शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

मदतीसाठी हात सरसावले...

By admin | Updated: June 3, 2014 23:59 IST

नुकसानीची संयुक्त भरपाई देणार; ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित झालेल्या ज्या शहरात शनिवारी रात्री काही मूठभर समाजकंटकांनी मुस्लिमबांधवांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून, जाळपोळ करून नुकसान केले, त्याच शहराने त्याचे दायित्व स्वीकारत झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी पार पाडण्याचा एक प्रागतिक निर्णय आज, मंगळवारी घेतला. नुसते आवाहन करताच पावणेतीन लाखांचा निधीही गोळा झाला. दरम्यान, येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे विटंबन झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करत शहरातील त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून जाळपोळ केली होती. या दगडफेकीत व जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे. समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शांतता समिती स्थापन झाली असून, या समितीची बैठक आज झाली. या बैठकीत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी झालेले नुकसान भरून देण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे. त्याला हिंदू समाजानेही हातभार लावावा, असे आवाहन केले. आजरेकर यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत बैठकीस जमलेल्या हिंदू समाजातील बांधवांनीही तत्काळ मदतीची घोषणा केली. गोविंद पानसरे यांनी एक लाख, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग व मुख्याध्यापक संघ यांनी ५० हजार, आर. के. पोवार यांनी ११ हजार, रामभाऊ चव्हाण यांनी पाच हजार, अशी मदत जाहीर करून मुस्लिम समाजाच्या नुकसानीचे दायित्व स्वीकारले. बैठकीत पाचशेपासून मदत जाहीर झाली अन् बघता-बघता पावणेतीन लाख रुपयांचा निधी जमा झाला. पुढचे आणखी काही दिवस हा निधी जमा केला जाणार आहे. ज्यांना कोणाला मदत द्यायची आहे, अशा हिंदू व मुस्लिम समाजातील दानशूरांनी गणी आजरेकर व चंद्रकांत यादव यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर शहराची परंपरा आणि जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी ११ जूनला शांती मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत येत्या सहा दिवसांत पेठा-पेठांमधून शांतता राहण्यासाठी शपथा घ्याव्यात, कॅँडल मार्च काढावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणावा, सोशल मीडियात सापडलेल्या युवा पिढीचे प्रबोधन करावे, गल्लीनिहाय शांतता कमिट्या स्थापन कराव्यात, अशा कमिट्यांच्या बैठका महिन्यातून एकदा घ्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. बैठकीत एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्यासह आर. के. पोवार, निवासराव साळोखे, चंद्रकांत यादव, रामभाऊ चव्हाण, अशोकराव साळोखे, गणी आजरेकर, कादर मलबारी, बाळासाहेब मेढे-पवार, समीर बागवान, समीर नदाफ, वसंतराव मुळीक, नियाज काझी, नगरसेवक आदिल फरास, एस. डी. लाड, जयकुमार शिंदे, फिरोजखान उस्ताद, महंमदशरीफ शेख, गिरीष फोंडे, उदय गायकवाड यांची भाषणे झाली.