शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

‘रिपाइं’ कार्यकर्त्यांची मागणी : निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबूकवर आक्षेपार्ह प्रतिमा टाकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत थोर पुरुषांची विटंबना रोखू न शकणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे, अशी मागणी आज, रविवारी जिल्ह्णातील ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पदावर राहण्याची नैतिकता नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. डॉ. आंबेडकर यांची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूर शहरासह शेजारील गावांत पसरली. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. कावळा नाका येथे जमा झालेल्या ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. त्यानंतर हा जमाव मध्यवर्ती बसस्थानकमार्गे दसरा चौकातून बिंदू चौकात आला. येथे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली. प्रा. कांबळे म्हणाले, आज घडलेली घटना निंदनीय आहे, अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत शासन कोणती भूमिका घेते, ते पाहून आगामी दोन दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गावा-गावांत शांततेत बंद करा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘रिपाइं’(आठवले)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आता डॉ. आंबेडकरांची विटंबना केली, अशा प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. आंबेडकरी जनतेचा संयम पाहू नका, वेळेत बंधन घाला, अन्यथा जे काही परिणाम होतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्यशासनाची असेल, असा इशाराही त्यांंनी दिला. मुस्लीम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करून या थोर पुरुषांचा अपमान फेसबुकच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर फेसबुकवर बंदी आणावी. चीनप्रमाणे आपल्या देशाने या विघातक यंत्रणेवर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी करत थोर पुरुषांची विटंबना यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘रिपाइं’(गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख म्हणाले, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला एकात्मता व शांततेचा संदेश दिला, त्यांची अशा प्रकारची विटंबना सहन होत नाही. असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला माफ करू नका. थोर पुरुषांच्या विटंबनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रा. देशमुख यांनी केली. दुर्वास कदम, गणी आजरेकर, बाळासाहेब वाशीकर आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)