शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंठ्याला १००२ प्रमाणेच मिळणार भरपाई; शासनाचा निर्णय : पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणेच मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-कोल्हापूर : राज्यातील अतिवृष्टी बाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-कोल्हापूर : राज्यातील अतिवृष्टी बाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जाहीर केला. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना व शहरी नागरिकांनाही मदतीचा दिलासा मिळणार आहे. भाजप सरकारच्या काळात २०१९ मध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा बागायती पिकासाठी कर्जदार शेतकऱ्याला (ऊस व भाजीपाला ) प्रतिगुंठा ९५० तर जिरायती (भात,सोयाबीन,भुईमूग व नाचणी) पिकांसाठी प्रतिगुंठा ४५० रुपये कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु यावर्षी जिल्हा बँकांनी प्रतिहेक्टरी पीककर्जाचे प्रमाण (स्केल ऑफ फायनान्स) वाढवल्याने शेतकऱ्याला गुंठ्यास १००२ रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांची यानुसारच भरपाई देण्याची मागणी होती. यंदाच्या महापुरानंतर एकतर मदत देण्यास विलंब झाला व मदत कमी मिळणार असे चित्र तयार झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी होती, त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

यंदाच्या महापुरात राज्यात ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सातत्याने वाढीव मदतीसाठी पाठपुरावा केला होता, परंतु त्यांच्याकडून अद्यापही २०१५ नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अशी मिळणार भरपाई

ऊस व भाजीपाला पिके : ९५० ते १००२ प्रतिगुंठा कर्जमाफी

भात,सोयाबीन,भुईमूग व नाचणी : ४५० ते ४८० प्रतिगुंठा

कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जदार शेतकरी : १ लाख ४ हजार

कोल्हापूर जिल्ह्यातील बिगर कर्जदार शेतकरी : १ लाख ९७ हजार

मदतीचा लाभ कर्जदार शेतकऱ्यास : १ हेक्टरपर्यंत (म्हणजे अडीच एकरापर्यंत)

बिगर कर्जदार शेतकऱ्यास : दोन हेक्टरपर्यंत (म्हणजे पाच एकर पर्यंत)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी (एनडीआरएफ) च्या १३ मे २०१५ च्या निकषानुसार ज्यांचे ३३ टक्क्यापर्यंत पीक नुकसान झाले अशा जिरायत पिकासाठी हेक्टरी ६८००, बागायतीसाठी १३,५०० व फळपिकांसाठी १८ हजार रुपये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत असे. ही रक्कम फारच कमी होती व त्यात वाढ करण्यास केंद्र शासन अजूनही तयार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार या रकमेच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. तोच निर्णय आताच्या ठाकरे सरकारने कायम ठेवला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेतले आहे, त्यांना त्यांच्या पीककर्जाच्या प्रमाणात एक हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचा निर्णय त्यावेळीही झाला होता. त्यानुसार उसाला हेक्टरी ९५ हजार रुपये कर्ज मिळत होते. भाताला ४५ हजार, भुईमूगास ४२ हजार रुपये कर्ज मिळत होते. हे कर्जाचे प्रमाण आता वाढवण्यात आले आहे. त्यामुळे हेक्टरी १ लाख २ हजार रुपये पीककर्ज मिळत असेल तर गुंठ्यास एक हजार २ रुपयांप्रमाणे कर्जमाफी मिळू शकते.