शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

गुंठ्याला १००२ प्रमाणेच मिळणार भरपाई; शासनाचा निर्णय : पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणेच मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-कोल्हापूर : राज्यातील अतिवृष्टी बाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-कोल्हापूर : राज्यातील अतिवृष्टी बाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जाहीर केला. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना व शहरी नागरिकांनाही मदतीचा दिलासा मिळणार आहे. भाजप सरकारच्या काळात २०१९ मध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा बागायती पिकासाठी कर्जदार शेतकऱ्याला (ऊस व भाजीपाला ) प्रतिगुंठा ९५० तर जिरायती (भात,सोयाबीन,भुईमूग व नाचणी) पिकांसाठी प्रतिगुंठा ४५० रुपये कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु यावर्षी जिल्हा बँकांनी प्रतिहेक्टरी पीककर्जाचे प्रमाण (स्केल ऑफ फायनान्स) वाढवल्याने शेतकऱ्याला गुंठ्यास १००२ रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांची यानुसारच भरपाई देण्याची मागणी होती. यंदाच्या महापुरानंतर एकतर मदत देण्यास विलंब झाला व मदत कमी मिळणार असे चित्र तयार झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी होती, त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

यंदाच्या महापुरात राज्यात ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सातत्याने वाढीव मदतीसाठी पाठपुरावा केला होता, परंतु त्यांच्याकडून अद्यापही २०१५ नंतर नुकसानभरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अशी मिळणार भरपाई

ऊस व भाजीपाला पिके : ९५० ते १००२ प्रतिगुंठा कर्जमाफी

भात,सोयाबीन,भुईमूग व नाचणी : ४५० ते ४८० प्रतिगुंठा

कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जदार शेतकरी : १ लाख ४ हजार

कोल्हापूर जिल्ह्यातील बिगर कर्जदार शेतकरी : १ लाख ९७ हजार

मदतीचा लाभ कर्जदार शेतकऱ्यास : १ हेक्टरपर्यंत (म्हणजे अडीच एकरापर्यंत)

बिगर कर्जदार शेतकऱ्यास : दोन हेक्टरपर्यंत (म्हणजे पाच एकर पर्यंत)

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी (एनडीआरएफ) च्या १३ मे २०१५ च्या निकषानुसार ज्यांचे ३३ टक्क्यापर्यंत पीक नुकसान झाले अशा जिरायत पिकासाठी हेक्टरी ६८००, बागायतीसाठी १३,५०० व फळपिकांसाठी १८ हजार रुपये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत असे. ही रक्कम फारच कमी होती व त्यात वाढ करण्यास केंद्र शासन अजूनही तयार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार या रकमेच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. तोच निर्णय आताच्या ठाकरे सरकारने कायम ठेवला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेतले आहे, त्यांना त्यांच्या पीककर्जाच्या प्रमाणात एक हेक्टरपर्यंत भरपाई देण्याचा निर्णय त्यावेळीही झाला होता. त्यानुसार उसाला हेक्टरी ९५ हजार रुपये कर्ज मिळत होते. भाताला ४५ हजार, भुईमूगास ४२ हजार रुपये कर्ज मिळत होते. हे कर्जाचे प्रमाण आता वाढवण्यात आले आहे. त्यामुळे हेक्टरी १ लाख २ हजार रुपये पीककर्ज मिळत असेल तर गुंठ्यास एक हजार २ रुपयांप्रमाणे कर्जमाफी मिळू शकते.