शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

हातकणंगले, बुलडाणा ‘स्वाभिमानी’च्या वाट्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:32 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तशी घोषणा रविवारी नांदेड येथे केली; परंतु बुलडाण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्या पक्षाने संमती देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकत्रित बैठक होत आहे. त्यामध्येच त्याचा अंतिम निर्णय होईल.संघटनेने तीन जागा मागितल्या आहेत, त्यातील दोन मिळत असतील तर संघटनेलाही ते हवेच आहे. दुसऱ्या बाजूला खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा मोदी सरकारविरोधात आक्रमक बोलणारा नेता आघाडीत हवा ही देखील दोन्ही काँग्रेसचीही अगतिकता आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी काही करून शेट्टी यांना आघाडीतून बाहेर जाऊ देणार नाही. बुलडाण्यातून संघटनेचे रविकांत तूपकर हे उमेदवार असतील. त्यांनी जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. संघटनेला लोकसभेच्या दोन जागांवर विजय व ६ टक्के मते मिळाल्यास प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. संघटनेतील दोन नंबरचे नेतृत्व म्हणून तूपकर यांना बळ देणे याचा शेट्टी यांच्यावरही दबाव आहे.त्यामुळे बुलडाण्याची जागा मिळाल्यास संघटनेला आघाडीसोबत जाण्यात अडचण नाही. या मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव चर्चेत आहे.त्यांच्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार हेच आग्रही आहेत; परंतु त्यांना जर स्वाभिमानी संघटना आघाडीत हवी असेल तर ही जागा सोडावीच लागेल, असे चित्र आहे. तो अंदाज घेऊनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तशी घोषणा केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.इंद्रजित देशमुख अजून द्विधा मन:स्थितीत...च्संघटनेने सांगली लोकसभेची जागा आपल्याला द्यावी व तेथून निवृत्त सरकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांना लढण्याची आॅफर दिली आहे; परंतु ते अजून द्विधा मनस्थितीत आहेत.मी आयुष्यभर रचनात्मक काम करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राजकारणात जाऊन मला एकमेकांची उणीदुणी काढणे जमणार नाही, असे त्यांना वाटते. तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात यायला हवीत. उणीदुणी काढायचीच नाहीत.आपण आपले चांगले काम घेऊन पुढे जायचे, असा आग्रह खासदार शेट्टी यांनी त्यांच्याकडे धरला आहे. ही जागा काँग्रेसकडूनही स्वाभिमानीला मिळणार का, याची अजून खात्री नसल्याने देशमुख यांना आग्रह करण्यातही अडचणी येत आहेत.