शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गुंता सुटला; १८ उमेदवारांनी भरले

By admin | Updated: October 10, 2015 00:30 IST

अर्ज इंगवले, वळंजू, सोनवणेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द करून छापील अर्ज भरून देण्याची मुभा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांवरील ताण काहीसा हलका झाला. त्यामुळे शुक्रवारी एका दिवसात १८ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले तर १२५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. माजी महापौर नंदकुमार वळंजू, तेजस्विनी रविकिरण इंगवले, अरुण सोनवणे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पितृपंधरवडा, आॅनलाईन अर्ज भरण्याचे बंधन यामुळे गेल्या तीन दिवसांत उमेदवारांनी फारसा उत्साह दाखविला नाही पण आॅनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही पद्धत रद्द केल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. शुक्रवारी दिवसभर सातही क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारी अर्ज नेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची अक्षरश: गर्दी उसळली. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांगा लावल्याचे दिसून आले. दिवसभर निवडणूक कार्यालयांतून गर्दी दिसून येत होती. एकाच दिवसात १२५० अर्जांची विक्री झाली. शुक्रवारी शहरातील विविध प्रभागांतून १८ उमेदवारांनी २३ अर्ज भरले. त्यामध्ये ताराराणी आघाडीचे उमेदवार व माजी महापौर नंदकुमार वळंजू (शास्त्रीनगर-जवाहरनगर), तेजस्विनी रविकिरण इंगवले (फिरंगाई), माजी नगरसेवक ईश्वर परमार (बिंदू चौक) यांचा तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा विश्वनाथ सांगावकर (बाजारगेट) यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या रचना राजू मोरे यांनी फुलेवाडी प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्यावतीने संजय राणे यांनी तुळजाभवानी मंदिर प्रभागातून, अरुण सोनवणे यांनी जवाहरनगरमधून, तर शारदा रवींद्र सरनाईक यांनी चंद्रेश्वर प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला. नंदकुमार वळंजू, तेजस्विनी इंगवले, अरुण सोनवणे यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले. गेल्या तीन दिवसांपासून शांत असणारे वातावरण आता ढवळून निघत आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्या दुरूस्त केल्यानंतरही अंतिम मतदार यादीत शहरातील सुमारे पाच हजार मतदारांच्या नावांची नोंद ते राहत असलेले प्रभाग सोडून अन्य प्रभागांत झाली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर योग्य दुरुस्ती करत त्यांच्या नावांची नोंद मतदार राहत असलेल्या प्रभागात करण्यात आली. चुकीची दुरूस्ती झाल्यामुळे या मतदारांना न्याय मिळाला आहे. जास्तीत जास्त चुका सुधारण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले.