शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील हैदरखान विहिरीची पुन्हा दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:49 IST

लातूरच्या जीवनदायीनीची व्यथा : कचरा टाकण्यासाठी वापर होत असल्याने पाणीसाठा दूषित--लोकमतविशेष

सदानंद औंधे --मिरज -मिरजेतून गतवर्षी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीची दुरवस्था झाली आहे. लातूरला पाणी पाठविण्याचे काम संपल्यानंतर एका वर्षातच या विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, हैदरखान विहिरीत झाडे-झुडपे वाढली असून, कचरा टाकण्यात येत असल्याने पाणी दूषित झाले आहे. मिरजेतून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीचा मोठा उपयोग झाला होता. कृष्णा नदीतून मिरजेतील रेल्वे स्थानकात हैदरखान विहिरीत पाणीसाठा करून मिरज रेल्वे यार्डातून दररोज ५० टँकरद्वारे लातूरला २५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला होता. १८ एप्रिलपासून तब्बल १०८ दिवस १७ कोटी लिटर पाणी लातूरला पाठविण्यात आले. मात्र लातूरचा पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर हैदरखान विहिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, विहिरीत झाडे-झुडपे उगविली आहेत. विहिरीत मोठ्याप्रमाणात पाणीसाठा असून पाण्यात कचरा टाकण्यात येत आहे. गतवर्षी विहिरीची स्वच्छता करून विहिरीभोवती कुंपण बांधण्यात आले होते. या कुंपणाचीही पडझड झाली आहे. विहिरीचा नवीन नामफलक गायब झाला आहे. विहिरीतील मोटारी जीवन प्राधिकरण विभागाने काढून नेल्या आहेत. विहिरीचे लोखंडी प्रवेशद्वार मोडकळीस आले आहे. गतवर्षी महापालिका, जीवन प्राधिकरण व रेल्वेने विहिरीची स्वच्छता, साफसफाई केली होती. मात्र विहिरीतील पाणीसाठ्याची गरज संपल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. हैदरखान विहिरीतून एकेकाळी संपूर्ण रेल्वे स्थानकास, रेल्वेगाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. विहिरीतील पाण्याचे स्रोत आजही जिवंत आहेत. रेल्वेने काही वर्षापूर्वी कृष्णा नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यानंतर हैदरखान विहिरीचे महत्त्व कमी झाले. लातूरला जाणारे टँकर भरण्यासाठी जलवाहिनीचे काम करणारे ठेकेदार शशांक जाधव यांनी, हैदरखान विहिरीमुळे लातूरचा पाणीपुरवठा यशस्वी झाल्याचे सांगितले. हैदरखान विहीर नसती, तर पाणीसाठ्यासाठी मोठा हौद तयार करावा लागला असता. या विहिरीचे जतन करणे आवश्यक असल्याचेही जाधव यांनी सांगितले.पाणीपुरवठा बंद : टॅँकरचेही स्थलांतरलातूरला पाणी पुरवठ्यासाठी नदीतील जॅकवेल व रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रात उच्च क्षमतेचे पंप बसवून रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत पाण्याचा साठा करण्यासाठी ५५ अश्वशक्ती क्षमतेचे तीन पंप बसविण्यात आले. सुमारे ३० लाख लिटर पाण्याचा साठा करण्याची क्षमता असलेल्या हैदरखान विहिरीमुळे गतीने टँकर भरणे शक्य झाले. टँकर भरण्यासाठी सुमारे दोन कोटी रूपये खर्च करून अडीच किलोमीटर लांबीची जलवाहिनी बसविण्यात आली. ही व्यवस्था कायमस्वरूपी ठेवून रेल्वे टँकर भरण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार होता. मिरजेत पाठविलेले प्रत्येकी ५४ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर यापुढील काळातही पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी वापरण्यात येणार होते. मिरजेत पाण्याची सुविधा असल्याने हे टँकर मिरजेतच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र लातूरला पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर पाण्याचे टँकरही मिरजेतून इतरत्र हलविण्यात आले आहेत. ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व धोक्यातमिरजेतील ऐतिहासिक हैदरखान विहीर १६ व्या शतकात शेतीला पाणीपुरवठ्यासाठी अदिलशहाच्या हैदरखान या सरदाराने बांधल्याचा उल्लेख आहे. या विहिरीतून मिरजेलाही पाणीपुरवठा होत होता. रेल्वेने ही विहीर ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा होत होता. मात्र या मोठ्या बांधीव दगडी हैदरखान विहिरीतील पाणीसाठ्याचा आजही उपयोग करता येणे शक्य असताना, याकडे दुर्लक्षामुळे हैदरखान विहिरीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.१. हैदरखान विहिरीत अजूनही मोठा पाणीसाठा असला तरी, यामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने पाणी दूषित होत आहे. २. याठिकाणचे मोटारीचे छत गायब झाले असून, झुडपे वाढली आहेत. ३. विहिरीच्या कुंपणभिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत.