शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

भाजीपाल्याची आवक निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, पाच दिवसांत आवक निम्म्यावर आली आहे. त्यामुळे दरात थोडी वाढ दिसत असून, फळ मार्केटवरही पावसाचा परिणाम दिसत आहे.

यंदा ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने पाठ सोडली नव्हती. त्यामुळे रब्बीसह भाजीपाल्याची पेरणी उशिरा झाली. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. भात कापणी झाल्यानंतर भाजीपाल्याची लागवडही केली. आता भाजीपाला सुरू होतो, तोपर्यंत अवकाळी पावसाने नासाडी करण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन-चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. मेघगर्जनेसह ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असल्याने रब्बीसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

कोल्हापूर बाजार समितीतील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा व गुळाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. सोमवारी (दि. ४) बाजार समितीत होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेची तुलना केली, तर ती निम्म्यावर आली आहे. कोबी, टोमॅटो, गवारी, कारली, भेंडी या प्रमुख भाज्यांची आवक एकदम कमी झाली आहे. दरातही थोडी वाढ झाली आहे. कांद्याची आवक रोज दोन हजार पिशव्यांनी कमी झाली आहे.

कलिंगडाच्या दरात घसरण

हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडाला दर चांगला मिळत असल्याने लागवड लवकर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच स्थानिक कलिंगडाची आवक झाली; मात्र अवकाळी पावसाने मातीमोल दराने विक्री करावी लागत आहे.

गुळाचे उत्पादनही घटले

पावसामुळे गुऱ्हाळघरे कशीबशीच सुरू आहेत. त्यामुळे आवक कमी झाली असून, रोज पाचशे गूळ रवे कमी झाले आहेत. आवकेबरोबर मागणीही कमी झाल्याने दरात फारसा चढ-उतार दिसत नाही.