शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

हापूसची आवक वाढली; दर आवाक्यात

By admin | Updated: May 10, 2017 23:07 IST

अजूनही आंबा काढणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क --रत्नागिरी : स्थानिक बाजारपेठेत आवक वाढल्यामुळे हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. सद्य:स्थितीत झाडपिक्या आंब्यांचा डझनाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत कमी झाला आहे. काढणीचा आंबा मात्र अजूनही साडेतीनशे रुपये डझन या दरानेच विकला जात आहे.झाडावरच पिकलेल्या आंब्याची रत्नागिरी बाजारातील आवक वाढली आहे. या आंब्यांचा कालावधी कमी असल्याने त्याचा दर आता साडेतीनशेवरून अडीचशे रुपयांवर आला आहे. बाजारात जागोजागी आंबा विक्री होत असून, सर्वत्र अडीचशे रुपये हाच दर आहे. लहान आकाराचे फळ दिडशे ते दोनशे रुपयांनाही विकले जात आहे.झाडावरून काढलेला आणि काही दिवस टिकेल असा (कच्चा) हापूस मात्र अजूनही साडेतीनशे रुपये दरानेच विकला जात आहे. स्थानिक बाजारपेठेत अशा आंब्याचे प्रमाण कमी आहे. अजूनही आंबा मोठ्या प्रमाणात मुंबई बाजारात पाठविला जात आहे. यावर्षी उष्म्याचा त्रास झाल्याने मोठ्या प्रमाणत फळ खराब झाले. तरीही आंब्याचे प्रमाण चांगले असल्याने यावर्षी दोन हजार किलोहून अधिक आंबा परदेशात गेला आहे.महामार्गावर मोठ्या प्रमाणात विक्रीसध्या मुंबई-गोवा महामार्गावर हापूस विक्रीने जोर धरला आहे. सुट्या सुरू असल्याने महामार्गावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आंबा विक्रीही चांगलीच वाढली आहे. तेथेही हापूसचा दर अडीचशे रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत आहे.अजूनही आंबा काढणी सुरूउशिरापर्यंत पडलेल्या थंडीमुळे मोहोर येण्याचा प्रकार उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे अजूनही आंबा काढणी सुरू आहे. मे महिन्याअखेरपर्यंत आंबा काढणी सुरूच राहील, असे चित्र यंदा दिसत आहे.