शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

शेती पंपासाठी अर्धा तास भारनियमनाचे आश्वासन; इरिगेशन फेडरेशनचे ठिय्या आंदोलन स्थगित

By भीमगोंड देसाई | Updated: September 1, 2023 18:35 IST

अन्यायी फोर्स लोडशेडींग बंद करण्याची मागणी, वीज वितरण कंपनीविरोधात घोषणाबाजी

भीमगोंडा देसाई 

 कोल्हापूर : कृषी पंपासाठी वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या सुरूवातीला किंवा शेवटी केवळ अर्ध्या तासांचे भारनियमन केले जाईल, असे आश्वासन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अभिजित सीकनीस यांनी शुक्रवारी दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे येथील ताराबाई पार्कातील वीज कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पुढच्या शुक्रवारपर्यंत भारनियमनासंंबंधी ठोस निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचेही आश्वासन अभियंता सीकनीस यांनी दिली.

या बैठकीत भारनियमनासंबंधी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील- किणीकर, बाबासाहेब देवकर यांनी दिला.

महावितरण कंपनीकडून कृषी पंपासाठी अन्यायी भारनियमन सुरू आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागली आहेत. अशावेळी वीज नसल्याने पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना वाळत असलेल्या पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. सध्या कृषी पंपासाठी दिवसा व रात्री आठ तास वीज दिली जाते. पण अनेकवेळा कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीतही केला जात आहे. यामध्ये फोर्स लोडशेडींगच्या नावाखाली मनमानी पध्दतीने वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. याविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या पुढाकाराने शुक्रवारी ताराबाई पार्कातील वीज कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानी भारनियमनाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. कृषी पंपासाठी सुरळीत वीज पुरवठा व्हावा, अन्यायी भारनियमन रद्द करावे अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी होगाडे म्हणालेे, मागणी इतकी वीज निर्मिती होत असल्याने सध्या भारनियमन करण्याची गरज नाही, असे महावितरणच्या पोर्टलवर आहे. दुसऱ्या बाजूला कृषी पंपासाठी भारनियमन केले जात आहे. अशाप्रकारे दिशाभूल खपवून घेतला जाणार नाही. भारनियमन असेल तर पोर्टलवरील खोटे आहे, असे महावितरणच्या प्रशासनाने जाहीर करावे. आंदोलकांसमोर वीज अधिकाऱ्यांनी जाहीर केल्याप्रमाणे केवळ अर्धा तासच भारनियमन करण्याचे आदेश सर्व कार्यालयाने द्यावे. पुढील काळात गरज भासली तर आंदोलन तीव्र करण्यात येईल.