शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी हात सरसावले...

By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST

नुकसानीची संयुक्त भरपाई देणार; ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित झालेल्या ज्या शहरात शनिवारी रात्री काही मूठभर समाजकंटकांनी मुस्लिमबांधवांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून, जाळपोळ करून नुकसान केले, त्याच शहराने त्याचे दायित्व स्वीकारत झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी पार पाडण्याचा एक प्रागतिक निर्णय आज, मंगळवारी घेतला. नुसते आवाहन करताच पावणेतीन लाखांचा निधीही गोळा झाला. दरम्यान, येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे विटंबन झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करत शहरातील त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून जाळपोळ केली होती. या दगडफेकीत व जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे. समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शांतता समिती स्थापन झाली असून, या समितीची बैठक आज झाली. या बैठकीत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी झालेले नुकसान भरून देण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे. त्याला हिंदू समाजानेही हातभार लावावा, असे आवाहन केले. आजरेकर यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत बैठकीस जमलेल्या हिंदू समाजातील बांधवांनीही तत्काळ मदतीची घोषणा केली. गोविंद पानसरे यांनी एक लाख, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग व मुख्याध्यापक संघ यांनी ५० हजार, आर. के. पोवार यांनी ११ हजार, रामभाऊ चव्हाण यांनी पाच हजार, अशी मदत जाहीर करून मुस्लिम समाजाच्या नुकसानीचे दायित्व स्वीकारले. बैठकीत पाचशेपासून मदत जाहीर झाली अन् बघता-बघता पावणेतीन लाख रुपयांचा निधी जमा झाला. पुढचे आणखी काही दिवस हा निधी जमा केला जाणार आहे. ज्यांना कोणाला मदत द्यायची आहे, अशा हिंदू व मुस्लिम समाजातील दानशूरांनी गणी आजरेकर व चंद्रकांत यादव यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर शहराची परंपरा आणि जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी ११ जूनला शांती मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत येत्या सहा दिवसांत पेठा-पेठांमधून शांतता राहण्यासाठी शपथा घ्याव्यात, कॅँडल मार्च काढावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणावा, सोशल मीडियात सापडलेल्या युवा पिढीचे प्रबोधन करावे, गल्लीनिहाय शांतता कमिट्या स्थापन कराव्यात, अशा कमिट्यांच्या बैठका महिन्यातून एकदा घ्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. बैठकीत एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्यासह आर. के. पोवार, निवासराव साळोखे, चंद्रकांत यादव, रामभाऊ चव्हाण, अशोकराव साळोखे, गणी आजरेकर, कादर मलबारी, बाळासाहेब मेढे-पवार, समीर बागवान, समीर नदाफ, वसंतराव मुळीक, नियाज काझी, नगरसेवक आदिल फरास, एस. डी. लाड, जयकुमार शिंदे, फिरोजखान उस्ताद, महंमदशरीफ शेख, गिरीष फोंडे, उदय गायकवाड यांची भाषणे झाली.