शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

गुऱ्हाळ व्यावसायिकांनी संघटित लढा द्यावा

By admin | Updated: October 25, 2015 23:35 IST

राजू शेट्टी यांचे आवाहन : शाहू गूळ संघाचा मेळावा

वडणगे : गुऱ्हाळ व्यावसायिकांपुढील समस्या सोडविण्यासाठी सरकारने आतापर्यंत दुर्लक्ष केलेले आहे, म्हणूनच यापुढे शेतकऱ्यांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. आंबेवाडी (ता. करवीर) येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शाहू गूळ संघाच्यावतीने गूळ उद्योग अडचणी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, गूळ क्लस्टर मंजुरी, निर्यातीसंदर्भात ‘अपेडा’ची मदत मिळवणे, गूळ बोर्ड स्थापन करणे, गूळ पदार्थांच्या मार्केटिंगसाठी आपण प्रयत्नशील राहू, तसेच शाहू गूळ संघाच्या ‘उत्पादक ते ग्राहक’ अभियानास मदत आणि आंदोलनात पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. आ. चंद्रदीप नरके यांनी गूळ उद्योगाच्या समस्यांबाबत येत्या अधिवेशनात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. प्रा. जालंदर पाटील यांनी दर्जेदार उत्पादन करून बाजारपेठा काबीज करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला ताकद द्यावी, असे मनोगत व्यक्त केले. फिनोलेक्सचे अधिकारी विठ्ठल गोरे यांनी ठिबक सिंचन तसेच खेबवडेचे अरुण पाटील यांनी सेंद्रीय शेती या विषयांवर उपस्थितांचे मनोबल उंचावले. प्रास्ताविक शाहू संघाचे संस्थापक राजाराम पाटील यांनी गूळ उद्योगाच्या समस्या व उपाय याचा आढावा घेतला.यावेळी भुयेवाडीच्या राणी पाटील, संघाचे संचालक संभाजी देवणे (वडणगे), बळीराम चव्हाण (कोगे), विलास देसाई (चिंचवडे), कावजी कदम (उचगाव), सुरेश कुरणे (आंबेवाडी), आण्णासाहेब पाटील (चिंचवाड), रामचंद्र कचरे (वडणगे), नामदेव पाटील (वरणगे), तसेच गुऱ्हाळ व्यावसायिक उपस्थित होते. व्हा. चेअरमन रघुनाथ वरूटे यांनी आभार मानले. (वार्ताहर)