शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

‘रिपाइं’ कार्यकर्त्यांची मागणी : निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबूकवर आक्षेपार्ह प्रतिमा टाकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत थोर पुरुषांची विटंबना रोखू न शकणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे, अशी मागणी आज, रविवारी जिल्ह्णातील ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पदावर राहण्याची नैतिकता नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकर यांची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूर शहरासह शेजारील गावांत पसरली. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. कावळा नाका येथे जमा झालेल्या ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. त्यानंतर हा जमाव मध्यवर्ती बसस्थानकमार्गे दसरा चौकातून बिंदू चौकात आला. येथे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. प्रा. कांबळे म्हणाले, आज घडलेली घटना निंदनीय आहे, अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत शासन कोणती भूमिका घेते, ते पाहून आगामी दोन दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गावा-गावांत शांततेत बंद करा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘रिपाइं’(आठवले)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आता डॉ. आंबेडकरांची विटंबना केली, अशा प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. आंबेडकरी जनतेचा संयम पाहू नका, वेळेत बंधन घाला, अन्यथा जे काही परिणाम होतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्यशासनाची असेल, असा इशाराही त्यांंनी दिला. मुस्लीम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करून या थोर पुरुषांचा अपमान फेसबुकच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर फेसबुकवर बंदी आणावी. चीनप्रमाणे आपल्या देशाने या विघातक यंत्रणेवर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी करत थोर पुरुषांची विटंबना यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘रिपाइं’(गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख म्हणाले, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला एकात्मता व शांततेचा संदेश दिला, त्यांची अशा प्रकारची विटंबना सहन होत नाही. असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला माफ करू नका. थोर पुरुषांच्या विटंबनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रा. देशमुख यांनी केली. दुर्वास कदम, गणी आजरेकर, बाळासाहेब वाशीकर आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)