शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मदतीसाठी हात सरसावले...

By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST

नुकसानीची संयुक्त भरपाई देणार; ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित झालेल्या ज्या शहरात शनिवारी रात्री काही मूठभर समाजकंटकांनी मुस्लिमबांधवांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून, जाळपोळ करून नुकसान केले, त्याच शहराने त्याचे दायित्व स्वीकारत झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी पार पाडण्याचा एक प्रागतिक निर्णय आज, मंगळवारी घेतला. नुसते आवाहन करताच पावणेतीन लाखांचा निधीही गोळा झाला. दरम्यान, येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे विटंबन झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करत शहरातील त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून जाळपोळ केली होती. या दगडफेकीत व जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे. समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शांतता समिती स्थापन झाली असून, या समितीची बैठक आज झाली. या बैठकीत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी झालेले नुकसान भरून देण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे. त्याला हिंदू समाजानेही हातभार लावावा, असे आवाहन केले. आजरेकर यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत बैठकीस जमलेल्या हिंदू समाजातील बांधवांनीही तत्काळ मदतीची घोषणा केली. गोविंद पानसरे यांनी एक लाख, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग व मुख्याध्यापक संघ यांनी ५० हजार, आर. के. पोवार यांनी ११ हजार, रामभाऊ चव्हाण यांनी पाच हजार, अशी मदत जाहीर करून मुस्लिम समाजाच्या नुकसानीचे दायित्व स्वीकारले. बैठकीत पाचशेपासून मदत जाहीर झाली अन् बघता-बघता पावणेतीन लाख रुपयांचा निधी जमा झाला. पुढचे आणखी काही दिवस हा निधी जमा केला जाणार आहे. ज्यांना कोणाला मदत द्यायची आहे, अशा हिंदू व मुस्लिम समाजातील दानशूरांनी गणी आजरेकर व चंद्रकांत यादव यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर शहराची परंपरा आणि जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी ११ जूनला शांती मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत येत्या सहा दिवसांत पेठा-पेठांमधून शांतता राहण्यासाठी शपथा घ्याव्यात, कॅँडल मार्च काढावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणावा, सोशल मीडियात सापडलेल्या युवा पिढीचे प्रबोधन करावे, गल्लीनिहाय शांतता कमिट्या स्थापन कराव्यात, अशा कमिट्यांच्या बैठका महिन्यातून एकदा घ्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. बैठकीत एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्यासह आर. के. पोवार, निवासराव साळोखे, चंद्रकांत यादव, रामभाऊ चव्हाण, अशोकराव साळोखे, गणी आजरेकर, कादर मलबारी, बाळासाहेब मेढे-पवार, समीर बागवान, समीर नदाफ, वसंतराव मुळीक, नियाज काझी, नगरसेवक आदिल फरास, एस. डी. लाड, जयकुमार शिंदे, फिरोजखान उस्ताद, महंमदशरीफ शेख, गिरीष फोंडे, उदय गायकवाड यांची भाषणे झाली.