शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शिष्यवृत्तीचे दीड कोटी फक्त एका सहीसाठी पडून

By admin | Updated: December 5, 2015 00:23 IST

समाजकल्याणचा कारभार : हजारो विद्यार्थी लाभापासून वंचित

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर--मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांसाठीच्या यंदाच्या शिष्यवृत्तीपोटी शासनाकडून आलेले एक कोटी ४५ लाख रुपये तत्कालीन उपायुक्तांच्या सहीचे लेखी आदेश नसल्यामुळे बँकेच्या खात्यावर सहा महिन्यांपासून पडून आहेत. परिणामी शैक्षणिक वर्ष निम्मे संपले तरी दलित समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात.शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. मात्र, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचे साडेचार कोटी रुपये शासनाकडे परत गेले. त्याचा बोध घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचा प्रश्न निकालात काढणे अपेक्षित होते; पण नेहमीप्रमाणे माध्यमिक शिक्षण आणि समाजकल्याण या दोन विभागांनी एकमेकांकडे बोट दाखवीत जबाबदारी झटकली. त्यामुळे पाचवी ते सातवीच्या १५ हजार विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९०१ विद्यार्थ्यांचे, तर आठवी ते दहावीच्या पात्र १७ हजार ३१२ पैकी २०२२ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरले. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याकडे संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर कारवाईचे धाडस अद्याप प्रशासनाचे झालेले नाही.तत्कालीन उपायुक्त‘जाळ्यात’ सापडल्याने... विभागाचे उपायुक्त (पुणे) एम. आर. वैद्य यांनी जिल्हा परिषदेच्या खात्यावर जून महिन्यात निधी जमा केला. दरम्यान, वैद्य यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने पदावरून दूर व्हावे लागले. त्यांनी या निधीसंबंधी लेखी आदेश दिला नाही. त्यांच्या जागी नूतन उपायुक्त म्हणून विजया पवार रुजू झाल्या. त्यांनी सहीचा आदेश द्यावा, अशी विनंती येथील समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांनी पवार यांच्याकडे केली. मात्र, पूर्वीच्या उपायुक्तांनी निधी खात्यावर जमा केला आहे. त्यामुळे मी माझ्या सहीचा आदेश देऊ शकत नाही, असे उत्तर वसावे यांना मिळाले. यंदाच्या शिष्यवृत्तीच्या रकमेपोटी उपायुक्त कार्यालयाकडून १ कोटी ४५ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यावर जून महिन्यात जमा केले आहेत; पण तत्कालीन उपायुक्तांनी निधी काढण्यासंबंधीचा आपल्या सहीचा आदेश दिला नाही. आताच्या उपायुक्तांनी सही करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात अडचण आली आहे.- सुंदरसिंह वसावे,समाजकल्याण अधिकारी