप जमेला धरत नाही आणि धड काँग्रेसही जमेला धरत नसल्यामुळे महाडिक कोणाचे हे समजत नाही. कारण महाडिक नेहमी जिंकणाºया घोड्यावर स्वार होऊन राजकारण करीत आले असल्यामुळे महाडिक यांचे राजकारण फिरत्या ढालीप्रमाणे झाले आहे३ माजी खा. निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चापासून आपली सक्रियता वाढविली आहे. निवेदिता माने आणि सत्त्वशील माने यांची तालुका मोर्चाला असलेली उपस्थिती राष्ट्रवादीला बळ देणारी आहे. मात्र, धैर्यशील माने यांची खासदार संभाजीराजे यांच्याबरोबर असलेली सलगी आणि आ. सुरेश हाळवणकर आणि भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्याबरोबर असलेली सलगी पाहता माजी खासदारांच्या घरात दोन गट असल्याची चर्चा आहे.