शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘एलबीटी’ची दीड कोटी तूट

By admin | Updated: October 21, 2014 00:39 IST

आचारसंहिता काळातील परिस्थिती : दीड महिन्यात दहा कोटी ६१ लाख जमा

कोल्हापूर : विधानसभेच्या आचारसंहितेचा परिणाम स्थानिक संस्था कर अर्थात ‘एलबीटी’वर झाला. महापालिकेच्या तिजोरीत दर महिन्याला ‘एलबीटी’चे सरासरी ६ कोटी रुपये जमा होतात. परंतु, आचारसंहितेच्या कालावधीत यामध्ये सुमारे दीड कोटीची तूट जाणवते. दीड महिन्यात फक्त १० कोटी ६१ लाख रुपये जमा झाले. १ एप्रिल ते आज, सोमवारअखेर ४६ कोटी ५१ लाख रुपये व्यापाऱ्यांनी भरले. राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गत १२ सप्टेंबरला लागली. या आचारसंहितेच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’ भरण्यास अनुत्सुकता दाखविली असल्याचे दिसते. दि. १ ते ३० सप्टेंबर या काळात ७ कोटी ३० लाख, तर १ ते १८ आॅक्टोबर या काळात ३ कोटी ३१ लाख रुपये जमा झाले. ३१ मार्च २०१५ अखेर महापालिकेचे १०० कोटींचे उद्दिष्ट आहे. पूर्वी जकातीच्या माध्यमातून १०० कोटी रुपये मिळायचे. शहरातील सुमारे १७ हजार व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. दर महिन्याच्या २० तारखेच्या आत व्यापाऱ्यांनी हा कर भरायचा असतो. हा कर भरला नाही, तर त्याला एक महिन्याची मुदत असते. त्यानंतर दोन टक्के व्याज लावण्यात येते. तरीही हा कर जमा करताना कर्मचाऱ्यांची कसरत होते. वसुली कर्मचारी निवडणूक कामांत व्यस्त...निवडणुकीच्या आचारसंहिता काळात बहुतांश व्यापारी व महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त होते. त्याचाही परिणाम ‘एलबीटी’ वसुलीवर झाला.काही कर्मचारी निवडणूक कामांत अडकले होते, आता निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे ‘एलबीटी’ची तूट पुढील काळात भरून येईल.- संजय सरनाईक, मुख्य लेखापाल तथा एलबीटी अधिकारी, महापालिका.तक्रार निवारण समिती...‘एलबीटी’ संदर्भात महापालिकेने समन्वयासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तक्रार निवारण समिती स्थापन केली आहे. या समितीत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्यांचा समावेश आहे. दर दोन ते तीन महिन्याला या समितीची बैठक होते. या बैठकीला तक्रारींचे निरसन करण्यात येते; पण आचारसंहितेच्या काळात या समितीची बैठक झाली नाही.