शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गुंता सुटला; १८ उमेदवारांनी भरले

By admin | Updated: October 10, 2015 00:30 IST

अर्ज इंगवले, वळंजू, सोनवणेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धत रद्द करून छापील अर्ज भरून देण्याची मुभा मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांवरील ताण काहीसा हलका झाला. त्यामुळे शुक्रवारी एका दिवसात १८ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले तर १२५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली. माजी महापौर नंदकुमार वळंजू, तेजस्विनी रविकिरण इंगवले, अरुण सोनवणे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पितृपंधरवडा, आॅनलाईन अर्ज भरण्याचे बंधन यामुळे गेल्या तीन दिवसांत उमेदवारांनी फारसा उत्साह दाखविला नाही पण आॅनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही पद्धत रद्द केल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. शुक्रवारी दिवसभर सातही क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारी अर्ज नेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची अक्षरश: गर्दी उसळली. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रांगा लावल्याचे दिसून आले. दिवसभर निवडणूक कार्यालयांतून गर्दी दिसून येत होती. एकाच दिवसात १२५० अर्जांची विक्री झाली. शुक्रवारी शहरातील विविध प्रभागांतून १८ उमेदवारांनी २३ अर्ज भरले. त्यामध्ये ताराराणी आघाडीचे उमेदवार व माजी महापौर नंदकुमार वळंजू (शास्त्रीनगर-जवाहरनगर), तेजस्विनी रविकिरण इंगवले (फिरंगाई), माजी नगरसेवक ईश्वर परमार (बिंदू चौक) यांचा तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा विश्वनाथ सांगावकर (बाजारगेट) यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या रचना राजू मोरे यांनी फुलेवाडी प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्यावतीने संजय राणे यांनी तुळजाभवानी मंदिर प्रभागातून, अरुण सोनवणे यांनी जवाहरनगरमधून, तर शारदा रवींद्र सरनाईक यांनी चंद्रेश्वर प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला. नंदकुमार वळंजू, तेजस्विनी इंगवले, अरुण सोनवणे यांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागात मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले. गेल्या तीन दिवसांपासून शांत असणारे वातावरण आता ढवळून निघत आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्या दुरूस्त केल्यानंतरही अंतिम मतदार यादीत शहरातील सुमारे पाच हजार मतदारांच्या नावांची नोंद ते राहत असलेले प्रभाग सोडून अन्य प्रभागांत झाली होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर योग्य दुरुस्ती करत त्यांच्या नावांची नोंद मतदार राहत असलेल्या प्रभागात करण्यात आली. चुकीची दुरूस्ती झाल्यामुळे या मतदारांना न्याय मिळाला आहे. जास्तीत जास्त चुका सुधारण्याचा प्रयत्न मनपा प्रशासनाने केला असल्याचे सांगण्यात आले.