शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

हा तर पी. एन. पाटील यांचा अपरिपक्वपणा

By admin | Updated: April 16, 2015 00:52 IST

मुश्रीफ : ‘राजाराम’नंतर ‘केडीसीसी’चा फैसला

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीचा संवेदनशील काळ असल्याने अशावेळी फार संयमाने बोलणे गरजेचे होते. पी. एन. पाटील यांनी भाष्य करणे टाळले असते तर बरे झाले असते. अशाप्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे राजकीय अपरिपक्वता असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. १९ एप्रिलला राजाराम साखर कारखान्याचे मतदान होत असून, त्यानंतरच ‘केडीसीसी’बाबत अंतिम फैसला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मंगळवारी, सतेज पाटील यांच्यामुळेच राष्ट्रवादी ‘गोकुळ’मध्ये असे वक्तव्य काँग्रेस कमिटीत केले होते. याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कोणत्याही निवडणुकीचा काळ हा संवेदनशील असतो, अफवा व वस्तुस्थिती याबाबत चर्चा होत असते. अशा संवेदनशील काळात पी. एन. पाटील यांनी भाष्य करणे टाळले असते तर बरे झाले असते पण याबाबत आपण काही भाष्य करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ठरावधारक सत्तारूढ गटाला ‘पॅनेल टू पॅनेल’च मतदान करणार, क्रॉस व्होटिंग होणार नाही. ‘केडीसीसी’ची माघार २४ एप्रिलपर्यंत आहे, राजाराम साखर कारखान्याचे मतदान संपल्यानंतर आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी स्वत: चर्चा करणार आहे. यापूर्वी चर्चा झालेली आहे, पण त्यावेळी अंतिम फैसला होणार आहे. पी. एन. पाटील, विनय कोरे, सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून दोन्ही काँग्रेसचे ‘केडीसीसी’त तुल्यबळ पॅनेल कसे करता येईल, यासाठी माझे प्रयत्न आहेत. प्रत्येक निवडणुकीतील समीकरणे वेगळी असतात, केडीसीसी बँकेत सतेज पाटील नक्कीच आमच्या बरोबर येतील, ‘गोकुळ’चा विषय वेगळा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, दिलीप पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते. ‘गोकुळ’मध्ये महाडिकांचीच शक्ती ‘गोकुळ’मध्ये अरुण नरके, विश्वास पाटील, रणजित पाटील, रवींद्र आपटे, आनंदराव पाटील-चुयेकर, भरमू पाटील, अरुण डोंगळे यांची शक्ती आहे. हे सर्वजण आमदार महादेवराव महाडिक यांना दैवत मानतात. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये कोणाची शक्ती आहे, हे वेगळे सांगायला नको, असा टोलाही मुश्रीफ यांनी ‘पी. एन.’ यांना हाणला.निपुण कोरे, समरजित हवे होतेआम्हाला बॅँक चांगली चालवायची आहे, यापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही सांगितलेले आहे. पूर्वीसारखी चालवून चालणार नाही. यासाठी निपुण कोरे व समरजीतसिंह घाटगेंसारखी अभ्यासू माणसे तिथे जाणे गरजेचे होते. पण, कोरे यांचा अर्ज अवैध ठरला व घाटगे यांनी अर्जच दाखल केला नसल्याचे मुश्रीफ म्हणाले.