शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

हसन मुश्रीफ म्हणाले, ऊसदरासाठी आमचा शेट्टींना पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:40 IST

कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत स्वत: मुख्यमंत्री असल्याने दराची घोषणा होऊन कारखाने सुरळीत सुरू होतील, अशी अपेक्षा ...

कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत स्वत: मुख्यमंत्री असल्याने दराची घोषणा होऊन कारखाने सुरळीत सुरू होतील, अशी अपेक्षा होती; पण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे. याउलट भाजप सरकारने घेतलेल्या शेतकरीविरोधी भूमिकेवर खासदार राजू शेट्टी यांनी तत्त्वाचा लढा सुरू केला आहे. ऊसदराच्या आंदोलनात त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. दोन्ही संघटनांच्या वादात कारखानदारांची फरफट होत असून आंदोलन लांबू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कोल्हापुरात आज, शनिवारी होत असलेल्या युवा यल्गार परिषदेची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार बैठकीत मुश्रीफ यांनी साखर कारखानदारी आणि शेतकरी संघटना आंदोलन यांवर मते व्यक्त केली. मुश्रीफ म्हणाले, वारणा कोडोलीत झालेल्या ‘रयत’च्या ऊस परिषदेत स्वत: मुख्यमंत्री असल्याने ऊसदराचा तोडगा निघेल, अशी सर्वांची अपेक्षा होती; पण मुख्यमंत्र्यांनी तिजोरी रिकामी करतो एवढेच सांगितले. वास्तविक त्यांनी एफआरपी तर देऊच; शिवाय वरील रकमेबाबत तातडीने रकमेची तरतूद करण्याची घोषणा करायला हवी होती. साखरेचा हमीभाव प्रस्ताव पाठवितो म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना फोन करून लागलीच घोषणा करायला हवी होती. यांपैकी एकही झालेले नसल्यामुळे आता राजू शेट्टींच्या ऊस परिषदेकडून आम्हाला अपेक्षा आहेत.दोन संघटनांच्या ऊस परिषदा होत असल्याने आतापर्यंत एकाबरोबर संघर्ष होता. आता तो दोघांबरोबर करावा लागतो, असे सांगून मुश्रीफ यांनी आमची मात्र फरफट होणार आहे; पण सध्याच्या परिस्थितीत कारखाने जास्त काळ बंद ठेवणे परवडणारे नाही. सोलापूर व कर्नाटकातील कारखाने सुरू झाले आहेत. यावर तातडीने तोडगा निघण्याची गरज आहे.महादेवराव महाडिकांवर १0 कोटींचा दावा ठोकणार‘गोकुळ’ मल्टिस्टेटवरून आंदोलन सुरू असताना, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी जिल्हा बँकेतील संचालकांच्या दुबईवारीवरून पत्रकार बैठक घेऊन जिल्हा बँक संचालक व आमदार मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. यावरून जिल्हा बँकेची बदनामी झाल्याचे सांगत आमदार मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांच्यावर पाच कोटींचा दावा दाखल करण्याची तयारी केली होती, आता संचालकांनीही पाच कोटी रुपये घालणार असल्याचे सांगितल्याने जिल्हा बँकेतर्फे १0 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा येत्या चार दिवसांत दाखल करणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी घोषित केले आहे.कोल्हापूरला वेगळा न्याय का?इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने नेहमीच एफआरपीसह सर्व लाभ शेतकºयांना देतात. तरीही दरवर्षी आंदोलनातून कोल्हापूरला वेठीस धरले जाते. एफआरपी आणि ७0:३0 असे दोन कायदे असताना पुन्हा आंदोलन होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचे नुकसान होत आहे.