शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या राजकारणाची जिल्ह्यात उत्कंठा

By admin | Updated: April 2, 2015 00:37 IST

उद्या मतदान : तालुकावार शिक्षक मेळावे, पदफेऱ्या, प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडियाचा वापर

अशोक खाडे - कुंभोज -प्राथमिक शिक्षकांची शिखर बॅँक समजल्या जाणाऱ्या शिक्षक बॅँकेसाठी उद्या, शुक्रवारी सतरा जागांसाठी मतदान होत आहे. तालुकावार शिक्षक मेळावे, पदफेऱ्या, प्रत्यक्ष गाठीभेटी तसेच सोशल मीडियाद्वारे गुरुजींनी प्रचाराचे अक्षरश: रान उठविले आहे. शिक्षक संघ समिती तसेच पुरोगामी संघटनेतील नाराजांचे बळ समविचारी पॅनेलला मिळाल्याने निवडणुकीत अनपेक्षितपणे अधिकच रंग भरला आहे. संघटनांपेक्षा गुरुजींनी व्यक्तिगत प्रतिष्ठेच्या बनविलेल्या या निवडणुकीत वरुटेंचे ‘विमान’ भरारी घेणार, समविचारीचा ‘पतंग’ झेपावणार, की सभासद ‘कपबशीला’ पसंती देऊन बॅँकेत परिवर्तन घडवितात, याबाबत संपूर्ण जिल्ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.६८२३ सभासद संख्या असणाऱ्या दि प्राथमिक शिक्षक बॅँकेत सर्वसाधारण १२, राखीव गटातील ५ अशा १७ जागांसाठी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजाराम वरुटे, पांडुरंग केणे, राजमोहन पाटील या तीन विद्यमानांसह बॅँकेचे माजी अध्यक्ष जीवन मिठारी, उपाध्यक्ष बळवंत पोवार, विद्यमान संचालक रघुनाथ खोत, शोभा पाटील निवडणूक लढवीत आहेत. संघाचे सत्तारूढ पॅनेल, शिक्षक समिती, मागासवर्गीय संघटना, पुरोगामीचे शाहू परिवर्तन तसेच संघाच्या थोरात गटाच्या समविचारी पॅनेल दरम्यान प्रामुख्याने होणाऱ्या लढतीत पाचजणांच्या स्वाभिमानी पुरोगामी आघाडीसह अन्य ११ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.पॅनेल रचनेदरम्यान नाराज झालेल्या संघाच्या वरुटे गटातील संचालक रवी पाटील, रघुनाथ खोत, बी. एस. पाटील, शाहूवाडीचे मोहिते, समितीचे जोतिराम पाटील, पुरोगामीचे रवी शेंडे हे सर्वजण थोरात गटाला मिळाल्याने संघ, समिती व पुरोगामीला धक्का बसला. तथापि, अनपेक्षितपणे ‘समविचारी’ पॅनेलला बळ मिळाल्याने अन्य दोन्ही पॅनेलसमोर आव्हान निर्माण झाले आहे.सर्वसाधारण गटातील बारा जागांसाठी निवडणूक होत असलेल्या करवीर तालुक्यात बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष राजाराम वरुटे, पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील तसेच थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांच्यात प्रतिष्ठेची तिरंगी लढत होणार आहे.हातकणंगले जागाविक्री प्रकरण कळीचे ठरल्याने केवळ याच मुद्द्यावर इथली लढत विद्यमान संचालक राजमोहन पाटील, परिवर्तन पॅनेलचे अर्जुन पाटील तसेच समविचारीचे एन. वाय. पाटील यांच्यादरम्यान लक्षवेधी ठरणार आहे. शिरोळमध्ये विद्यमान संचालक रवी पाटील यांच्याशिवाय लढणाऱ्या संघास इथली लढत जड जाण्याची चिन्हे आहेत. परिवर्तन पॅनेलने इथे दोन उमेदवार दिल्याने तसेच समविचारीला रवी पाटील गटाची ताकद मिळाल्याने उमेदवार तुल्यबळ असूनही इथली लढत व्यक्तीप्रतिष्ठेभोवती गुरफटण्याची चिन्हे आहेत.पन्हाळ्यात विद्यमान संचालक रघुनाथ खोत समविचारातून लढत असून, भिवाजी काटकर यांची उमेदवारी नसल्याने नाराजीमुळे व्यक्ती पाहून होणाऱ्या संभाव्य मतदानाबाबत पॅनेलप्रमुख चिंतित आहेत. शाहूवाडीतील तिरंगी लढतीत उमेदवारांची कसोटी, तर सभासदांच्या संघटना निष्ठेचा कस लागणार आहे. राधानगरीत पुरोगामीत काहीशी नाराजी असून, संघाचे विद्यमान संचालक बी. एस. पाटील, समितीचे जोतिराम पाटील यांनी समविचारीत प्रवेश केल्याने इथे समविचारीला अन्य दोहोंचे आव्हान निर्माण झाले आहे.भुदरगडमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीत समान संधी निर्माण झाली आहे. कागल तालुक्यात गुरुजींच्या राजकारणाला गटातटाची झालर असल्याने इथली तिरंगी लढत चुरशीची होईल अशी चिन्हे आहेत. चंदगडमध्ये शंकरराव मनवाडकर यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांना संघ व समविचारीचे आव्हान राहणार आहे. आजरा तालुक्यात रवी शेंडे पुरोगामीतून समविचारीत गेल्याने इथल्या चौरंगी लढतीत उमेदवारांपेक्षा संघटनांचा कस लागणार आहे.गडहिंग्लजमध्ये तिरंगी लढतीत उमेदवाराचे व्यक्तिगत वलय महत्त्वाचे ठरणार आहे. गगनबावड्याची लढत व्यक्तीबरोबर खरी संघटनास्तरावर प्रतिष्ठेची होणार आहे. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच महिलांनी प्रचाराचे रान उठविले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप कळीचा मुद्दाजिल्हा पॅनेल रचना असल्याने उमेदवारांची स्वत:च्या तालुक्यासोबत अन्य तालुक्यांवरही भिस्त असल्याने प्रचारार्थ संपूर्ण जिल्हा पिंजला गेला. बॅँकेची निवडणूक संघटनांनी प्रतिष्ठेची बनविल्याने तसेच बॅँकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रंगलेल्या प्रचाराने जिल्हा ढवळून निघाला.