शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

गुजरातच्या लेखकांचे ‘दाक्षिणायन’

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

मेघा पानसरे यांची माहिती : कोल्हापुरात गुरुवारी आगमन, संवाद साधणार

कोल्हापूर : देशातील सांस्कृतिक बहुविविधतेला विरोध करणाऱ्या शक्ती वरचढ होऊन अशांतता माजवित आहेत. अशा स्थितीत चालू घडामोडी आणि निर्माण झालेले प्रश्न याबद्दल लोकभावना जाणून घेणे, तसेच साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी समजून घेण्यासाठी परस्पर संवाद घडवून आणणे, या उद्देशाने गुजरातमधील मान्यवर लेखक, साहित्यिकांनी ‘दाक्षिणायन’ मोहीम आयोजित केली आहे. ही मोहीम कोल्हापुरात गुरुवारी (दि. २६) येणार आहे, अशी माहिती श्रमिक प्रतिष्ठानच्या विश्वस्त सदस्य डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी डॉ. पानसरे म्हणाल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांची हत्या झाली. त्यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. तसेच दादरी येथील घटना पाहता देशातील सार्वजनिक जीवनातील असहिष्णुता वाढत आहे. त्यावर अस्वस्थ झालेले अनेक साहित्यिक-कलावंत यांनी पुरस्कार परत केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील साहित्यिक गणेश देवी व अन्य साहित्यिक, लेखक हे ‘दाक्षिणायन’ करीत आहेत. याअंतर्गत ते पुणे, कोल्हापूर व धारवाड येथे अनुक्रमे बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी जाणार आहेत. त्या-त्याठिकाणचे साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्याशी ते संवाद साधतील. श्रमिक प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दसमा, कनवा, अवनि, अशा कोल्हापुरातील विविध संस्थांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. शरद नावरे, दिलीप पवार, एस. बी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)कार्यक्रम असा..बुधवारी पहिली भेट पुणे येथे देऊन हा जत्था गुरुवारी कोल्हापुरात येईल. त्यादिवशी सकाळी साडेदहा वाजता हा जत्था पानसरे यांच्या बिंदू चौकातील कार्यालयास भेट देईल. सकाळी अकरा वाजता देवल क्लबच्या भांडारकर कलादालनात युवा साहित्यिकांशी संवाद आणि सायंकाळी पाच वाजता प्रबोध परीख यांचे तिथेच व्याख्यान. मोहिमेतील सहभागी लेखकगणेश देवी, अनिल जोशी, रमेश ओझा, कानजी पटेल, उत्तम परमार, परेश नायक, मानिशी जानी, प्रबोध पारीख, सचिन केतकर, दिलीप जव्हेरी, सुरेखा देवी या गुजरातमधील लेखकांचा या मोहिमेत सहभाग असणार आहे. हे लेखक कोल्हापुरातील युवा साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. यात संदेश भांडारे, अनोश मालेकर, संजीव खांडेकर, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोविंद काजरेकर यांचा समावेश आहे. ‘दाक्षिणायन’मधील विचारमंथनात गुजरातमधील लेखकांसह महाराष्ट्रातील डॉ. राजन गवस, शरद नावरे, उदय नारकर, रणधीर शिंदे, शरद भुताडिया, सुनीलकुमार लवटे, अशोक चौसाळकर, मोहन पाटील, नीलम माणगावे, रफीक सूरज, गौतमीपुत्र कांबळे हे सहभागी होतील, असे डॉ. पानसरे यांनी सांगितले.