शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्राचा नव्हे भाजपचा जमाना

By admin | Updated: December 7, 2015 00:20 IST

राजू शेट्टींची उद्विग्नता : मंत्रिमंडळ विस्ताराचा चाप्टर ६ महिन्यांपूर्वीच बंद

कोल्हापूर : हरिशचंद्राच्या राज्यात स्वप्नातील ही खरे व्हायचे पण आता तर भाजपचे सरकार आहे, हरिशचंद्राचे नव्हे, अशी उद्विग्नता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा चाप्टर आपल्या पातळीवर सहा महिन्यांपूर्वीच बंद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकरकमी एफआरपी व आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. खासदार राजू शेट्टी म्हणाले, हा विषय माझ्या पातळीवर सहा महिन्यांपूर्वीच बंद झाला आहे. त्यावर आता काही बोलणार नाही; पण एवढे सांगावेसे वाटते, पूर्वी हरिशचंद्राच्या राज्यात स्वप्नातील गोष्ट ही खरी व्हायची, पण भाजप सरकारच्या जमान्यात दिवसा-ढवळ्या दिलेल्या वचन पाळले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानाशी बोलणार नाही, माझ्यादृष्टीने ऊसदराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यांनी कारखानदारी मोडीत काढली, त्यांनाच सोबत घेऊन भाजप सरकार काम करत आहे. सरकार आमचे पण सल्ला देणारे गडी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. आम्ही मात्र दाराबाहेर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विधानपरिषदेत पत्ते खुलेराज्याच्या राजकारणात भाजप आमचा जवळचा मित्र आहे. भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांचा उमेदवार नसेल तर आमचे पत्ते खुले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सरकारकडून शेतकऱ्यांचा अनादरभ्रष्टाचारी कारखानदारांची चौकशी लावून त्यांच्या हातात बेड्या ठोकतील म्हणून शेतकऱ्यांनी मतपेटीद्वारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील संताप व्यक्त केला; पण सध्या सरकारच्या हालचाली पाहता शेतकऱ्यांच्या मतांचा अनादर सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली.सदाभाऊंचे तोंडावर बोटऊसदर आंदोलनाबाबत संपूर्ण माहिती शेट्टी यांनीच सांगितली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सदाभाऊ खोत यांना विचारले असता, त्यांनी तोंडावर बोट ठेवत शेट्टींकडे बोट केले.