शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

गुंता सुटला; १८ उमेदवारांनी भरले

By admin | Updated: October 10, 2015 00:30 IST

अर्ज इंगवले, वळंजू, सोनवणेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द करून छापील अर्ज भरून देण्याची मुभा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांवरील ताण काहीसा हलका झाला. त्यामुळे शुक्रवारी एका दिवसात १८ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले तर १२५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. माजी महापौर नंदकुमार वळंजू, तेजस्विनी रविकिरण इंगवले, अरुण सोनवणे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पितृपंधरवडा, आॅनलाईन अर्ज भरण्याचे बंधन यामुळे गेल्या तीन दिवसांत उमेदवारांनी फारसा उत्साह दाखविला नाही पण आॅनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही पद्धत रद्द केल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. शुक्रवारी दिवसभर सातही क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारी अर्ज नेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची अक्षरश: गर्दी उसळली. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांगा लावल्याचे दिसून आले. दिवसभर निवडणूक कार्यालयांतून गर्दी दिसून येत होती. एकाच दिवसात १२५० अर्जांची विक्री झाली. शुक्रवारी शहरातील विविध प्रभागांतून १८ उमेदवारांनी २३ अर्ज भरले. त्यामध्ये ताराराणी आघाडीचे उमेदवार व माजी महापौर नंदकुमार वळंजू (शास्त्रीनगर-जवाहरनगर), तेजस्विनी रविकिरण इंगवले (फिरंगाई), माजी नगरसेवक ईश्वर परमार (बिंदू चौक) यांचा तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा विश्वनाथ सांगावकर (बाजारगेट) यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या रचना राजू मोरे यांनी फुलेवाडी प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्यावतीने संजय राणे यांनी तुळजाभवानी मंदिर प्रभागातून, अरुण सोनवणे यांनी जवाहरनगरमधून, तर शारदा रवींद्र सरनाईक यांनी चंद्रेश्वर प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला. नंदकुमार वळंजू, तेजस्विनी इंगवले, अरुण सोनवणे यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले. गेल्या तीन दिवसांपासून शांत असणारे वातावरण आता ढवळून निघत आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्या दुरूस्त केल्यानंतरही अंतिम मतदार यादीत शहरातील सुमारे पाच हजार मतदारांच्या नावांची नोंद ते राहत असलेले प्रभाग सोडून अन्य प्रभागांत झाली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर योग्य दुरुस्ती करत त्यांच्या नावांची नोंद मतदार राहत असलेल्या प्रभागात करण्यात आली. चुकीची दुरूस्ती झाल्यामुळे या मतदारांना न्याय मिळाला आहे. जास्तीत जास्त चुका सुधारण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले.