शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या लेखकांचे ‘दाक्षिणायन’

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

मेघा पानसरे यांची माहिती : कोल्हापुरात गुरुवारी आगमन, संवाद साधणार

कोल्हापूर : देशातील सांस्कृतिक बहुविविधतेला विरोध करणाऱ्या शक्ती वरचढ होऊन अशांतता माजवित आहेत. अशा स्थितीत चालू घडामोडी आणि निर्माण झालेले प्रश्न याबद्दल लोकभावना जाणून घेणे, तसेच साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी समजून घेण्यासाठी परस्पर संवाद घडवून आणणे, या उद्देशाने गुजरातमधील मान्यवर लेखक, साहित्यिकांनी ‘दाक्षिणायन’ मोहीम आयोजित केली आहे. ही मोहीम कोल्हापुरात गुरुवारी (दि. २६) येणार आहे, अशी माहिती श्रमिक प्रतिष्ठानच्या विश्वस्त सदस्य डॉ. मेघा पानसरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.यावेळी डॉ. पानसरे म्हणाल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी या विचारवंतांची हत्या झाली. त्यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. तसेच दादरी येथील घटना पाहता देशातील सार्वजनिक जीवनातील असहिष्णुता वाढत आहे. त्यावर अस्वस्थ झालेले अनेक साहित्यिक-कलावंत यांनी पुरस्कार परत केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील साहित्यिक गणेश देवी व अन्य साहित्यिक, लेखक हे ‘दाक्षिणायन’ करीत आहेत. याअंतर्गत ते पुणे, कोल्हापूर व धारवाड येथे अनुक्रमे बुधवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी जाणार आहेत. त्या-त्याठिकाणचे साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्याशी ते संवाद साधतील. श्रमिक प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दसमा, कनवा, अवनि, अशा कोल्हापुरातील विविध संस्थांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. शरद नावरे, दिलीप पवार, एस. बी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)कार्यक्रम असा..बुधवारी पहिली भेट पुणे येथे देऊन हा जत्था गुरुवारी कोल्हापुरात येईल. त्यादिवशी सकाळी साडेदहा वाजता हा जत्था पानसरे यांच्या बिंदू चौकातील कार्यालयास भेट देईल. सकाळी अकरा वाजता देवल क्लबच्या भांडारकर कलादालनात युवा साहित्यिकांशी संवाद आणि सायंकाळी पाच वाजता प्रबोध परीख यांचे तिथेच व्याख्यान. मोहिमेतील सहभागी लेखकगणेश देवी, अनिल जोशी, रमेश ओझा, कानजी पटेल, उत्तम परमार, परेश नायक, मानिशी जानी, प्रबोध पारीख, सचिन केतकर, दिलीप जव्हेरी, सुरेखा देवी या गुजरातमधील लेखकांचा या मोहिमेत सहभाग असणार आहे. हे लेखक कोल्हापुरातील युवा साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. यात संदेश भांडारे, अनोश मालेकर, संजीव खांडेकर, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोविंद काजरेकर यांचा समावेश आहे. ‘दाक्षिणायन’मधील विचारमंथनात गुजरातमधील लेखकांसह महाराष्ट्रातील डॉ. राजन गवस, शरद नावरे, उदय नारकर, रणधीर शिंदे, शरद भुताडिया, सुनीलकुमार लवटे, अशोक चौसाळकर, मोहन पाटील, नीलम माणगावे, रफीक सूरज, गौतमीपुत्र कांबळे हे सहभागी होतील, असे डॉ. पानसरे यांनी सांगितले.