शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

‘रिपाइं’ कार्यकर्त्यांची मागणी : निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबूकवर आक्षेपार्ह प्रतिमा टाकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत थोर पुरुषांची विटंबना रोखू न शकणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे, अशी मागणी आज, रविवारी जिल्ह्णातील ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पदावर राहण्याची नैतिकता नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकर यांची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूर शहरासह शेजारील गावांत पसरली. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. कावळा नाका येथे जमा झालेल्या ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. त्यानंतर हा जमाव मध्यवर्ती बसस्थानकमार्गे दसरा चौकातून बिंदू चौकात आला. येथे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. प्रा. कांबळे म्हणाले, आज घडलेली घटना निंदनीय आहे, अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत शासन कोणती भूमिका घेते, ते पाहून आगामी दोन दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गावा-गावांत शांततेत बंद करा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘रिपाइं’(आठवले)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आता डॉ. आंबेडकरांची विटंबना केली, अशा प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. आंबेडकरी जनतेचा संयम पाहू नका, वेळेत बंधन घाला, अन्यथा जे काही परिणाम होतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्यशासनाची असेल, असा इशाराही त्यांंनी दिला. मुस्लीम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करून या थोर पुरुषांचा अपमान फेसबुकच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर फेसबुकवर बंदी आणावी. चीनप्रमाणे आपल्या देशाने या विघातक यंत्रणेवर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी करत थोर पुरुषांची विटंबना यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘रिपाइं’(गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख म्हणाले, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला एकात्मता व शांततेचा संदेश दिला, त्यांची अशा प्रकारची विटंबना सहन होत नाही. असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला माफ करू नका. थोर पुरुषांच्या विटंबनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रा. देशमुख यांनी केली. दुर्वास कदम, गणी आजरेकर, बाळासाहेब वाशीकर आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)