शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

शिष्यवृत्तीचे दीड कोटी फक्त एका सहीसाठी पडून

By admin | Updated: December 5, 2015 00:23 IST

समाजकल्याणचा कारभार : हजारो विद्यार्थी लाभापासून वंचित

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर--मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांसाठीच्या यंदाच्या शिष्यवृत्तीपोटी शासनाकडून आलेले एक कोटी ४५ लाख रुपये तत्कालीन उपायुक्तांच्या सहीचे लेखी आदेश नसल्यामुळे बँकेच्या खात्यावर सहा महिन्यांपासून पडून आहेत. परिणामी शैक्षणिक वर्ष निम्मे संपले तरी दलित समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात.शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. मात्र, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचे साडेचार कोटी रुपये शासनाकडे परत गेले. त्याचा बोध घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीचा प्रश्न निकालात काढणे अपेक्षित होते; पण नेहमीप्रमाणे माध्यमिक शिक्षण आणि समाजकल्याण या दोन विभागांनी एकमेकांकडे बोट दाखवीत जबाबदारी झटकली. त्यामुळे पाचवी ते सातवीच्या १५ हजार विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९०१ विद्यार्थ्यांचे, तर आठवी ते दहावीच्या पात्र १७ हजार ३१२ पैकी २०२२ विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरले. उर्वरित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याकडे संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर कारवाईचे धाडस अद्याप प्रशासनाचे झालेले नाही.तत्कालीन उपायुक्त‘जाळ्यात’ सापडल्याने... विभागाचे उपायुक्त (पुणे) एम. आर. वैद्य यांनी जिल्हा परिषदेच्या खात्यावर जून महिन्यात निधी जमा केला. दरम्यान, वैद्य यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने पदावरून दूर व्हावे लागले. त्यांनी या निधीसंबंधी लेखी आदेश दिला नाही. त्यांच्या जागी नूतन उपायुक्त म्हणून विजया पवार रुजू झाल्या. त्यांनी सहीचा आदेश द्यावा, अशी विनंती येथील समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांनी पवार यांच्याकडे केली. मात्र, पूर्वीच्या उपायुक्तांनी निधी खात्यावर जमा केला आहे. त्यामुळे मी माझ्या सहीचा आदेश देऊ शकत नाही, असे उत्तर वसावे यांना मिळाले. यंदाच्या शिष्यवृत्तीच्या रकमेपोटी उपायुक्त कार्यालयाकडून १ कोटी ४५ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या खात्यावर जून महिन्यात जमा केले आहेत; पण तत्कालीन उपायुक्तांनी निधी काढण्यासंबंधीचा आपल्या सहीचा आदेश दिला नाही. आताच्या उपायुक्तांनी सही करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात अडचण आली आहे.- सुंदरसिंह वसावे,समाजकल्याण अधिकारी