शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजीपाल्याची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, पाच दिवसांत आवक निम्म्यावर आली आहे. त्यामुळे दरात थोडी वाढ दिसत असून, फळ मार्केटवरही पावसाचा परिणाम दिसत आहे.

यंदा ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने पाठ सोडली नव्हती. त्यामुळे रब्बीसह भाजीपाल्याची पेरणी उशिरा झाली. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. भात कापणी झाल्यानंतर भाजीपाल्याची लागवडही केली. आता भाजीपाला सुरू होतो, तोपर्यंत अवकाळी पावसाने नासाडी करण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन-चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. मेघगर्जनेसह ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असल्याने रब्बीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

कोल्हापूर बाजार समितीतील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा व गुळाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. सोमवारी (दि. ४) बाजार समितीत होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेची तुलना केली, तर ती निम्म्यावर आली आहे. कोबी, टोमॅटो, गवारी, कारली, भेंडी या प्रमुख भाज्यांची आवक एकदम कमी झाली आहे. दरातही थोडी वाढ झाली आहे. कांद्याची आवक रोज दोन हजार पिशव्यांनी कमी झाली आहे.

कलिंगडाच्या दरात घसरण

हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडाला दर चांगला मिळत असल्याने लागवड लवकर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच स्थानिक कलिंगडाची आवक झाली; मात्र अवकाळी पावसाने मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे.

गुळाचे उत्पादनही घटले

पावसामुळे गुऱ्हाळघरे कशीबशीच सुरू आहेत. त्यामुळे आवक कमी झाली असून, रोज पाचशे गूळ रवे कमी झाले आहेत. आवकेबरोबर मागणीही कमी झाल्याने दरात फारसा चढ-उतार दिसत नाही.